शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

‘शिक्षण हक्क’चा शासनाकडून दुराग्रह

By admin | Updated: March 16, 2015 01:09 IST

घरचा अहेर : ‘शिक्षणतपस्वी’ पुरस्कार वितरण सोहळ्यात अभ्यंकर यांची टीका

नाशिक : शिक्षण हक्क कायद्याचा शासनाकडून दुराग्रह धरला जात असून, तो शिक्षकांना जाचक ठरत आहे. या कायद्यामुळे राज्यातील पंधरा-वीस हजार शिक्षक, शिक्षणसेवक अतिरिक्त ठरले आहेत. शिक्षणव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याऐवजी निव्वळ कायदे करणारे शासन शिक्षणाबद्दल गंभीर नाही, अशी टीका करीत शिवसेनेच्या राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी भाजपाला घरचा अहेर दिला. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने प. सा. नाट्यगृहात आयोजित ‘शिक्षणतपस्वी’ पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. माजी आमदार बबन घोलप, मनपा विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, दत्ता गायकवाड, संजय चव्हाण आदि व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात घोलप व अभ्यंकर यांच्या हस्ते प्रा. सूर्यकांत रहाळकर व प्रा. श्याम पाटील यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय विभागस्तरावरील आठ, जिल्हास्तरावरील २९, तर विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल पाच शिक्षकांनाही गौरवण्यात आले. यावेळी अभ्यंकर म्हणाले की, ‘असर’ संस्थेच्या अहवालामुळे शिक्षकांची समाजात नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे. जोपर्यंत शिक्षक समाधानी होत नाही, तोपर्यंत शिक्षणव्यवस्था सुधारणार नाही. शिक्षणाच्या खालावलेल्या स्थितीला फक्त शिक्षकच जबाबदार नाहीत. सरकारकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. निव्वळ कायदे करून व्यवस्था सुधारत नाही. शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सरकारच गंभीर नसून, तुटपुंजी आर्थिक तरतूद केली जाते. या कायद्यामुळे हजारो शिक्षक, शिक्षणसेवक देशोधडीला लागले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी सत्काराला उत्तर देत उत्तम पगार व सुविधांची अपेक्षा करणाऱ्या शिक्षकांनी आपण समाजाला नेमके काय देतो, याचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. शिक्षकांनी आधुनिकतेशी जुळवून घ्यायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. माजी आमदार बोरस्ते यांनी शिक्षकांमध्ये सरकार अनुदानित, विनाअनुदानित अशी चातुर्वण्य व्यवस्था निर्माण करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. याशिवाय पुरस्कारार्थी शिक्षकांनीही मनोगते व्यक्त केली. संजय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे व लक्ष्मण महाडिक यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर वाघ, दीपक गवते, राजेंद्र सावत आदिंसह शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)