शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यचळवळ संपेल, प्रेक्षकही दुरावतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 01:09 IST

नाशिक : नाटकांना नेहमी रंगभूमी चळवळ संबोधले जाते आणि नाटकाचा प्रयोग असतो. याचा विचार केला तर ही चळवळ व्यावसायिक नाही हे लक्षात येते. नाशिकमध्ये मुंबईतील संस्थांची नाटके येतात कारण रसिक प्रेक्षक तसे आहेत, परंतु एकमेव सुसज्ज नाट्यमंदिराची इतकी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ असेल तर नाटचळवळ संपेल आणि प्रेक्षकही दुरावतील अशी भीती नाट्य अभिनेता भरत जाधव यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देभरत जाधव : व्यावसायिक कार्यक्रमांमधून दराची भरपाई करावी

संजय पाठक ।नाशिक : नाटकांना नेहमी रंगभूमी चळवळ संबोधले जाते आणि नाटकाचा प्रयोग असतो. याचा विचार केला तर ही चळवळ व्यावसायिक नाही हे लक्षात येते. नाशिकमध्ये मुंबईतील संस्थांची नाटके येतात कारण रसिक प्रेक्षक तसे आहेत, परंतु एकमेव सुसज्ज नाट्यमंदिराची इतकी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ असेल तर नाटचळवळ संपेल आणि प्रेक्षकही दुरावतील अशी भीती नाट्य अभिनेता भरत जाधव यांनी व्यक्त केली आहे.नाट्यगृह सुसज्ज चांगलेच आहेत त्याच्या भरपाईसाठी दरवाढ करावी लागत असेल तर मग व्यावसायिक परिषदा आणि तत्सम कार्यक्रमांसाठी करावी आणि नाटकांसाठी मात्र दर कमी ठेवून व्यावायिक कार्यक्रमांच्या दरातून त्याची भरपाई करावी, अशी सूचनाही जाधव यांनी केली आहे.महाकवी कालिदास कलामंदिराच्या दुरवस्थेबाबत मी आणि माझ्यासारख्या कलावंतांनीच आवाज उठवला होता. त्यामुळे कलामंदिरात सुधारणा झाली हे खूपच चांगले झाले. परंतु अवस्था वाईट असतानाही मुंबईच्या संस्था नाशिकमध्ये नाटकं लावत होत्या आणि आता नाट्यगृह चांगले झाले तर नाटके लावता येणार नाही अशी अवस्था होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नाटकाच्या बाबतीत नेहमीच ती एक चळवळ असल्याचे मानले जाते. नाटकांचे प्रयोग लावले जातात, असा शब्द प्रयोग केला जातो. त्यातून नाट्य चळवळीचे वेगळे स्वरूप लक्षात येते. सध्या वेगवेगळ्या विषयांची हाताळणी करणारी नाटके येत आहेत. अशी नाटके नाशिकमध्ये व्हावीत अशीमुंबईच्या संस्थांची इच्छा असते. कारण नाशिकला नाटकाचे चांगले वातावरण आहे आणि प्रेक्षकही आहेत. कालिदासची अवस्था चांगली नसतानाही तेनाटकांना येतात. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात भाडेवाढ झाली तर नाशिकला नाटक करणे कठीण होईल, असेही ते म्हणाले. नाट्यरसिकांची एक पिढी संपत असताना तरुण रसिक प्रेक्षक तयार झाले पाहिजेत, त्यासाठीच नाट्यसंस्था वेगवेगळ्या विषयांची आणि प्रयोगांची हाताळणी करीत आहेत. परंतु नाटके झाली नाही तर नाट्यगृहांचा प्रेक्षक घडणार नाही. अर्थात, शासन किंवा महापालिका असे होऊ देणार नाही नाटकाचे दर कमी करतील, असा विश्वास आहे.