शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

पाहणीचा फार्स ठरू नये !

By किरण अग्रवाल | Updated: December 9, 2018 01:39 IST

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने प्रत्यक्षात शेतीच्या बांधावर जाऊन आढावा घेतला आहे, मुख्यमंत्र्यांनाही त्याबद्दल अवगत केले असल्याने राज्य शासनही त्यासंबंधीचा पाठपुरावा करणार आहे. दुष्काळ स्थिती आहे, हे या सर्वांनी अनुभवले व जाणले असल्याने आता ही पाहणी म्हणजे केवळ उपचार न ठरता; बळीराजाचे अश्रू पुसण्यासंदर्भात शासकीय पातळीवरून पावले उचलली जाणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देआगामी निवडणुकीत फटका बसल्याखेरीज राहणार नाही.

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने प्रत्यक्षात शेतीच्या बांधावर जाऊन आढावा घेतला आहे, मुख्यमंत्र्यांनाही त्याबद्दल अवगत केले असल्याने राज्य शासनही त्यासंबंधीचा पाठपुरावा करणार आहे. दुष्काळ स्थिती आहे, हे या सर्वांनी अनुभवले व जाणले असल्याने आता ही पाहणी म्हणजे केवळ उपचार न ठरता; बळीराजाचे अश्रू पुसण्यासंदर्भात शासकीय पातळीवरून पावले उचलली जाणे गरजेचे आहे.यंदा निसर्गाने डोळे वटारल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. पावसाअभावी खरिपाची हानी झाली असून, भाजीपाला, टमाट्यापाठोपाठ कांद्याचे दरही कोसळल्याने शेतकरी संतप्त आहे. त्या भीतीपोटीच दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाला कडेकोट बंदोबस्त पुरवण्याचे आदेश होते. नाशिक जिल्ह्यात दौºयाप्रसंगी शेतकºयांनी आता शेतीसाठी उचललेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न असल्याने विषाचा घोट, आत्महत्या हाच पर्याय असल्याच्या वेदना पथकासमोर मांडल्या आहेत. माणसांनाच प्यायच्या पाण्याची चणचण असल्याने जनावरांचे चारा-पाणी आणायचे कोठून, असाही प्रश्न आहे. जिल्ह्यात आताच टँकर्सने शंभरी गाठली आहे. संपूर्ण जिल्हाच पाण्यासाठी तळमळतो आहे. पिके गेली आहेत; पण राज्य शासनाने मागे जी दुष्काळसदृश तालुक्यांची यादी घोषित केली त्यात काही गावे सुटून गेली होती. तेव्हा ओरड झाल्यावर राज्य शासनाने फेरपाहणी केली; पण उपयोग झाला नव्हता. बरे, दुष्काळी उपाययोजनांची जंत्री मोठी असली तरी प्रत्यक्षात हाती मदत नसून वीजबिल आदींच्या वसुलीचा तगादा सुरूच आहे. त्यामुळे ग्रामस्थ अधिक संतप्त झाले आहेत. तेव्हा, आता कोरडी सहानुभूती अगर कोरडी आश्वासने पुरी! केंद्रीय पथकाच्या पाहणीचाही फार्स न ठरता तातडीने दुष्काळी उपाययोजनांचा लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे, अन्यथा आगामी निवडणुकीत फटका बसल्याखेरीज राहणार नाही.