शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पाहणीचा फार्स ठरू नये !

By किरण अग्रवाल | Updated: December 9, 2018 01:39 IST

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने प्रत्यक्षात शेतीच्या बांधावर जाऊन आढावा घेतला आहे, मुख्यमंत्र्यांनाही त्याबद्दल अवगत केले असल्याने राज्य शासनही त्यासंबंधीचा पाठपुरावा करणार आहे. दुष्काळ स्थिती आहे, हे या सर्वांनी अनुभवले व जाणले असल्याने आता ही पाहणी म्हणजे केवळ उपचार न ठरता; बळीराजाचे अश्रू पुसण्यासंदर्भात शासकीय पातळीवरून पावले उचलली जाणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देआगामी निवडणुकीत फटका बसल्याखेरीज राहणार नाही.

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने प्रत्यक्षात शेतीच्या बांधावर जाऊन आढावा घेतला आहे, मुख्यमंत्र्यांनाही त्याबद्दल अवगत केले असल्याने राज्य शासनही त्यासंबंधीचा पाठपुरावा करणार आहे. दुष्काळ स्थिती आहे, हे या सर्वांनी अनुभवले व जाणले असल्याने आता ही पाहणी म्हणजे केवळ उपचार न ठरता; बळीराजाचे अश्रू पुसण्यासंदर्भात शासकीय पातळीवरून पावले उचलली जाणे गरजेचे आहे.यंदा निसर्गाने डोळे वटारल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. पावसाअभावी खरिपाची हानी झाली असून, भाजीपाला, टमाट्यापाठोपाठ कांद्याचे दरही कोसळल्याने शेतकरी संतप्त आहे. त्या भीतीपोटीच दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाला कडेकोट बंदोबस्त पुरवण्याचे आदेश होते. नाशिक जिल्ह्यात दौºयाप्रसंगी शेतकºयांनी आता शेतीसाठी उचललेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न असल्याने विषाचा घोट, आत्महत्या हाच पर्याय असल्याच्या वेदना पथकासमोर मांडल्या आहेत. माणसांनाच प्यायच्या पाण्याची चणचण असल्याने जनावरांचे चारा-पाणी आणायचे कोठून, असाही प्रश्न आहे. जिल्ह्यात आताच टँकर्सने शंभरी गाठली आहे. संपूर्ण जिल्हाच पाण्यासाठी तळमळतो आहे. पिके गेली आहेत; पण राज्य शासनाने मागे जी दुष्काळसदृश तालुक्यांची यादी घोषित केली त्यात काही गावे सुटून गेली होती. तेव्हा ओरड झाल्यावर राज्य शासनाने फेरपाहणी केली; पण उपयोग झाला नव्हता. बरे, दुष्काळी उपाययोजनांची जंत्री मोठी असली तरी प्रत्यक्षात हाती मदत नसून वीजबिल आदींच्या वसुलीचा तगादा सुरूच आहे. त्यामुळे ग्रामस्थ अधिक संतप्त झाले आहेत. तेव्हा, आता कोरडी सहानुभूती अगर कोरडी आश्वासने पुरी! केंद्रीय पथकाच्या पाहणीचाही फार्स न ठरता तातडीने दुष्काळी उपाययोजनांचा लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे, अन्यथा आगामी निवडणुकीत फटका बसल्याखेरीज राहणार नाही.