शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

बुद्धीजिवी वर्गाकडून डॉ. आंबेडकरांना होती मोठी अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:14 IST

नाशिक : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. भारतात या धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी बुद्ध ...

नाशिक : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. भारतात या धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या प्रमाणभुत ग्रंथाची निर्मिती केली; मात्र सामाजिक क्रांतीसाठी त्यांना समाजातील बुध्दीजिवी वर्गाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत, अशी खंत भाभा परमाणु अणुसंशोधन केंद्रातील वैज्ञानिक अधिकारी अजयकुमार चंदनशिवे यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी विद्यार्थी परिवाराच्यावतीने महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित प्रवर्तन या ऑनलाइन व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प चंदनशिवे यांनी, ‘धर्म परिवर्तन झाले, विचार परिवर्तनाचे काय’ या विषयावर गुंफले. आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात विविध दाखले देत चंदनशिवे यांनी मानवी जीवन समजावून घेण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारे भगवान बुद्ध हे जगातील पहिले वैज्ञानिक ठरतात. आपल्या भूमिकेचा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बुध्दीजिवी लोकांचा भिख्खुसंघ स्थापन केला. त्या माध्यमातून भारतात सर्वत्र बुद्ध धम्माचा प्रसार झाला. एका अर्थांने भिख्खु संघ हे जगातील पहिले केडरबेस संघटन होते, असेही ते म्हणाले. बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर आपण जातीच्या पलीकडे गेलोच नाही, बुध्दीजिवी लोकांनी हे कार्य करणे डॉ. आंबेडकरांना अपेक्षित होते, असेही ते म्हणाले. ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. शुद्धोधन कांबळे यांनी केले. आभार डॉ. गणेश सूर्यवंशी यांनी मानले. राज्यभरातील माजी विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.