शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाहणीचा फार्स ठरू नये !

By किरण अग्रवाल | Updated: December 9, 2018 01:39 IST

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने प्रत्यक्षात शेतीच्या बांधावर जाऊन आढावा घेतला आहे, मुख्यमंत्र्यांनाही त्याबद्दल अवगत केले असल्याने राज्य शासनही त्यासंबंधीचा पाठपुरावा करणार आहे. दुष्काळ स्थिती आहे, हे या सर्वांनी अनुभवले व जाणले असल्याने आता ही पाहणी म्हणजे केवळ उपचार न ठरता; बळीराजाचे अश्रू पुसण्यासंदर्भात शासकीय पातळीवरून पावले उचलली जाणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देआगामी निवडणुकीत फटका बसल्याखेरीज राहणार नाही.

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने प्रत्यक्षात शेतीच्या बांधावर जाऊन आढावा घेतला आहे, मुख्यमंत्र्यांनाही त्याबद्दल अवगत केले असल्याने राज्य शासनही त्यासंबंधीचा पाठपुरावा करणार आहे. दुष्काळ स्थिती आहे, हे या सर्वांनी अनुभवले व जाणले असल्याने आता ही पाहणी म्हणजे केवळ उपचार न ठरता; बळीराजाचे अश्रू पुसण्यासंदर्भात शासकीय पातळीवरून पावले उचलली जाणे गरजेचे आहे.यंदा निसर्गाने डोळे वटारल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. पावसाअभावी खरिपाची हानी झाली असून, भाजीपाला, टमाट्यापाठोपाठ कांद्याचे दरही कोसळल्याने शेतकरी संतप्त आहे. त्या भीतीपोटीच दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाला कडेकोट बंदोबस्त पुरवण्याचे आदेश होते. नाशिक जिल्ह्यात दौºयाप्रसंगी शेतकºयांनी आता शेतीसाठी उचललेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न असल्याने विषाचा घोट, आत्महत्या हाच पर्याय असल्याच्या वेदना पथकासमोर मांडल्या आहेत. माणसांनाच प्यायच्या पाण्याची चणचण असल्याने जनावरांचे चारा-पाणी आणायचे कोठून, असाही प्रश्न आहे. जिल्ह्यात आताच टँकर्सने शंभरी गाठली आहे. संपूर्ण जिल्हाच पाण्यासाठी तळमळतो आहे. पिके गेली आहेत; पण राज्य शासनाने मागे जी दुष्काळसदृश तालुक्यांची यादी घोषित केली त्यात काही गावे सुटून गेली होती. तेव्हा ओरड झाल्यावर राज्य शासनाने फेरपाहणी केली; पण उपयोग झाला नव्हता. बरे, दुष्काळी उपाययोजनांची जंत्री मोठी असली तरी प्रत्यक्षात हाती मदत नसून वीजबिल आदींच्या वसुलीचा तगादा सुरूच आहे. त्यामुळे ग्रामस्थ अधिक संतप्त झाले आहेत. तेव्हा, आता कोरडी सहानुभूती अगर कोरडी आश्वासने पुरी! केंद्रीय पथकाच्या पाहणीचाही फार्स न ठरता तातडीने दुष्काळी उपाययोजनांचा लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे, अन्यथा आगामी निवडणुकीत फटका बसल्याखेरीज राहणार नाही.