शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच प्रवास करतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:12 IST

नाशिक रोड : देशात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर दीड वर्ष होऊनही अद्यापपर्यंत पॅसेंजर रेल्वे व ...

नाशिक रोड : देशात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर दीड वर्ष होऊनही अद्यापपर्यंत पॅसेंजर रेल्वे व सर्वसाधारण तिकीट सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय न घेतल्याने पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या गोरगरीब व सर्वसामान्य प्रवासी, मजूर, शेतकरी, छोटे-मोठे व्यापारी आदी सर्वांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रेल्वे प्रशासन एकीकडे हळूहळू जवळपास सर्वच प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेस व मेल एक्स्प्रेस सुरू करीत आहे. मग, फक्त पॅसेंजर गाडीबाबत रेल्वे प्रशासन निर्णय घेत नसल्याने रेल्वे प्रशासनाला सर्वसाधारण तिकीट तर कायमस्वरूपी रद्द करायचे नाही ना, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस भारतात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पसरू लागल्याने पहिले चार महिने रेल्वे सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर प्रारंभी मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. आपापल्या राज्यात गावी परतणाऱ्या मजुरांसाठी रेल्वेकडून विशेष रेल्वे सोडून दुसऱ्या राज्यात अडकलेल्या मजूर, कामगार व प्रवाशांना सोडण्यासाठी विशेष रेल्वे चालविण्यात आल्या. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कोविड स्पेशल, फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे सुरू केल्या.

--इन्फो--

नाशिक रोडमार्गे तीन पॅसेंजर

नाशिक रोड रेल्वेस्थानक मार्गे मनमाड - इगतपुरी शटल, मुंबई - भुसावळ पॅसेंजर, देवळाली - भुसावळ पॅसेंजर या तीन पॅसेंजर धावतात. मुंबई - भुसावळ पॅसेंजर तसेच देवळाली - भुसावळ पॅसेंजर हीदेखील या भागातील प्रवाशांसाठी खूप महत्त्वाची ठरते. नाशिक शहर जिल्ह्यातील खानदेश भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी या दोन्ही पॅसेंजर येण्याजाण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.

--इन्फो--

पॅसेंजर बंद का?

पॅसेंजर रेल्वेला प्रवाशांची खूप गर्दी होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे रेल्वेचे अधिकारी खासगीत सांगतात; मात्र ज्या मेल व सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू केल्या आहेत त्यामध्येदेखील सामाजिक अंतर, मास्क वापरणे आदी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून प्रवासी प्रवास करतात. रेल्वे प्रशासनदेखील त्याकडे कानाडोळा करते. रेल्वे प्रशासन मेल एक्स्प्रेस, सुपरफास्ट एक्स्प्रेस, पॅसेंजर यांचे दर इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ठरवतात. यांच्यामार्फतच ऑनलाइन तिकीट काढले जाते. कोरोनामुळे आरक्षण तिकिटाला वेगवेगळे नियम केल्याने प्रत्येक रेल्वेचे तिकीट दर वेगळे आहेत. पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांची रेल्वे प्रशासन सरळ-सरळ आर्थिक लूट करीत आहे. फक्त पॅसेंजरबाबत रेल्वे प्रशासनाने आडमुठे धोरण स्वीकारले आहे.

--इन्फो--

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

गीतांजली एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, मुंबई - नागपूर विदर्भ एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, कामयानी एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, पंजाब मेल, पंचवटी, राज्यराणी, तपोवन.

--इन्फो--

जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी किंवा शेजारच्या जिल्ह्यामध्ये कमी खर्चात जाण्यासाठी पॅसेंजर एक्स्प्रेस सर्वच प्रवाशांच्या दृष्टीने गरजेच्या आहेत. पॅसेंजरचे तिकीट दरदेखील कमी असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने सोयीचे होते. परंतु पॅसेंजर रेल्वे बंद केल्याने रस्तामार्गे वाहतूक वाढली आहे.

त्यामुळे अपघाताच्या भीतीसोबत वेळेचा व पैशांचा अपव्यय होतो.

कैलास गायकवाड, प्रवासी

पॅसेंजर रेल्वे ही प्रवासादरम्यान सर्वच रेल्वे स्थानकांवर थांबत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी सोय होते. पॅसेंजरमुळे शेतीमाल, भाजीपाला एका गावातून दुसऱ्या गावात किंवा शहरात शेतकऱ्याला आणणे सोपे होते. त्यामुळे शहरातील नागरिकांना ताजा शेतीमाल कमी भावात मिळतो व शेतकऱ्यालादेखील रोख रक्कम तत्काळ मिळते. पॅसेंजर ही कामगार, नोकर, शेतकरी, मजूर, विद्यार्थी यांच्या प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

सीमा हाळदे, प्रवासी