शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

‘पीएं’चे खरे नाही!

By admin | Updated: June 18, 2014 01:00 IST

‘पीएं’चे खरे नाही!

सरकार बदलते, धोरणे बदलतात, ती राबविणारे मंत्रीही बदलतात, पण सत्तेच्या परिघात कायम राहतात, ती मंत्र्यांची ‘पीए’ म्हणजे स्वीय सहाय्यक मंडळी. वर्षानुवर्षांपासून राज्यांमध्ये काय किंवा केन्द्रामध्ये काय, हीच स्थिती. मंत्री जुना असेल तर आपल्या जुन्या सहकाऱ्यांना म्हणजे पीएंना सोडीत नाही आणि नवा असेल तर, बुजुर्गांचे मार्गदर्शन घेऊन तरबेजांना जवळ करतो. याची कारणे बहुधा हीच असावीत की, सरकारी कारभारातील गुंतागुंत आणि क्लिष्टता भोवळ आणणारी ठरत असल्याने, सरकारी कारभार चालविण्यासारख्या अनुत्पादक बाबींमध्ये लक्ष घालून मेंदू शिणविण्यापेक्षा मंत्र्यांना त्याहून महत्वाच्या आणि उत्पादक गोष्टींमध्ये लक्ष घालणे श्रेयस्कर वाटत असावे. त्याचा परिणाम मग एकच घडून येतो. पीए मंडळीच मंत्र्यासारखे वागू लागतात. आपले स्वतंत्र हितसंबंध निर्माण करतात. मंत्र्याच्या नावाने वाट्टेल ते उद्योग करतात आणि पुन्हा करुन सवरुन नामानिराळे होतात. ही बाब सरकारच्या कधी लक्षातच आली नाही असे नव्हे, विलंबाने का होईना ती आली आणि चार वर्षांपूर्वी केन्द्र सरकारने एक अध्यादेशच जारी केला. या अध्यादेशानुसार ज्या स्वीय सहाय्यकांनी एकत्रितपणे सलग दहा वर्षे कोणत्या ना कोणत्या मंत्र्याची सेवा केली असेल, त्याची रवानगी सरळ त्याच्या मूळ खात्यात करावी आणि नव्या लोकाना संधी द्यावी. पण या अध्यादेशाकडे सर्व मंत्र्यांनी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. नव्याने सत्तारुढ झालेल्या मोदी सरकारने आणि खरे तर स्वत: पंतप्रधान मोदी यांनी मात्र तोच अध्यादेश नव्याने जारी करुन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची सक्तीच केली आहे. परंतु तितकेच नाही तर मोदींनी आपल्या मंत्र्यांवर आणखीदेखील काही ‘जाचक’ निर्बन्ध लागू केले आहेत. त्यात नातलगांना पीए नेमू नये, व्यापारधंद्यात भागीदारी करु नये, नातलगांना परदेशात नोकऱ्यांना पाठवू नये, अशा काही बाबी आहेत. नव्या मंत्र्यांनाही त्या जाचक ठरु लागल्याने त्यांनी रदबदलीचा प्रयत्न करुन पाहिला खरा, पण अजून तरी त्यांची डाळ शिजलेली नाही. - मनकवडा