शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

डीपीडीसीचा ६६३ कोटींची निधी अखर्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:36 IST

नाशिक : जिल्हा नियोजन समितीसाठी ७१३.५८ कोटी रुपयांच्या निधी मंजूर असला तरी कोरोनाच्या काळात खर्चावरील मर्यादा तसेच इतर विकासकामांना ...

नाशिक : जिल्हा नियोजन समितीसाठी ७१३.५८ कोटी रुपयांच्या निधी मंजूर असला तरी कोरोनाच्या काळात खर्चावरील मर्यादा तसेच इतर विकासकामांना ब्रेक लावल्यामुळे जिल्ह्यातील ६६३ केाटींचा निधी अखर्चित राहीला आहे. आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत हा निधी खर्च करावा लागणार आहे. दुसरीकडे अनुसूचित जाती उपयोजनेसाठीचा निधीच प्राप्त होऊ शकला नसल्याने या योजनेतील कामे होऊ शकली नाही.

जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात आलेल्या नियोजनानुसाार शासनाने जिल्ह्याच्या विकासासाठी ७१३.५८ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली हेाती. त्यामाध्यमातून सुरुवातील काही कामे सुचविण्यात आल्याने त्यानुसार त्या कामांना मंजुरीही देण्यात आली. मात्र त्यानंतर काेरोनामुळे विकासाची सर्वच कामे थांबविण्यात आली. आरोग्य व्यतिरिक्त इतर कामांना ब्रेक लागल्याने गेल्या नऊ महिन्यांत अवघा ५० कोटी रुपयांचाच निधी विकास कामांवर खर्च झाला. यंदा कोरोनाचे कारण असले तरी दरवर्षी निधी खर्च होत नसल्याने नियोजन समितीत जोरदार चर्चा होतच असते. खर्चासाठीचे आदेश काढून तत्काळ खर्चाच्या पूर्ततेसाठीच्या बैठका आयोजित करण्याची वेळ येते. यंदाही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सन २०२० - २१ या आर्थिक वर्षासाठी ७१३.५८ कोटी रुपयांच्या निधी पैकी ५० कोटी रुपये विकास कामांवर खर्च झाला आहे. त्यात सर्वसाधारण योजनेसाठी ४२५कोटी, आदिवासी उपयोजनांसाठी २९८ कोटी ८६ लाख आणि अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १०० कोटी २९ लाख रुपये मंजूर आहेत. कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने त्याचाही परिणाम निधी वितरणावर झाली. केवळ आरोग्यावरील खर्चालाच प्राधान्य दिल्याने

विकासकामांवरील निधी गोठविण्यात आला त्यामुळे डीपीसीच्या निधीला त्यामुळे कात्री लावण्यात आली.

सुरुवातीला सर्वसाधारण योजनांसाठी ५४ कोटी, आदिवासी विकास योजनांसाठी २४.४८ कोटी,इतके अनुदान मिळाले. विशेष म्हणजे समाजकल्याणसाठी एक रुपयाचेही अनुदान मिळाले नव्हते. आतापर्यंत सर्वसाधारणसाठी ३६.१९ कोटी, आदिवासी उपयोजनांसाठी

१४.३८ कोटीं असा ५०.५७ कोटींचाच निधी खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेचा तर निधीही मिळू शकलेला नाही. त्यामुळे

त्यांचा खर्चही शून्य टक्के झाला आहे. आता केवळ दोन महिन्यांत उर्वरित निधी खर्च करण्याचे आव्हान जिल्ह्यापुढे आहे.