शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच प्रवास करतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:12 IST

नाशिक रोड : देशात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना ...

नाशिक रोड : देशात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर दीड वर्ष होऊनही अद्यापपर्यंत पॅसेंजर रेल्वे व सर्वसाधारण टिकीट सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय न घेतल्याने पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या गोरगरीब व सर्वसामान्य प्रवासी, मजूर, शेतकरी, छोटे-मोठे व्यापारी आदी सर्वांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रेल्वे प्रशासन एकीकडे हळूहळू जवळपास सर्वच प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेस व मेल एक्स्प्रेस सुरू करीत आहे. मग, फक्त पॅसेंजर गाडीबाबत रेल्वे प्रशासन निर्णय घेत नसल्याने रेल्वे प्रशासनाला सर्वसाधारण तिकीट तर कायमस्वरूपी रद्द करायचे नाही ना, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस भारतात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पसरू लागल्याने पहिले चार महिने रेल्वे सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर प्रारंभी मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. आपापल्या राज्यात गावी परतणाऱ्या मजुरांसाठी रेल्वेकडून विशेष रेल्वे सोडून दुसऱ्या राज्यात अडकलेल्या मजूर, कामगार व प्रवाशांना सोडण्यासाठी विशेष रेल्वे चालविण्यात आल्या. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कोविड स्पेशल, फेस्टिवल स्पेशल रेल्वे सुरू केल्या.

--इन्फो--

नाशिक रोडमार्गे तीन पॅसेंजर

नाशिक रोड रेल्वे स्थानक मार्गे मनमाड - इगतपुरी शटल, मुंबई - भुसावळ पॅसेंजर, देवळाली - भुसावळ पॅसेंजर या तीन पॅसेंजर धावतात. मुंबई - भुसावळ पॅसेंजर तसेच देवळाली - भुसावळ पॅसेंजर हीदेखील या भागातील प्रवाशांसाठी खूप महत्त्वाची ठरते. नाशिक शहर जिल्ह्यातील खानदेश भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी या दोन्ही पॅसेंजर येण्याजाण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.

--इन्फो--

पॅसेंजर बंद का?

पॅसेंजर रेल्वेला प्रवाशांची खूप गर्दी होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे रेल्वेचे अधिकारी खाजगीत सांगतात. मात्र ज्या मेल व सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू केल्या आहेत त्यामध्येदेखील सामाजिक अंतर, मास्क वापरणे आदी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून प्रवासी प्रवास करतात. रेल्वे प्रशासनदेखील त्याकडे कानाडोळा करते. रेल्वे प्रशासन मेल एक्स्प्रेस, सुपरफास्ट एक्स्प्रेस, पॅसेंजर यांचे दर इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ठरवतात. यांच्या मार्फतच ऑनलाइन तिकीट काढले जाते. कोरोनामुळे आरक्षण तिकिटाला वेगवेगळे नियम केल्याने प्रत्येक रेल्वेचे तिकीट दर वेगळे आहेत. पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांची रेल्वे प्रशासन सरळ-सरळ आर्थिक लूट करीत आहे. फक्त पॅसेंजरबाबत रेल्वे प्रशासनाने आडमुठे धोरण स्वीकारले आहे.

--इन्फो--

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

गीतांजली एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, मुंबई - नागपूर विदर्भ एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, कामयानी एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, पंजाब मेल, पंचवटी, राज्यराणी, तपोवन.

--इन्फो--

जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी किंवा शेजारच्या जिल्ह्यामध्ये कमी खर्चात जाण्यासाठी पॅसेंजर एक्स्प्रेस सर्वच प्रवाशांच्या दृष्टीने गरजेच्या आहेत. पॅसेंजरचे तिकीट दरदेखील कमी असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने सोयीचे होते. परंतु पॅसेंजर रेल्वे बंद केल्याने रस्तामार्गे वाहतूक वाढली आहे.

त्यामुळे अपघाताच्या भीतीसोबत वेळेचा व पैशांचा अपव्यय होतो.

कैलास गायकवाड, प्रवासी

पॅसेंजर रेल्वे ही प्रवासादरम्यान सर्वच रेल्वे स्थानकांवर थांबत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी सोय होते. पॅसेंजरमुळे शेतीमाल, भाजीपाला एका गावातून दुसऱ्या गावात किंवा शहरात शेतकऱ्याला आणणे सोपे होते. त्यामुळे शहरातील नागरिकांना ताजा शेतीमाल कमी भावात मिळतो व शेतकऱ्यालादेखील रोख रक्कम तत्काळ मिळते. पॅसेंजर ही कामगार, नोकर, शेतकरी, मजूर, विद्यार्थी यांच्या प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

सीमा हाळदे, प्रवासी