शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

रोजी रेाटी हिरावणारा लॉकडाऊन नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:15 IST

नाशिक :- शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.म्हणून सरकार आणि जिल्हा प्रशासन लॉकडाऊनच्या विचारात आहे.परंतु लॉकडाऊनचा निर्णय घेण्यापूर्वी ...

नाशिक :- शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.म्हणून सरकार आणि जिल्हा प्रशासन लॉकडाऊनच्या विचारात आहे.परंतु लॉकडाऊनचा निर्णय घेण्यापूर्वी गोरगरीब जनतेचा प्रथम विचार केला पाहिजे. कारण परिणाम केवळ गोरगरिबांवरच होत असतो. हे मागील लॉकडाऊनमध्ये अनुभवले आहे.आताही निर्णय घेतला तर गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.टोकाची भूमिका घेण्याऐवजी कडक नियम करण्यास हरकत नाही. नवीन निर्बंध लादण्याऐवजी आहे, त्याच निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी केली तरी पुरे आहेत, अशा भावना शहरातील विक्रेत्यांनी व्यक्त केल्या आणि पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या भूमिकांना विरोध दर्शवला आहेे. सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट आकस्मिक असल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा सर्वाधिक फटका लहान व्यापारी, विक्रेते आणि कारगिर अशा वर्गाला अधिक बसला. त्यामुळे आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन नको अशा प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

.... मागील लॉकडाऊन अनुभवलेला आहे.अतिशय कठीण परिस्थितीतून जावे लागले होते. किरकोळ विक्रेत्यांना लॉकडाऊनच्या संकटाला सामोरे जावे लागले होते.त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नको. रुग्ण वाढत आहेत.म्हणून टोकाची भूमिका घेऊ नये.

- पोपटराव जाधव.व्यवसायिक सातपूर.

.....

पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाल्याने भीती वाटायला लागली आहे.मागील लॉकडाऊनमध्ये आमच्या सारख्या छोट्या व्यासायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाल्यास पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.म्हणून लॉकडाऊनचा पुनर्विचार केला पाहिजे.

- हरिदास शेलार, फळविक्रेता, सातपूर.

.....

यापूर्वीचा अनुभव पाहता पुन्हा लॉकडाऊन केल्याने त्याचे परिणाम काय होतील.याची भीती वाटत आहे.पुन्हा लॉकडाऊन झाल्यास सर्वसामान्य गरीब लोकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते.त्यामुळे कोरोना रुग्ण वाढू नयेत म्हणून सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे.

- राजू मुर्तडक, विक्रेता सातपूर.

....

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असल्याने शासन देखील लॉकडाउनचा विचार करीत आहे.परंतु सर्वसामान्य गरीब लोकांचे काय हाल होतील याचा विचार होणे गरजेचे आहे.मागील लॉकडाउनमध्ये झालेले हाल शासनाने पाहिलेले आहेत.तसे हाल पुन्हा होऊ नयेत.एवढीच अपेक्षा आहे.

- पराग कुलकर्णी.व्यवसायिक सातपूर.

------------

छायाचित्र आर फोटोवर नावाने