शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

गंभीरवाडी येथे पिण्याच्या पाण्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 19:26 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील गंभीरवाडी येथील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर समृद्धी महामार्गामध्ये गेली असून सदर विहिरीच्या लगत असलेला आजूबाजूचा भूखंड खोदकाम केल्याने विहिरीत पावसाचे गढूळ पाणी साचले असल्यामुळे जवळपास अंदाजे चौदाशे ते पंधराशे लोकसंख्या असलेल्या गंभीरवाडी ग्रामस्थांना मॅहनाभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसाळ्यात संघर्ष करावा लागत आहे.

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील गंभीरवाडी येथील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर समृद्धी महामार्गामध्ये गेली असून सदर विहिरीच्या लगत असलेला आजूबाजूचा भूखंड खोदकाम केल्याने विहिरीत पावसाचे गढूळ पाणी साचले असल्यामुळे जवळपास अंदाजे चौदाशे ते पंधराशे लोकसंख्या असलेल्या गंभीरवाडी ग्रामस्थांना मॅहनाभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसाळ्यात संघर्ष करावा लागत आहे.केवळ समृद्धी महामार्गाच्या खोदकाम कामकाजामूळे येथील सार्वजनिक विहिरीवरचा ग्रामस्थांसाठी असलेला रस्ता बंद झाला व सदर खोदलेल्या भागामुळे खड्ड्यातील विहिरीत पावसाचे गढूळ पाणी साचल्याने व पर्यायी मार्ग नसल्याने पिण्यासाठी शुद्ध पाणी या ग्रामस्थांना मिळत नाही.तसेच ग्रामपंचायत ने केलेल्या पर्यायी मार्गाने जवळपास चार किलोमीटर दूर अंतरावरून सुविधा केलेले पाणी तीन चार दिवसानंतर येथील वाडीतील पाण्याच्या टाकीत येते परंतु सदर पाण्याची देखील दुरवस्था झालेली असल्याने येथील ग्रामस्थांना ते पाणी सुद्धा गढूळ स्थितीत मिळत आहे.परिणामी येथील ग्रामस्थ याच पाण्यावर अवलंबून आहेत.स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी पदाधिकारी यांनी देखील या प्रश्नाकडे कानाडोळा केला आहे.तरी ही पिण्याच्या पाण्याची सुविधा व हा मूलभूत प्रश्न स्थानिक प्रशासनाने व लोप्रतिनिधी यांनी लवकरात सोडवावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.प्रतिक्रि या :चालू वर्षी सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती असतांना भर उन्हाळ्यात आमच्या ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष केलीच परंतु ऐन पावसाळ्यात देखील आम्हांला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर याच्या सारखं दुसरं दुर्दैव कुठलं समजावं.आता तरी हा तीव्र ज्वलंत प्रश्न सोडवावा अशी आमची प्रमुख मागणी आहे.- जगदीश डगळे (ग्रामस्थ गंभीरवाडी)फोटो : समृद्धी महामार्गाच्या खोदकामामुळे गंभीरवाडीतील सार्वजनिक विहिरीत साचलेले पावसाचे गढूळ पाणी तर दुसर्या छायाचित्रात समृध्दी महामार्गाचे झालेले खोदकाम.(फोटो स्वतंत्र पाठवतो.)