शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यचळवळ संपेल, प्रेक्षकही दुरावतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 01:09 IST

नाशिक : नाटकांना नेहमी रंगभूमी चळवळ संबोधले जाते आणि नाटकाचा प्रयोग असतो. याचा विचार केला तर ही चळवळ व्यावसायिक नाही हे लक्षात येते. नाशिकमध्ये मुंबईतील संस्थांची नाटके येतात कारण रसिक प्रेक्षक तसे आहेत, परंतु एकमेव सुसज्ज नाट्यमंदिराची इतकी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ असेल तर नाटचळवळ संपेल आणि प्रेक्षकही दुरावतील अशी भीती नाट्य अभिनेता भरत जाधव यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देभरत जाधव : व्यावसायिक कार्यक्रमांमधून दराची भरपाई करावी

संजय पाठक ।नाशिक : नाटकांना नेहमी रंगभूमी चळवळ संबोधले जाते आणि नाटकाचा प्रयोग असतो. याचा विचार केला तर ही चळवळ व्यावसायिक नाही हे लक्षात येते. नाशिकमध्ये मुंबईतील संस्थांची नाटके येतात कारण रसिक प्रेक्षक तसे आहेत, परंतु एकमेव सुसज्ज नाट्यमंदिराची इतकी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ असेल तर नाटचळवळ संपेल आणि प्रेक्षकही दुरावतील अशी भीती नाट्य अभिनेता भरत जाधव यांनी व्यक्त केली आहे.नाट्यगृह सुसज्ज चांगलेच आहेत त्याच्या भरपाईसाठी दरवाढ करावी लागत असेल तर मग व्यावसायिक परिषदा आणि तत्सम कार्यक्रमांसाठी करावी आणि नाटकांसाठी मात्र दर कमी ठेवून व्यावायिक कार्यक्रमांच्या दरातून त्याची भरपाई करावी, अशी सूचनाही जाधव यांनी केली आहे.महाकवी कालिदास कलामंदिराच्या दुरवस्थेबाबत मी आणि माझ्यासारख्या कलावंतांनीच आवाज उठवला होता. त्यामुळे कलामंदिरात सुधारणा झाली हे खूपच चांगले झाले. परंतु अवस्था वाईट असतानाही मुंबईच्या संस्था नाशिकमध्ये नाटकं लावत होत्या आणि आता नाट्यगृह चांगले झाले तर नाटके लावता येणार नाही अशी अवस्था होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नाटकाच्या बाबतीत नेहमीच ती एक चळवळ असल्याचे मानले जाते. नाटकांचे प्रयोग लावले जातात, असा शब्द प्रयोग केला जातो. त्यातून नाट्य चळवळीचे वेगळे स्वरूप लक्षात येते. सध्या वेगवेगळ्या विषयांची हाताळणी करणारी नाटके येत आहेत. अशी नाटके नाशिकमध्ये व्हावीत अशीमुंबईच्या संस्थांची इच्छा असते. कारण नाशिकला नाटकाचे चांगले वातावरण आहे आणि प्रेक्षकही आहेत. कालिदासची अवस्था चांगली नसतानाही तेनाटकांना येतात. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात भाडेवाढ झाली तर नाशिकला नाटक करणे कठीण होईल, असेही ते म्हणाले. नाट्यरसिकांची एक पिढी संपत असताना तरुण रसिक प्रेक्षक तयार झाले पाहिजेत, त्यासाठीच नाट्यसंस्था वेगवेगळ्या विषयांची आणि प्रयोगांची हाताळणी करीत आहेत. परंतु नाटके झाली नाही तर नाट्यगृहांचा प्रेक्षक घडणार नाही. अर्थात, शासन किंवा महापालिका असे होऊ देणार नाही नाटकाचे दर कमी करतील, असा विश्वास आहे.