शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

झेडपीच्या रस्त्यावर पीडब्ल्यूडी नको

By admin | Updated: December 1, 2015 23:20 IST

ठराव संमत : निधी वर्ग करण्याची अट, स्थायी समिती बैठक

नाशिक : जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कामे केल्यानंतर ती कामे खराब होतात, पर्यायाने जिल्हा परिषदेची बदनामी होते. त्यामुळे यापुढे जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागास कामे करण्यास ना हरकत दाखला देण्यात येऊ नये. तो निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण ठराव स्थायी समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.मंगळवारी (दि.१)स्थायी समितीच्या बैठकीस अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती किरण थोरे, शोभा डोखळे, उषा बच्छाव, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड आदि उपस्थित होते. अंगणवाड्यांना अंडी पुरविण्याचा निधी प्राप्त झाला, मात्र फोटो पुरतेच अंडी वाटप करण्यात आली, असे होता कामा नये, अशी सूचना अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी व्यक्त केली. मिलिंद शंभरकर यांनी याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवण्याची सूचना केली. प्रा.अनिल पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना ग्रामीण भागात २४ तास वीजपुरवठा होत नसल्याची तक्रार केली. उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना २४ तास वीजपुरवठा झालाच पाहिजे, त्यामुळे आरोग्य केंद्रांनजीकच्या उपकेंद्रांच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना द्याव्यात, असे आदेश दिले. मालेगाव उपविभागांतर्गत वीज वितरण कंपनीचे अधिकारी रात्री हजर राहत नसल्याची तक्रार शैलेश सूर्यवंशी यांनी केली. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता बैठकीस उपस्थित नसल्याबाबत नाराजी व्यक्त करीत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. मिलिंद शंभरकर यांनी पुढील बैठकीस त्यांना बोलवा, असे सांगितले. आदर्श संसद दत्तक ग्राम योजनेसाठी खासदारांनी त्यांचा निधी वापरावा, जिल्हा परिषदेचा निधी वापरण्याची गरज काय? असा प्रश्न प्रकाश वडजे यांनी उपस्थित करीत याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पशुसंवर्धन दवाखान्यांमध्ये औषधे नसून आपल्या मुखेड पशुवैद्यकीय दवाखान्यात तर सहा महिन्यांपासून औषध नसल्याची तक्रार बाळासाहेब गुंड यांनी केली. प्रा. अनिल पाटील यांनी आपल्या गावातील कंधाणे पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या सहा महिन्यांपासून डॉक्टरच उपस्थित राहत नसून याबाबत कडक कारवाईची मागणी केली. त्याचवेळी केवळ डॉक्टरच नाही तर ग्रामसेवकही ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहत नाही. सरकारी जागेवर अतिक्रमण काढण्यास नकार देतात, अशी खंत प्रवीण जाधव यांनी व्यक्त करीत यंत्रणा सुधारण्याची मागणी केली. जागेवर हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बोलताना अध्यक्ष विजयश्री चुंबळे. समवेत डावीकडून सुनील गायकवाड, मिलिंद शंभरकर, प्रकाश वडजे, किरण थोरे, उषा बच्छाव, शोभा डोखळे.