शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
2
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
3
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
4
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
5
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
6
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर १५० देश..; इतके टक्के शुल्क लादण्याची तयारी, भारतावर किती?
8
लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!
9
'मुंबईत मराठीतून नमाज पठण करा'; नितेश राणेंवर असदुद्दीन ओवेसींचा पलटवार; म्हणाले...
10
"हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात..."; प्रकाश आंबेडकरांचा आनंदराज आंबेडकरांना खरमरीत प्रश्न
11
मार्क झुकरबर्गविरोधात खटला सुरू; ८ अब्ज डॉलर्सचं आहे प्रकरण, काय आहे कारण?
12
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
13
Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू
14
एका भाजी विक्रेत्याच्या भांडणाने पेटले इस्रायल-सीरिया युद्ध; आतापर्यंत ३०० लोकांचा मृत्यू...
15
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
16
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
17
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा
18
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
19
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
20
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?

दिलासा : कसमादे पट्ट्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; आवर्तनादरम्यान राहाणार भारनियमन चणकापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:11 IST

कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी आज दिले.

ठळक मुद्दे५०० दशलक्ष घनफूट बिगर सिंचनासाठी आवर्तन देणे शक्य ठराव जोडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कळवण : कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याची सोडवणूक करण्यासाठी चणकापूर धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी आज दिले. आर्वतनाच्या माध्यमातून गिरणा नदीपात्रात १० दिवस १००० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येणार असल्याने कसमादे पट्ट्यातील गिरणा काठाला दिलासा मिळाला आहे. चणकापूर धरणातून कळवण नगरपंचायत, सटाणा नगर परिषद, देवळा ग्रामीण पाणीपुरवठा योजना, दाभाडी बारा गाव पाणीपुरवठा योजना, लखमापूर, ब्राह्मणगाव, लोहोणेर, ठेंगोडा आदी पाणीपुरवठा योजनांसाठी ५०० दशलक्ष घनफूट बिगर सिंचनासाठी आवर्तन देणे शक्य असल्याचा अहवाल मालेगाव पाटबंधारे विभागाने नाशिकचे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांना सादर केला होता. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी चणकापूर धरणातून पाणी सोडण्याचे आदेश मालेगाव पाटबंधारे विभागाला दिल्याने कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. चणकापूर धरणातून पाणी सोडून कसमादे पट्ट्यातील पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत आमदार डॉ.राहुल अहेर, जिल्हा बँक अध्यक्ष केदा अहेर, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार यांनी राधाकृष्णन यांच्याकडे मागणी केली होती. संबंधित गावांचे पाणी मागणीचे ठराव जोडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. दि. १० ते १९ एप्रिलपर्यंत दहा दिवस पाण्याचे आवर्तन चालणार असून, या काळात अनधिकृत उपसा करणाºया विद्युत पंपांचा वीजपुरवठा खंडित करावा, आवर्तन कालावधीत पाणीपुरवठा योजना चालू ठेवून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्या आहेत. आवर्तन काळात इंधनावर चालणारे व वीजपंप जप्त करण्याची कारवाई पाटबंधारे विभागाने तातडीने करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. आवर्तनादरम्यान पाण्याचा सिंचनासाठी वापर होणार नाही याबाबत पाटबंधारे विभागाच्या समन्वयाने वीज वितरण कंपनीने भारनियमन करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहे. आवर्तन काळात आदेशाचे पालन न करता मनमानी करणाºयांना प्रशासनाच्या वतीने चाप लावला जाणार असून, याबाबत वीज वितरण कंपनी, मालेगाव पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन यांना याबाबत सुचित करण्यात आले आहे.