शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

नाट्यचळवळ संपेल, प्रेक्षकही दुरावतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 01:09 IST

नाशिक : नाटकांना नेहमी रंगभूमी चळवळ संबोधले जाते आणि नाटकाचा प्रयोग असतो. याचा विचार केला तर ही चळवळ व्यावसायिक नाही हे लक्षात येते. नाशिकमध्ये मुंबईतील संस्थांची नाटके येतात कारण रसिक प्रेक्षक तसे आहेत, परंतु एकमेव सुसज्ज नाट्यमंदिराची इतकी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ असेल तर नाटचळवळ संपेल आणि प्रेक्षकही दुरावतील अशी भीती नाट्य अभिनेता भरत जाधव यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देभरत जाधव : व्यावसायिक कार्यक्रमांमधून दराची भरपाई करावी

संजय पाठक ।नाशिक : नाटकांना नेहमी रंगभूमी चळवळ संबोधले जाते आणि नाटकाचा प्रयोग असतो. याचा विचार केला तर ही चळवळ व्यावसायिक नाही हे लक्षात येते. नाशिकमध्ये मुंबईतील संस्थांची नाटके येतात कारण रसिक प्रेक्षक तसे आहेत, परंतु एकमेव सुसज्ज नाट्यमंदिराची इतकी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ असेल तर नाटचळवळ संपेल आणि प्रेक्षकही दुरावतील अशी भीती नाट्य अभिनेता भरत जाधव यांनी व्यक्त केली आहे.नाट्यगृह सुसज्ज चांगलेच आहेत त्याच्या भरपाईसाठी दरवाढ करावी लागत असेल तर मग व्यावसायिक परिषदा आणि तत्सम कार्यक्रमांसाठी करावी आणि नाटकांसाठी मात्र दर कमी ठेवून व्यावायिक कार्यक्रमांच्या दरातून त्याची भरपाई करावी, अशी सूचनाही जाधव यांनी केली आहे.महाकवी कालिदास कलामंदिराच्या दुरवस्थेबाबत मी आणि माझ्यासारख्या कलावंतांनीच आवाज उठवला होता. त्यामुळे कलामंदिरात सुधारणा झाली हे खूपच चांगले झाले. परंतु अवस्था वाईट असतानाही मुंबईच्या संस्था नाशिकमध्ये नाटकं लावत होत्या आणि आता नाट्यगृह चांगले झाले तर नाटके लावता येणार नाही अशी अवस्था होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नाटकाच्या बाबतीत नेहमीच ती एक चळवळ असल्याचे मानले जाते. नाटकांचे प्रयोग लावले जातात, असा शब्द प्रयोग केला जातो. त्यातून नाट्य चळवळीचे वेगळे स्वरूप लक्षात येते. सध्या वेगवेगळ्या विषयांची हाताळणी करणारी नाटके येत आहेत. अशी नाटके नाशिकमध्ये व्हावीत अशीमुंबईच्या संस्थांची इच्छा असते. कारण नाशिकला नाटकाचे चांगले वातावरण आहे आणि प्रेक्षकही आहेत. कालिदासची अवस्था चांगली नसतानाही तेनाटकांना येतात. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात भाडेवाढ झाली तर नाशिकला नाटक करणे कठीण होईल, असेही ते म्हणाले. नाट्यरसिकांची एक पिढी संपत असताना तरुण रसिक प्रेक्षक तयार झाले पाहिजेत, त्यासाठीच नाट्यसंस्था वेगवेगळ्या विषयांची आणि प्रयोगांची हाताळणी करीत आहेत. परंतु नाटके झाली नाही तर नाट्यगृहांचा प्रेक्षक घडणार नाही. अर्थात, शासन किंवा महापालिका असे होऊ देणार नाही नाटकाचे दर कमी करतील, असा विश्वास आहे.