शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
4
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
5
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
6
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
8
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
11
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
13
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
14
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
15
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
16
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
17
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
19
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
20
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक

वनहक्क दावे निपटाऱ्यात नाशिक राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:38 IST

नाशिक : आदिवासींनी अतिक्रमित केलेली वनजमीन ताब्यात देणाºया वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासाठी जिल्ह्णात तीन समित्या तयार करण्यात आल्यामुळे प्रत्येक दिवशी सुमारे ७०० दाव्यांना मंजुरी दिली जात आहे.

ठळक मुद्देमहिनाअखेर २१ हजार प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी जिल्ह्णातील महसूल यंत्रणा युद्धपातळीवर काम

श्याम बागुल।नाशिक : आदिवासींनी अतिक्रमित केलेली वनजमीन ताब्यात देणाºया वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासाठी जिल्ह्णात तीन समित्या तयार करण्यात आल्यामुळे प्रत्येक दिवशी सुमारे ७०० दाव्यांना मंजुरी दिली जात आहे.दहा वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांचे काम अतिशय संथगतीने सुरू होते. आदिवासींना त्यांच्या हक्काच्या जागेचा ताबा मिळण्यासाठी किसान सभेतर्फे ६ मार्चला नाशिक येथून मंत्रालयावर लाँग मार्च काढण्यात आला होता. हजारो आदिवासी महिला व पुरुषांचा हा मोर्चा पायी चालत १२ मार्चला मुंबईत पोहोचला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांत दावे निकाली काढण्याचे आश्वासन मोर्चेकºयांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार ६ सप्टेंबर रोजी मुदत संपली असली तरी, महिनाअखेर २१ हजार प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी जिल्ह्णातील महसूल यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.पाच महिन्यांत जेमतेम सात हजार दावे निकाली निघाले. उर्वरित दाव्यांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी असलेली एकच जिल्हास्तरीय समितीचे विकें्रदीकरण करण्यात आले असून, त्याची जबाबदारी नाशिक व मालेगावच्या अपर जिल्हाधिकाºयांवर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जिल्हास्तरीय समितीकडे आलेल्या दाव्यांना मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे. परंतु ११ हजार दाव्यांची फेरसुनावणी ‘स्यु मोटो’ घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे जे दावे अमान्य करण्यात आले, त्यांची सुनावणी करण्यासाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकाºयांची नेमणूक केली आहे.महिन्यात १३ हजार दावे निकाली काढणारदहा दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी नाशिकला येऊन आढावा घेतला होता. त्यात १३ हजार दाव्यांचा निपटारा एका महिन्यात करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार दररोज उपविभाग व जिल्हास्तरावर ७०० दाव्यांवर निर्णय घेतला जात आहे. राज्यातील २६ जिल्ह्णांमध्ये सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता, नाशिक अव्वल ठरला आहे.