शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

पाणीटंचाई प्रश्नी येवलेकरांना दिलासा

By admin | Updated: May 27, 2014 17:00 IST

पालखेडचे आवर्तन व प्रशासनाचे पाणीटंचाईसाठीचे नियोजन व उपाय या सार्‍या गोष्टीमुळे यंदा पाणीटंचाईची झळ कमी बसली आहे.

येवला : तालुक्यात यंदा पाणीटंचाई प्रश्न मागील वर्षीच्या तुलनेत कमी भेडसावत असून, केवळ १४ गावे व नऊ वाड्यांना, सहा टँकरद्वारा पाणीटंचाई प्रश्नी येवलेकरांना दिलासापाणीपुरवठा केला जात आहे. मागील वर्षी २८ मेपर्यंत ४९ गावांसह ३७ वाड्यांवर पाणीटंचाईची झळ जाणवली होती व तब्बल २५ टँकरद्वारा पाणीपुरवठा केला गेला होता. ३८ गाव पाणीपुरवठ्यासह पालखेडचे आवर्तन व प्रशासनाचे पाणीटंचाईसाठीचे नियोजन व उपाय या सार्‍या गोष्टीमुळे यंदा पाणीटंचाईची झळ कमी बसली आहे. येवला पंचायत समिती प्रशासनाने सन २०१३-१४ साठी पाणीटंचाई कृती नियोजन आराखड्यात तिसर्‍या टप्यात एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत ५४ गावे व ३३ वाड्या अशा एकूण ८७ ठिकाणी पाणी पोहचवावे लागेल असे नियोजन केले होते. परंतु या नियोजनात ५४ प्रस्तावित गावांपैकी केवळ १४ गावांना, तर ३३ वाड्यांपैकी केवळ सहा वाड्यांनाच पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती आहे. प्रशासनाने गृहीत धरलेल्या गावांपैकी केवळ २५ टक्के गावे, २० टक्के वाड्यांनाच पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे लागले. तालुक्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत निश्चित सुधारणा झाल्याची आकडेवारी आहे. सध्या खैरगव्हाण, तांदूळवाडी, गोपाळवाडी या तीन ठिकाणची पाणी टँकर मागणी येवला पंचायत समितीकडे आली आहे. येत्या दोन दिवसांत टँकर मंजुरीचे अधिकारही स्थानिक प्रांत कार्यालयाकडे येण्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे. यामुळे गावांकडून मागणी आली की, तत्काळ सर्वे व प्रत्यक्ष पाहणी व आवश्यक तेथे टँकर अशी भूमिका तहसीलदार शरद मंडलिक यांची आहे.