शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

दानशूर संस्थांच्या माध्यमातून तीन लाख व्यक्तींना अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:17 IST

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे अनेक कुटुंबांवर हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली येत असल्याचे समजताच अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या व त्यांनी पुढाकार घेऊन आतापर्यंत तीन लाख लोकांना अन्नदान केले आहे.

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे अनेक कुटुंबांवर हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली येत असल्याचे समजताच अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या व त्यांनी पुढाकार घेऊन आतापर्यंत तीन लाख लोकांना अन्नदान केले आहे. अशा दानशूर स्वयंसेवी संस्थांचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळासाठी इतरही संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.इमर्जंसी अ‍ॅक्शन सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यात जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांचे संनियंत्रण केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून आज बेघर व स्थलांतरित नागरिकांसाठी रिलीफ कॅम्प, भारतीय अन्न महामंडळाकडून धान्य पुरवठा तसेच अनेक स्वयंसेवी संस्थामार्फत अन्नदान केले जात असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. आजपर्यंत ३६ स्वयंसेवी संस्था व व्यक्तींमार्फत नाशिक शहरातील विविध ठिकाणी एकूण तीन लाख लोकांना अन्नदान करण्यात आले आहे. सकल जैन संघटना यांच्यामार्फत म्हसरूळ, जुने नाशिक, सिडको, सातपूर, अंबड व पाथर्डी, द्वारका ते नाशिकरोड, आग्रा हायवे, विल्होळी मंदिर येथील लोकांना अन्नदान केले आहे. सकल जैन संघटना व वेलकम सहकार्य मित्रमंडळ यांच्यामार्फत जुने नाशिक, भद्रकाली, गंगाघाट येथे अन्नदान केले आहे. श्री गुरु व्दारा गुरु नानक दरबार शिंगाडा तलाव, श्री गुरुव्दारा देवळाली व रॉबीन हुड आर्मी यांच्यामार्फत, अमिगो लॉजेस्टीकस इंडिया व दिनीयत संस्था यांच्यामार्फत बेलतगाव, व्हिलरेज, स्टेशनवाडी, जयभवानीरोड, बिटको, उपनगर कॅनॉलरोड, गोरेवाडी, जेलरोड, बागुलनगर झोपडपट्टी येथील लोकांना, वुई फाउंडेशन यांच्यामार्फत सिव्हील हॉस्पिटल नाशिक येथील लोकांना अनिकेत उपासनी यांच्यामार्फत रंगरेज कॉलनी, वडाळा येथे अन्नदान करण्यात आले आहे. श्रीजी प्रसाद व झेप व नयनतारा ग्रुप, गुरमित बग्गा यांच्यामार्फत गाडगेबाबा निवारा, इंद्रकुंड निवारा, मखमलाबाद नाका शाळा, म्हाडा कॉलनी, पाथर्डी फाटा, पंचवटी परिसर येथे अन्नदान करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक