शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएं’चे खरे नाही!

By admin | Updated: June 18, 2014 01:00 IST

‘पीएं’चे खरे नाही!

सरकार बदलते, धोरणे बदलतात, ती राबविणारे मंत्रीही बदलतात, पण सत्तेच्या परिघात कायम राहतात, ती मंत्र्यांची ‘पीए’ म्हणजे स्वीय सहाय्यक मंडळी. वर्षानुवर्षांपासून राज्यांमध्ये काय किंवा केन्द्रामध्ये काय, हीच स्थिती. मंत्री जुना असेल तर आपल्या जुन्या सहकाऱ्यांना म्हणजे पीएंना सोडीत नाही आणि नवा असेल तर, बुजुर्गांचे मार्गदर्शन घेऊन तरबेजांना जवळ करतो. याची कारणे बहुधा हीच असावीत की, सरकारी कारभारातील गुंतागुंत आणि क्लिष्टता भोवळ आणणारी ठरत असल्याने, सरकारी कारभार चालविण्यासारख्या अनुत्पादक बाबींमध्ये लक्ष घालून मेंदू शिणविण्यापेक्षा मंत्र्यांना त्याहून महत्वाच्या आणि उत्पादक गोष्टींमध्ये लक्ष घालणे श्रेयस्कर वाटत असावे. त्याचा परिणाम मग एकच घडून येतो. पीए मंडळीच मंत्र्यासारखे वागू लागतात. आपले स्वतंत्र हितसंबंध निर्माण करतात. मंत्र्याच्या नावाने वाट्टेल ते उद्योग करतात आणि पुन्हा करुन सवरुन नामानिराळे होतात. ही बाब सरकारच्या कधी लक्षातच आली नाही असे नव्हे, विलंबाने का होईना ती आली आणि चार वर्षांपूर्वी केन्द्र सरकारने एक अध्यादेशच जारी केला. या अध्यादेशानुसार ज्या स्वीय सहाय्यकांनी एकत्रितपणे सलग दहा वर्षे कोणत्या ना कोणत्या मंत्र्याची सेवा केली असेल, त्याची रवानगी सरळ त्याच्या मूळ खात्यात करावी आणि नव्या लोकाना संधी द्यावी. पण या अध्यादेशाकडे सर्व मंत्र्यांनी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. नव्याने सत्तारुढ झालेल्या मोदी सरकारने आणि खरे तर स्वत: पंतप्रधान मोदी यांनी मात्र तोच अध्यादेश नव्याने जारी करुन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची सक्तीच केली आहे. परंतु तितकेच नाही तर मोदींनी आपल्या मंत्र्यांवर आणखीदेखील काही ‘जाचक’ निर्बन्ध लागू केले आहेत. त्यात नातलगांना पीए नेमू नये, व्यापारधंद्यात भागीदारी करु नये, नातलगांना परदेशात नोकऱ्यांना पाठवू नये, अशा काही बाबी आहेत. नव्या मंत्र्यांनाही त्या जाचक ठरु लागल्याने त्यांनी रदबदलीचा प्रयत्न करुन पाहिला खरा, पण अजून तरी त्यांची डाळ शिजलेली नाही. - मनकवडा