शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कनाशीच्या मेनरोडवर सांडपाण्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 18:43 IST

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथील मेनरोडवर सांडपाण्याचे साम्राज्य तयार झाले आहे. त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष झालेले असून त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे व अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांनामधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकळवण : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे नाराजी

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथील मेनरोडवर सांडपाण्याचे साम्राज्य तयार झाले आहे. त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष झालेले असून त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे व अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांनामधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.कनाशी मेनरोडवर कित्येक महिन्यापासून गटारीचे सांडपाणी रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे, रस्त्यावर गटारगंगा झालेली आहे. सदर मोरीचे सिमेंट पाईप चोकअप झाले असल्याने रस्त्यावर सांडपाणीचे साम्राज्य तयार होत आहे. पावसाळ्यात तर नागरिकांना मोठया प्रमाणात या समस्येला तोंड देण्याची वेळ आली होती.नागरिकांच्या घरामधून पावसाळयाचे पाणी वाहत होते. ग्रामपंचायतने संबंधित विभागाला सूचना देऊन सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठलेही कार्यवाही केली गेली नाही. सदर रस्त्यावरून विद्यार्थ्यांना सांडपाण्यामधून ये-जा करावी लागत आहे. तसेच रस्त्यावर सांडपाणी साचत असल्यामुळे तेथे खड्डे तयार होऊन वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.पिंपळा रस्त्यावरील मोरी पुर्णपणे चोकअप झाल्यामुळे कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील सांडपाणी जवळच्याच गटारीत उतरविण्यासाठी कोणतीही उपाय योजना केलेली नाही.मुख्य रस्त्यावरील मोरी बंद झाली असल्याने रस्त्यावरून ये जा करतांना दुर्गंधी पसरत असून सर्वांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. आता या डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांना साथक्षच्या रोगांना सामोरे जावण्याची वेळ येवू लागली आहे. त्यामुळे सदर मोरीे दुरूस्तीचे काम लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी एकनाथ महाले, विलास बोरसे, प्रकाश महाले, प्रंशात गोविंद, योगेश महाले, नारायण बोरसे, अशोक बोरसे, संजय बागुल, काशिनाथ बोरसे, विश्वनाथ बोरसे, दादा पाटील, विवेक पाटील, राजेद जाधव, भास्कर पगार, संतोष बिरारी आदी नागरिकाकडून होत आहे.कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रामभरोसे कारभाराचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.- नितीन बोरसेउपसरपंच, कनाशी.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTravel Tipsट्रॅव्हल टिप्स