शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा : कसमादे पट्ट्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; आवर्तनादरम्यान राहाणार भारनियमन चणकापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:11 IST

कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी आज दिले.

ठळक मुद्दे५०० दशलक्ष घनफूट बिगर सिंचनासाठी आवर्तन देणे शक्य ठराव जोडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी आज दिले. आर्वतनाच्या माध्यमातून गिरणा नदीपात्रात १० दिवस १००० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येणार असल्याने कसमादे पट्ट्यातील गिरणा काठाला दिलासा मिळाला आहे. चणकापूर धरणातून कळवण नगरपंचायत, सटाणा नगर परिषद, देवळा ग्रामीण पाणीपुरवठा योजना, दाभाडी बारा गाव पाणीपुरवठा योजना, लखमापूर, ब्राह्मणगाव, लोहोणेर, ठेंगोडा आदी पाणीपुरवठा योजनांसाठी ५०० दशलक्ष घनफूट बिगर सिंचनासाठी आवर्तन देणे शक्य असल्याचा अहवाल मालेगाव पाटबंधारे विभागाने नाशिकचे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांना सादर केला होता. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी चणकापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश मालेगाव पाटबंधारे विभागाला दिल्याने कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. चणकापूर धरणातून पाणी सोडून कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत आमदार डॉ.राहुल अहेर, जिल्हा बँक अध्यक्ष केदा अहेर, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार यांनी राधाकृष्णन यांच्याकडे मागणी केली होती. संबंधित गावांचे पाणी मागणीचे ठराव जोडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. दि. १० ते १९ एप्रिलपर्यंत दहा दिवस पाण्याचे आवर्तन चालणार असून, या काळात अनधिकृत उपसा करणाºया विद्युत पंपांचा वीजपुरवठा खंडित करावा, आवर्तन कालावधीत पाणीपुरवठा योजना चालू ठेवून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्या आहेत. आवर्तन काळात इंधनावर चालणारे व वीजपंप जप्त करण्याची कारवाई पाटबंधारे विभागाने तातडीने करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. आवर्तनादरम्यान पाण्याचा सिंचनासाठी वापर होणार नाही याबाबत पाटबंधारे विभागाच्या समन्वयाने वीज वितरण कंपनीने भारनियमन करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहे. आवर्तन काळात आदेशाचे पालन न करता मनमानी करणाºयांना प्रशासनाच्या वतीने चाप लावला जाणार असून, याबाबत वीज वितरण कंपनी, मालेगाव पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन यांना याबाबत सुचित करण्यात आले आहे.