शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

नाव पिण्याचे... वापर शेतीसाठी

By admin | Updated: February 8, 2016 22:46 IST

धरणांमध्ये २२ टक्के साठा : लोकप्रतिनिधींच्या दबावाने प्रशासन मेटाकुटीस

नाशिक : जानेवारी अखेर जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम शिल्लक असलेला २२ टक्के जलसाठा जुलै अखेरपर्यंत धरणांमध्ये टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासन व पाटबंधारे खात्यापुढे उभे ठाकले असताना, आत्तापासूनच ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याची ओरड करीत, जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघातील शेतीपिकासाठी धरणातून पाणी सोडण्यासाठी दबाव वाढविला आहे. दर दिवसाआड शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कार्यालयाला हजेरी लावणाऱ्या आमदार-खासदारांच्या दबावामुळे प्रशासनही मेटाकुटीस आले असून, धरणाच्या पाण्याचे नियोजन ही अधिकाऱ्यांसाठी नवीन डोकेदुखी वाटू लागली आहे. गंगापूर धरण समूहातील उपलब्ध पाणी व नाशिक शहरवासीयांची तहान पाहता, पाणीकपातीवरून अगोदरच भाजपाविरुद्ध सर्वपक्षीय असे राजकारण रंगले आहे, तर दारणा धरणातील पाण्यावरून सिन्नर व इगतपुरी यांच्यातही चढाओढ सुरू आहे. चणकापूर, पुनंदच्या पाण्यावरून मालेगाव, बागलाण, कळवण, देवळा असा वाद सुरू असताना तोच प्रकार ओझरखेड धरणाच्या पाचशे दशलक्ष घनफूट पाण्यासाठी दिंडोरी, बागलाण, देवळा व निफाड या तालुक्यांतील आमदारांकडून दबाव टाकला जात आहे. नांदगाव, मनमाडसाठी माणिकपुंज धरणावर डोळा ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये जेमतेम साठा व त्यातही विविध प्रयोजनासाठी राखून ठेवलेले पाणी त्या त्या वेळी व मुदतीत वापरण्याचे नियोजन नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेले असताना आता छाटणीला आलेल्या द्राक्षबागा व कापणीला आलेल्या कांद्यासाठी अखेरचे आवर्तन मिळावे, यासाठी लोकप्रतिनिधींकडून पाण्याचे राजकारण सुरू झाले आहे. या राजकारणात सत्ताधारी पक्षाचे मंत्रीही आपला सहभाग लपवू शकलेले नाहीत. जलसंपदा खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद भाजपाच्या ताब्यात म्हणजे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असल्याने नाशिक महापालिकेने पाणी कपात करू नये म्हणून पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप जसा आहे, तसाच चणकापूर धरणातून मालेगावसाठी तळवाडे साठवण तलावात पाणी सोडण्यासाठी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांचा वाढता दबाव आहे. निफाड तालुक्यातील फळबागांसाठी जलसंपदाराज्यमंत्री विजय शिवतारे यांनी वेळोवेळी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांवर आपला दबाव कायम ठेवला आहे. दर दिवसाआड पाण्यासाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकत आहेत. पाण्याची उपलब्धता, वाढती मागणी व राजकीय दबाव पाहता परिस्थिती हाताळताना अधिकाऱ्यांची दमछाक होऊ लागली आहे.