शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

बुद्धीजिवी वर्गाकडून डॉ. आंबेडकरांना होती मोठी अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:14 IST

नाशिक : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. भारतात या धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी बुद्ध ...

नाशिक : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. भारतात या धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या प्रमाणभुत ग्रंथाची निर्मिती केली; मात्र सामाजिक क्रांतीसाठी त्यांना समाजातील बुध्दीजिवी वर्गाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत, अशी खंत भाभा परमाणु अणुसंशोधन केंद्रातील वैज्ञानिक अधिकारी अजयकुमार चंदनशिवे यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी विद्यार्थी परिवाराच्यावतीने महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित प्रवर्तन या ऑनलाइन व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प चंदनशिवे यांनी, ‘धर्म परिवर्तन झाले, विचार परिवर्तनाचे काय’ या विषयावर गुंफले. आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात विविध दाखले देत चंदनशिवे यांनी मानवी जीवन समजावून घेण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारे भगवान बुद्ध हे जगातील पहिले वैज्ञानिक ठरतात. आपल्या भूमिकेचा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बुध्दीजिवी लोकांचा भिख्खुसंघ स्थापन केला. त्या माध्यमातून भारतात सर्वत्र बुद्ध धम्माचा प्रसार झाला. एका अर्थांने भिख्खु संघ हे जगातील पहिले केडरबेस संघटन होते, असेही ते म्हणाले. बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर आपण जातीच्या पलीकडे गेलोच नाही, बुध्दीजिवी लोकांनी हे कार्य करणे डॉ. आंबेडकरांना अपेक्षित होते, असेही ते म्हणाले. ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. शुद्धोधन कांबळे यांनी केले. आभार डॉ. गणेश सूर्यवंशी यांनी मानले. राज्यभरातील माजी विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.