शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

रोजी रेाटी हिरावणारा लॉकडाऊन नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:15 IST

नाशिक :- शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.म्हणून सरकार आणि जिल्हा प्रशासन लॉकडाऊनच्या विचारात आहे.परंतु लॉकडाऊनचा निर्णय घेण्यापूर्वी ...

नाशिक :- शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.म्हणून सरकार आणि जिल्हा प्रशासन लॉकडाऊनच्या विचारात आहे.परंतु लॉकडाऊनचा निर्णय घेण्यापूर्वी गोरगरीब जनतेचा प्रथम विचार केला पाहिजे. कारण परिणाम केवळ गोरगरिबांवरच होत असतो. हे मागील लॉकडाऊनमध्ये अनुभवले आहे.आताही निर्णय घेतला तर गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.टोकाची भूमिका घेण्याऐवजी कडक नियम करण्यास हरकत नाही. नवीन निर्बंध लादण्याऐवजी आहे, त्याच निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी केली तरी पुरे आहेत, अशा भावना शहरातील विक्रेत्यांनी व्यक्त केल्या आणि पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या भूमिकांना विरोध दर्शवला आहेे. सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट आकस्मिक असल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा सर्वाधिक फटका लहान व्यापारी, विक्रेते आणि कारगिर अशा वर्गाला अधिक बसला. त्यामुळे आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन नको अशा प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

.... मागील लॉकडाऊन अनुभवलेला आहे.अतिशय कठीण परिस्थितीतून जावे लागले होते. किरकोळ विक्रेत्यांना लॉकडाऊनच्या संकटाला सामोरे जावे लागले होते.त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नको. रुग्ण वाढत आहेत.म्हणून टोकाची भूमिका घेऊ नये.

- पोपटराव जाधव.व्यवसायिक सातपूर.

.....

पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाल्याने भीती वाटायला लागली आहे.मागील लॉकडाऊनमध्ये आमच्या सारख्या छोट्या व्यासायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाल्यास पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.म्हणून लॉकडाऊनचा पुनर्विचार केला पाहिजे.

- हरिदास शेलार, फळविक्रेता, सातपूर.

.....

यापूर्वीचा अनुभव पाहता पुन्हा लॉकडाऊन केल्याने त्याचे परिणाम काय होतील.याची भीती वाटत आहे.पुन्हा लॉकडाऊन झाल्यास सर्वसामान्य गरीब लोकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते.त्यामुळे कोरोना रुग्ण वाढू नयेत म्हणून सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे.

- राजू मुर्तडक, विक्रेता सातपूर.

....

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असल्याने शासन देखील लॉकडाउनचा विचार करीत आहे.परंतु सर्वसामान्य गरीब लोकांचे काय हाल होतील याचा विचार होणे गरजेचे आहे.मागील लॉकडाउनमध्ये झालेले हाल शासनाने पाहिलेले आहेत.तसे हाल पुन्हा होऊ नयेत.एवढीच अपेक्षा आहे.

- पराग कुलकर्णी.व्यवसायिक सातपूर.

------------

छायाचित्र आर फोटोवर नावाने