शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

निविदाप्रक्रियेतच अडकला खतप्रकल्प

By admin | Updated: April 30, 2015 00:20 IST

चौथ्यांदा काढली निविदा : प्रकल्प चालविण्यासाठी ठेकेदारच मिळेना

नाशिक : महापालिकेच्या मरणासन्न स्थितीत असलेल्या खतप्रकल्पाच्या अवस्थेसंबंधी महासभेत वारंवार गळे काढले जात असतानाच खतप्रकल्प चालविण्यास देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या निविदाप्रक्रियेला ठेकेदारांकडून प्रतिसादच मिळत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. एकीकडे शासन पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता देत नाही आणि दुसरीकडे ठेका घेण्यासही कुणी पुढे येत नाही, अशा कात्रीत सापडलेल्या प्रशासनाला येत्या सिंहस्थ काळात कचऱ्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेचा खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जात नसल्याने सध्या प्रकल्पावर कचऱ्याचे मोठे ढिगारे साचलेले आहेत. त्यातच प्रकल्पावरील अनेक मशिनरीच्या देखभाल-दुरुस्तीबाबत प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे. खतप्रकल्पावर पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध नसल्याने प्रशासनाची मोठी कोंडी झाली आहे. सध्या खतप्रकल्पावर केवळ ४८ कर्मचारी कार्यरत असून, सुमारे १२५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. खतप्रकल्पावर पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने शासनाकडे भरतीप्रक्रिया राबविण्याकरिता परवानगी मागितली होती; परंतु शासनाने भरतीस नकार दिल्याने प्रशासनाकडून उपलब्ध मनुष्यबळावर प्रकल्प कसातरी पुढे चालविला जात आहे. खतप्रकल्पावर दररोज सुमारे ३७५ टन कचरा येत असतो; परंतु काही तासांपुरताच प्रकल्प चालविला जात आहे. त्यामुळे कचऱ्याचे ढिगारे साचत आहेत. खतप्रकल्पाच्या दुरवस्थेसंबंधी प्रभाग समित्यांपासून महासभेपर्यंत सदस्यांकडून प्रशासनाला वारंवार धारेवर धरले जाते.