शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

द्राक्षपंढरीला दुष्काळाचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 17:53 IST

सायखेडा : यंदाच्या वर्षाला म्हणावा तसा पाऊस बरसलाच नसल्याने जिल्हा भरात दुष्काळचे सावट पसरलेले आहे. अशात आहे ती पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत असतांना विविध उपाय योजना करत असतांना पाणी बचतीसाठी ऊसाचे पाचट संजीवनी ठरत आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईवर जिल्ह्यात निफाडच्या पाचटाला मागणी

सायखेडा : यंदाच्या वर्षाला म्हणावा तसा पाऊस बरसलाच नसल्याने जिल्हा भरात दुष्काळचे सावट पसरलेले आहे. अशात आहे ती पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत असतांना विविध उपाय योजना करत असतांना पाणी बचतीसाठी ऊसाचे पाचट संजीवनी ठरत आहे.सधनतेचा डंका वाजवणाऱ्या निफाड तालुक्याला दुष्काळी परीस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्याचे प्रमुख पिक असणाºया द्राक्ष बागांना याची झळ बसत असल्यामुळे जवळपास बावीस हजार हेक्टरहुन आधिक क्षेत्रात अता पाणी टंचाई वर प्रभावी उपाय म्हणुन ऊसाचे पाचट ठरले आहे. त्यामुळे निफाडच्या ऊसाच्या पाचटांच्या गाठीना जिल्हाभरातुन मागणी वाढली आहे.निफाड तालुक्यात गोदावरी कादवा बाणगंगा सह नांदुरमध्यमेश्वर धरण, कालवे यामुळे बागायती क्षेत्र वाढले. परंतु वाढती लोकसंख्या आणि पाण्याच्या श्रोतांवर येणारा ताण यामुळे दरवर्षी दुष्काळ परीस्थिती निर्माण होवु लागली आहे.या परीस्थीतीत तालुक्याच्या सर्वच भागात असणाºया द्राक्षशेतीला याची धग बसु लागली आहे. परीणामी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या बागांना वाचविण्यासाठी शेतकरी टॅँकरने पाणी विकत घेवुन पिक जगवण्याचा प्रयत्न करत आहे. द्राक्षबरोबरच तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने टंचाई काळात उस द्राक्षबागांसाठी वरदान ठरत आहे. सध्या तालुक्यातील ऊसाच हंगाम भरात आला आहे. या ऊसाच्या फडातील शिल्लक राहिलेले पाचटाच्या मशिनच्या साह्याने गाठी तयार करुन त्या द्राक्षबागांसाठी पुरवली जात आहे. हे पाचट द्राक्षबागांच्या गल्यात टाकल्यामुळे एकरात लाखो लीटर पाण्याची बचत होवु लागल्यामुळे नाशिक, दिंडोरी, चांदवड, वणी, येवला, सिन्नर, कोपरगाव, कसमा पट्टा तसेच द्राक्षपंढरीतील गावांत पाणी बचतीसाठी ऊसाचे पाचट वापरले जावु लागले आहेत. ऊसाचे रान खाली झाल्यावर पाचटांच्या गाठी तयार केल्या जात आहे. एक गाठ साधरण स्थानिक तीस तर बाहेर अंतरानुसार साठ रुपयांपर्यत मिळते. त्यागाठीत जवळपास द्राक्षबागेतील पाचते सहा झाडे होतात त्यामुळे जिल्हाभरातील शेतकरी आपल्या बागांत पाचट टाकण्याचा कल वाढला आहे.फायदे१) द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत.२) द्राक्षांच्या मुळ्यांची वाढ होते.३) जमीनीचा पोत राखला जातो.४) जमिन भुसभुशीत होते.५) शेतातत सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढते.६) ऐकरात २५० ते तीनशे गाठी.७) ऐक आयशरमध्ये २५० गाठी.८) उस उत्पादक शेतकर्यांना चार रु पये गाठ.९) स्थानिक द्राक्षबागायता दारांना तीस रु पये.१०) बाहेरील शेतकºयांसाठी ५५ ते ६० रु पये गाठ.चौकटतालुक्यात यंदा अपेक्षीत पाऊस बरसला नाही आॅक्टोबर महिन्यापासुनच पाणी टंचाईचा फटका बसु लागल्यामुळे शेतकरी आता ऊसाच्या पाचटापासुन मल्चींग करत आपल्या बागांना पाणी देत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होवुन त्यावर मात होत आहे.- शहाजी राजोळे,द्राक्षउत्पादक शेतकरी.