शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच प्रवास करतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:12 IST

नाशिक रोड : देशात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना ...

नाशिक रोड : देशात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर दीड वर्ष होऊनही अद्यापपर्यंत पॅसेंजर रेल्वे व सर्वसाधारण टिकीट सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय न घेतल्याने पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या गोरगरीब व सर्वसामान्य प्रवासी, मजूर, शेतकरी, छोटे-मोठे व्यापारी आदी सर्वांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रेल्वे प्रशासन एकीकडे हळूहळू जवळपास सर्वच प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेस व मेल एक्स्प्रेस सुरू करीत आहे. मग, फक्त पॅसेंजर गाडीबाबत रेल्वे प्रशासन निर्णय घेत नसल्याने रेल्वे प्रशासनाला सर्वसाधारण तिकीट तर कायमस्वरूपी रद्द करायचे नाही ना, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस भारतात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पसरू लागल्याने पहिले चार महिने रेल्वे सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर प्रारंभी मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. आपापल्या राज्यात गावी परतणाऱ्या मजुरांसाठी रेल्वेकडून विशेष रेल्वे सोडून दुसऱ्या राज्यात अडकलेल्या मजूर, कामगार व प्रवाशांना सोडण्यासाठी विशेष रेल्वे चालविण्यात आल्या. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कोविड स्पेशल, फेस्टिवल स्पेशल रेल्वे सुरू केल्या.

--इन्फो--

नाशिक रोडमार्गे तीन पॅसेंजर

नाशिक रोड रेल्वे स्थानक मार्गे मनमाड - इगतपुरी शटल, मुंबई - भुसावळ पॅसेंजर, देवळाली - भुसावळ पॅसेंजर या तीन पॅसेंजर धावतात. मुंबई - भुसावळ पॅसेंजर तसेच देवळाली - भुसावळ पॅसेंजर हीदेखील या भागातील प्रवाशांसाठी खूप महत्त्वाची ठरते. नाशिक शहर जिल्ह्यातील खानदेश भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी या दोन्ही पॅसेंजर येण्याजाण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.

--इन्फो--

पॅसेंजर बंद का?

पॅसेंजर रेल्वेला प्रवाशांची खूप गर्दी होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे रेल्वेचे अधिकारी खाजगीत सांगतात. मात्र ज्या मेल व सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू केल्या आहेत त्यामध्येदेखील सामाजिक अंतर, मास्क वापरणे आदी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून प्रवासी प्रवास करतात. रेल्वे प्रशासनदेखील त्याकडे कानाडोळा करते. रेल्वे प्रशासन मेल एक्स्प्रेस, सुपरफास्ट एक्स्प्रेस, पॅसेंजर यांचे दर इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ठरवतात. यांच्या मार्फतच ऑनलाइन तिकीट काढले जाते. कोरोनामुळे आरक्षण तिकिटाला वेगवेगळे नियम केल्याने प्रत्येक रेल्वेचे तिकीट दर वेगळे आहेत. पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांची रेल्वे प्रशासन सरळ-सरळ आर्थिक लूट करीत आहे. फक्त पॅसेंजरबाबत रेल्वे प्रशासनाने आडमुठे धोरण स्वीकारले आहे.

--इन्फो--

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

गीतांजली एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, मुंबई - नागपूर विदर्भ एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, कामयानी एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, पंजाब मेल, पंचवटी, राज्यराणी, तपोवन.

--इन्फो--

जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी किंवा शेजारच्या जिल्ह्यामध्ये कमी खर्चात जाण्यासाठी पॅसेंजर एक्स्प्रेस सर्वच प्रवाशांच्या दृष्टीने गरजेच्या आहेत. पॅसेंजरचे तिकीट दरदेखील कमी असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने सोयीचे होते. परंतु पॅसेंजर रेल्वे बंद केल्याने रस्तामार्गे वाहतूक वाढली आहे.

त्यामुळे अपघाताच्या भीतीसोबत वेळेचा व पैशांचा अपव्यय होतो.

कैलास गायकवाड, प्रवासी

पॅसेंजर रेल्वे ही प्रवासादरम्यान सर्वच रेल्वे स्थानकांवर थांबत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी सोय होते. पॅसेंजरमुळे शेतीमाल, भाजीपाला एका गावातून दुसऱ्या गावात किंवा शहरात शेतकऱ्याला आणणे सोपे होते. त्यामुळे शहरातील नागरिकांना ताजा शेतीमाल कमी भावात मिळतो व शेतकऱ्यालादेखील रोख रक्कम तत्काळ मिळते. पॅसेंजर ही कामगार, नोकर, शेतकरी, मजूर, विद्यार्थी यांच्या प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

सीमा हाळदे, प्रवासी