शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उद्योगपती-सिनेतारे आणून विकास होत नाही

By admin | Updated: February 2, 2017 01:02 IST

अजित पवार : मनसेला टोला, नाशिककरांची निराशा केल्याची टीका

नाशिक : काल-परवा नाशिकला देशाचे मोठे उद्योगपती रतन टाटा नाशिकला येऊन गेल्याचे आपण वाचले. मात्र ज्या नाशिककरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ताब्यात महापालिका दिली, त्या नाशिककरांची मनसेने निराशाच केली. तारे-तारका आणून विकास होत नाही, अशी बोचरी टीकाही अजित पवार यांनी मनसेवर केली.गेल्या पाच वर्षांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आहे. तेथे पक्षाने काय कामे केली, हे राज्यभरातून जनतेने जाऊन पहावे. आम्ही पाच वर्षांत केवळ विकास केला. उद्याने रस्ते सर्वच क्षेत्रात विकास केला. आम्ही करून दाखविले. मात्र नाशिकला ज्या मनसेच्या ताब्यात नाशिककरांनी सत्ता दिली त्यांची मनसेने निराशाच केली. पाच वर्षांत काही केले नाही, आता चित्रपटातील तारे-तारका आणून त्यांना नाशिकची कामे दाखविली जात आहेत. नाशिककरांना मात्र हे अजूनही समजलेले नाही. मनसेने नाशिककरांना अनेक स्वप्ने दाखविली होती. मात्र ती पूर्ण करता आली नाही. पुण्यातही भाजपा-शिवसेनेने पुणेकरांना अनेक आश्वासने दिली मात्र अडीच वर्षात त्यांना ती एकही पूर्ण करता आलेली नाही. फक्त निवडणुका आल्या की ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवायचे आणि निवडणुका संपल्या की तो कोवळ ‘चुनावी जुमला’ असल्याचे सांगायचे. अच्छे दिनबाबत तर भाजपाचेच काही लोक ती आमच्या गळ्यातील हड्डी बनल्याचे सांगत आहेत. पाच वर्षात जनतेचा केवळ भ्रमनिरास झाला आहे.