शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

डीपीडीसीचा ६६३ कोटींची निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:36 IST

नाशिक : जिल्हा नियोजन समितीसाठी ७१३.५८ कोटी रुपयांच्या निधी मंजूर असला तरी कोरोनाच्या काळात खर्चावरील मर्यादा तसेच इतर विकासकामांना ...

नाशिक : जिल्हा नियोजन समितीसाठी ७१३.५८ कोटी रुपयांच्या निधी मंजूर असला तरी कोरोनाच्या काळात खर्चावरील मर्यादा तसेच इतर विकासकामांना ब्रेक लावल्यामुळे जिल्ह्यातील ६६३ केाटींचा निधी अखर्चित राहीला आहे. आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत हा निधी खर्च करावा लागणार आहे. दुसरीकडे अनुसूचित जाती उपयोजनेसाठीचा निधीच प्राप्त होऊ शकला नसल्याने या योजनेतील कामे होऊ शकली नाही.

जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात आलेल्या नियोजनानुसाार शासनाने जिल्ह्याच्या विकासासाठी ७१३.५८ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली हेाती. त्यामाध्यमातून सुरुवातील काही कामे सुचविण्यात आल्याने त्यानुसार त्या कामांना मंजुरीही देण्यात आली. मात्र त्यानंतर काेरोनामुळे विकासाची सर्वच कामे थांबविण्यात आली. आरोग्य व्यतिरिक्त इतर कामांना ब्रेक लागल्याने गेल्या नऊ महिन्यांत अवघा ५० कोटी रुपयांचाच निधी विकास कामांवर खर्च झाला. यंदा कोरोनाचे कारण असले तरी दरवर्षी निधी खर्च होत नसल्याने नियोजन समितीत जोरदार चर्चा होतच असते. खर्चासाठीचे आदेश काढून तत्काळ खर्चाच्या पूर्ततेसाठीच्या बैठका आयोजित करण्याची वेळ येते. यंदाही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सन २०२० - २१ या आर्थिक वर्षासाठी ७१३.५८ कोटी रुपयांच्या निधी पैकी ५० कोटी रुपये विकास कामांवर खर्च झाला आहे. त्यात सर्वसाधारण योजनेसाठी ४२५कोटी, आदिवासी उपयोजनांसाठी २९८ कोटी ८६ लाख आणि अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १०० कोटी २९ लाख रुपये मंजूर आहेत. कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने त्याचाही परिणाम निधी वितरणावर झाली. केवळ आरोग्यावरील खर्चालाच प्राधान्य दिल्याने

विकासकामांवरील निधी गोठविण्यात आला त्यामुळे डीपीसीच्या निधीला त्यामुळे कात्री लावण्यात आली.

सुरुवातीला सर्वसाधारण योजनांसाठी ५४ कोटी, आदिवासी विकास योजनांसाठी २४.४८ कोटी,इतके अनुदान मिळाले. विशेष म्हणजे समाजकल्याणसाठी एक रुपयाचेही अनुदान मिळाले नव्हते. आतापर्यंत सर्वसाधारणसाठी ३६.१९ कोटी, आदिवासी उपयोजनांसाठी

१४.३८ कोटीं असा ५०.५७ कोटींचाच निधी खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेचा तर निधीही मिळू शकलेला नाही. त्यामुळे

त्यांचा खर्चही शून्य टक्के झाला आहे. आता केवळ दोन महिन्यांत उर्वरित निधी खर्च करण्याचे आव्हान जिल्ह्यापुढे आहे.