शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

दानशूर संस्थांच्या माध्यमातून तीन लाख व्यक्तींना अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:17 IST

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे अनेक कुटुंबांवर हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली येत असल्याचे समजताच अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या व त्यांनी पुढाकार घेऊन आतापर्यंत तीन लाख लोकांना अन्नदान केले आहे.

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे अनेक कुटुंबांवर हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली येत असल्याचे समजताच अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या व त्यांनी पुढाकार घेऊन आतापर्यंत तीन लाख लोकांना अन्नदान केले आहे. अशा दानशूर स्वयंसेवी संस्थांचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळासाठी इतरही संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.इमर्जंसी अ‍ॅक्शन सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यात जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांचे संनियंत्रण केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून आज बेघर व स्थलांतरित नागरिकांसाठी रिलीफ कॅम्प, भारतीय अन्न महामंडळाकडून धान्य पुरवठा तसेच अनेक स्वयंसेवी संस्थामार्फत अन्नदान केले जात असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. आजपर्यंत ३६ स्वयंसेवी संस्था व व्यक्तींमार्फत नाशिक शहरातील विविध ठिकाणी एकूण तीन लाख लोकांना अन्नदान करण्यात आले आहे. सकल जैन संघटना यांच्यामार्फत म्हसरूळ, जुने नाशिक, सिडको, सातपूर, अंबड व पाथर्डी, द्वारका ते नाशिकरोड, आग्रा हायवे, विल्होळी मंदिर येथील लोकांना अन्नदान केले आहे. सकल जैन संघटना व वेलकम सहकार्य मित्रमंडळ यांच्यामार्फत जुने नाशिक, भद्रकाली, गंगाघाट येथे अन्नदान केले आहे. श्री गुरु व्दारा गुरु नानक दरबार शिंगाडा तलाव, श्री गुरुव्दारा देवळाली व रॉबीन हुड आर्मी यांच्यामार्फत, अमिगो लॉजेस्टीकस इंडिया व दिनीयत संस्था यांच्यामार्फत बेलतगाव, व्हिलरेज, स्टेशनवाडी, जयभवानीरोड, बिटको, उपनगर कॅनॉलरोड, गोरेवाडी, जेलरोड, बागुलनगर झोपडपट्टी येथील लोकांना, वुई फाउंडेशन यांच्यामार्फत सिव्हील हॉस्पिटल नाशिक येथील लोकांना अनिकेत उपासनी यांच्यामार्फत रंगरेज कॉलनी, वडाळा येथे अन्नदान करण्यात आले आहे. श्रीजी प्रसाद व झेप व नयनतारा ग्रुप, गुरमित बग्गा यांच्यामार्फत गाडगेबाबा निवारा, इंद्रकुंड निवारा, मखमलाबाद नाका शाळा, म्हाडा कॉलनी, पाथर्डी फाटा, पंचवटी परिसर येथे अन्नदान करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक