शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोदा-दारणा संगम प्रथमच कोरडाठाक

By admin | Updated: June 17, 2016 00:16 IST

पहिली वेळ : अहल्यादेवी होळकर यांनी बांधलेले घाट पाहण्याची संधी

 दत्ता दिघोळे नायगावभीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने नायगाव शिवारातील गोदावरी व दारणा संगम प्रथमच कोरडाठाक पडला आहे. गोदावरी पात्र कोरडेठाक पडल्याने अहल्यादेवी होळकर यांनी बांधलेला घाट पूर्णपणे उघडा पडल्याने तो पाहण्यासाठी परिसरातील नागरिक याठिकाणी गर्दी करत आहेत.गोदा-दारणा या दोन नद्यांचा संगम दक्षिणमुखी असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. जोगलटेंभी ते नायगाव घाट या ठिकाणी आजपर्यंत एकदाही गंगेचे पात्र कोरडेठाक पडले नसल्याचे वयोवृद्ध सांगतात. मात्र, गेल्यावर्षी अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे पाण्याचे आवर्तन न सोडल्याने या भागातील गंगेचे थेट तळ उघडे पडल्याने या भागातील दृश्य भयानक भासू लागले आहे. नायगाव शिवारात अहल्यादेवी यांनी हेमाडपंती पद्धतीने घाटाची बांधणी केली आहे. जवळपास ५० पायऱ्या असलेल्या या घाटाला चार बुरुज असून, अकरा ठिकाणी छोटे मंदिरासारखे गोलाकार बांधीव बोगदे आहे. घाटाच्या काही भागात नक्षीकाम केल्याचे दिसते. अशा सुंदर घाटाचे पूर्णरूप सध्या नदीपात्रातून बघायला मिळते. तसेच आजपर्यंत याठिकाणाची खोली किती आहे याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. सध्या पूर्ण कोरडीठाक पडलेल्या गंगेच्या तळाला पाहण्याची अनोखी संधी नायगाववासीयांना दुष्काळामुळे मिळाली आहे. संपूर्ण तळ टणक खडकाने व्यापला आहे. सध्या दोन-तीन ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. दिवसेंदिवस ते डबके तळ गाठत असल्याने धार्मिक विधीलाही येथे गंगेचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. शिल्लक पाण्याचा दुर्गंध येत असल्याने धार्मिक विधी करणाऱ्यांची गैरसोय होत आहे.या ठिकाणच्या पाणीपुरवठा करण्याच्या सर्वच योजना बंद झाल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. गंगेच्या पात्राबरोबर दोन्ही किनाऱ्यांवर दिसणारे बागायती पिकेही पाण्याअभावी करपल्याने नेहमी हिरवा दिसणारा परिसर उजाड झाला आहे.