शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा : कसमादे पट्ट्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; आवर्तनादरम्यान राहाणार भारनियमन चणकापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:11 IST

कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी आज दिले.

ठळक मुद्दे५०० दशलक्ष घनफूट बिगर सिंचनासाठी आवर्तन देणे शक्य ठराव जोडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी आज दिले. आर्वतनाच्या माध्यमातून गिरणा नदीपात्रात १० दिवस १००० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येणार असल्याने कसमादे पट्ट्यातील गिरणा काठाला दिलासा मिळाला आहे. चणकापूर धरणातून कळवण नगरपंचायत, सटाणा नगर परिषद, देवळा ग्रामीण पाणीपुरवठा योजना, दाभाडी बारा गाव पाणीपुरवठा योजना, लखमापूर, ब्राह्मणगाव, लोहोणेर, ठेंगोडा आदी पाणीपुरवठा योजनांसाठी ५०० दशलक्ष घनफूट बिगर सिंचनासाठी आवर्तन देणे शक्य असल्याचा अहवाल मालेगाव पाटबंधारे विभागाने नाशिकचे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांना सादर केला होता. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी चणकापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश मालेगाव पाटबंधारे विभागाला दिल्याने कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. चणकापूर धरणातून पाणी सोडून कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत आमदार डॉ.राहुल अहेर, जिल्हा बँक अध्यक्ष केदा अहेर, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार यांनी राधाकृष्णन यांच्याकडे मागणी केली होती. संबंधित गावांचे पाणी मागणीचे ठराव जोडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. दि. १० ते १९ एप्रिलपर्यंत दहा दिवस पाण्याचे आवर्तन चालणार असून, या काळात अनधिकृत उपसा करणाºया विद्युत पंपांचा वीजपुरवठा खंडित करावा, आवर्तन कालावधीत पाणीपुरवठा योजना चालू ठेवून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्या आहेत. आवर्तन काळात इंधनावर चालणारे व वीजपंप जप्त करण्याची कारवाई पाटबंधारे विभागाने तातडीने करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. आवर्तनादरम्यान पाण्याचा सिंचनासाठी वापर होणार नाही याबाबत पाटबंधारे विभागाच्या समन्वयाने वीज वितरण कंपनीने भारनियमन करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहे. आवर्तन काळात आदेशाचे पालन न करता मनमानी करणाºयांना प्रशासनाच्या वतीने चाप लावला जाणार असून, याबाबत वीज वितरण कंपनी, मालेगाव पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन यांना याबाबत सुचित करण्यात आले आहे.