शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नाव पिण्याचे... वापर शेतीसाठी

By admin | Updated: February 8, 2016 22:46 IST

धरणांमध्ये २२ टक्के साठा : लोकप्रतिनिधींच्या दबावाने प्रशासन मेटाकुटीस

नाशिक : जानेवारी अखेर जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम शिल्लक असलेला २२ टक्के जलसाठा जुलै अखेरपर्यंत धरणांमध्ये टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासन व पाटबंधारे खात्यापुढे उभे ठाकले असताना, आत्तापासूनच ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याची ओरड करीत, जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघातील शेतीपिकासाठी धरणातून पाणी सोडण्यासाठी दबाव वाढविला आहे. दर दिवसाआड शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कार्यालयाला हजेरी लावणाऱ्या आमदार-खासदारांच्या दबावामुळे प्रशासनही मेटाकुटीस आले असून, धरणाच्या पाण्याचे नियोजन ही अधिकाऱ्यांसाठी नवीन डोकेदुखी वाटू लागली आहे. गंगापूर धरण समूहातील उपलब्ध पाणी व नाशिक शहरवासीयांची तहान पाहता, पाणीकपातीवरून अगोदरच भाजपाविरुद्ध सर्वपक्षीय असे राजकारण रंगले आहे, तर दारणा धरणातील पाण्यावरून सिन्नर व इगतपुरी यांच्यातही चढाओढ सुरू आहे. चणकापूर, पुनंदच्या पाण्यावरून मालेगाव, बागलाण, कळवण, देवळा असा वाद सुरू असताना तोच प्रकार ओझरखेड धरणाच्या पाचशे दशलक्ष घनफूट पाण्यासाठी दिंडोरी, बागलाण, देवळा व निफाड या तालुक्यांतील आमदारांकडून दबाव टाकला जात आहे. नांदगाव, मनमाडसाठी माणिकपुंज धरणावर डोळा ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये जेमतेम साठा व त्यातही विविध प्रयोजनासाठी राखून ठेवलेले पाणी त्या त्या वेळी व मुदतीत वापरण्याचे नियोजन नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेले असताना आता छाटणीला आलेल्या द्राक्षबागा व कापणीला आलेल्या कांद्यासाठी अखेरचे आवर्तन मिळावे, यासाठी लोकप्रतिनिधींकडून पाण्याचे राजकारण सुरू झाले आहे. या राजकारणात सत्ताधारी पक्षाचे मंत्रीही आपला सहभाग लपवू शकलेले नाहीत. जलसंपदा खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद भाजपाच्या ताब्यात म्हणजे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असल्याने नाशिक महापालिकेने पाणी कपात करू नये म्हणून पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप जसा आहे, तसाच चणकापूर धरणातून मालेगावसाठी तळवाडे साठवण तलावात पाणी सोडण्यासाठी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांचा वाढता दबाव आहे. निफाड तालुक्यातील फळबागांसाठी जलसंपदाराज्यमंत्री विजय शिवतारे यांनी वेळोवेळी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांवर आपला दबाव कायम ठेवला आहे. दर दिवसाआड पाण्यासाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकत आहेत. पाण्याची उपलब्धता, वाढती मागणी व राजकीय दबाव पाहता परिस्थिती हाताळताना अधिकाऱ्यांची दमछाक होऊ लागली आहे.