शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पाणीटंचाई प्रश्नी येवलेकरांना दिलासा

By admin | Updated: May 27, 2014 17:00 IST

पालखेडचे आवर्तन व प्रशासनाचे पाणीटंचाईसाठीचे नियोजन व उपाय या सार्‍या गोष्टीमुळे यंदा पाणीटंचाईची झळ कमी बसली आहे.

येवला : तालुक्यात यंदा पाणीटंचाई प्रश्न मागील वर्षीच्या तुलनेत कमी भेडसावत असून, केवळ १४ गावे व नऊ वाड्यांना, सहा टँकरद्वारा पाणीटंचाई प्रश्नी येवलेकरांना दिलासापाणीपुरवठा केला जात आहे. मागील वर्षी २८ मेपर्यंत ४९ गावांसह ३७ वाड्यांवर पाणीटंचाईची झळ जाणवली होती व तब्बल २५ टँकरद्वारा पाणीपुरवठा केला गेला होता. ३८ गाव पाणीपुरवठ्यासह पालखेडचे आवर्तन व प्रशासनाचे पाणीटंचाईसाठीचे नियोजन व उपाय या सार्‍या गोष्टीमुळे यंदा पाणीटंचाईची झळ कमी बसली आहे. येवला पंचायत समिती प्रशासनाने सन २०१३-१४ साठी पाणीटंचाई कृती नियोजन आराखड्यात तिसर्‍या टप्यात एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत ५४ गावे व ३३ वाड्या अशा एकूण ८७ ठिकाणी पाणी पोहचवावे लागेल असे नियोजन केले होते. परंतु या नियोजनात ५४ प्रस्तावित गावांपैकी केवळ १४ गावांना, तर ३३ वाड्यांपैकी केवळ सहा वाड्यांनाच पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती आहे. प्रशासनाने गृहीत धरलेल्या गावांपैकी केवळ २५ टक्के गावे, २० टक्के वाड्यांनाच पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे लागले. तालुक्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत निश्चित सुधारणा झाल्याची आकडेवारी आहे. सध्या खैरगव्हाण, तांदूळवाडी, गोपाळवाडी या तीन ठिकाणची पाणी टँकर मागणी येवला पंचायत समितीकडे आली आहे. येत्या दोन दिवसांत टँकर मंजुरीचे अधिकारही स्थानिक प्रांत कार्यालयाकडे येण्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे. यामुळे गावांकडून मागणी आली की, तत्काळ सर्वे व प्रत्यक्ष पाहणी व आवश्यक तेथे टँकर अशी भूमिका तहसीलदार शरद मंडलिक यांची आहे.