शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

रु ग्णालयात औषधांची वानवा

By admin | Updated: February 19, 2017 01:22 IST

कळवण : दाखल होणाऱ्या रु ग्णांची गैरसोय

कळवण : सतत तीन ते चारवेळा शासनाचा डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार घेणाऱ्या कळवण उपजिल्हा  रु गालयात आणि तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधांची वानवा असल्याने उपजिल्हा  रु ग्णालयात आणि तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात दाखल होणाऱ्या आदिवासी व सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. औषध साठा नसल्याचे कारण सांगता येत नसल्याने सर्दी, पडसे, डोकेदुखी असणाऱ्या  रुग्णांनांही सरळ नाशिकचा मार्ग दाखवला जात असल्याचा कटू अनुभव कळवण तालुक्यातील जनतेला आता येऊ लागला आहे.  कळवण उपजिल्हा रु ग्णालयात काही दिवसांपासून साधे सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला या आजारांवरील औषधांचा साठा शिल्लक नसल्याने  रु ग्णांना गोळ्या, औषध बाहेरून घेऊन येण्याचा सल्ला उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा देत असल्याचे चित्र आहे.. रु ग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा औषध साठा महिनाभरापासून शिल्लक नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या वृत्ताला एका कर्मचाऱ्याने दुजोरा दिला असून, औषध साठा उपलब्ध करून देण्यासाठी उपजिल्हा रु ग्णालयातील यंत्रणेकडून वरिष्ठ यंत्रणेकडे पाठपुरावा केला जात नसून, केवळ मासिक बिले काढण्याचा सपाटा लावला जात आहे.  उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक सेवेकडे यंत्रणेच्या असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कळवण उपजिल्हा रु ग्णालय आदिवासी जनतेला तत्पर आरोग्य सेवा देण्यास अपयशी ठरले असल्याचा आरोप कळवण तालुक्यातील आदिवासी जनता करू लागली आहे. खासदार आणि आमदार यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सर्वसामान्य शासकीय सेवेपासून वंचित होत आर्थिक झळ सोसत असल्याचे विदारक चित्र तालुक्यात बघावयास मिळत आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून तत्काळ औषधे उपलब्ध करून  द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.रोज सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला आदी विकारांमुळे आजारी  रु ग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्याने अनेकजण सलाईनवर असून त्यातच दवाखान्यात खोकल्याच्या औषधांचा तुटवडा असल्याने ग्रामीण भागातील गोरबरीब रु ग्णांना आर्थिक झळ  बसून औषधे विकत घ्यावी लागत आहेत. (वार्ताहर)