शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

खाण्याचा सोडा वापरून घरच्या घरी करा गणेश विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:20 IST

गणेशोत्सव आनंदाचा सण असला तरी हा उत्सव पर्यावरणप्रेमी असला पाहिजे, यावर आता भर दिला जात आहे. नाशिकमध्ये गेल्या अनेक ...

गणेशोत्सव आनंदाचा सण असला तरी हा उत्सव पर्यावरणप्रेमी असला पाहिजे, यावर आता भर दिला जात आहे. नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विसर्जित मूर्ती दान घेतले जात असलेे तरी आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे घरीच विर्सजन देखील केले जात आहे. शाडू मातीच्या मूर्तीं घरीच बादलीत विसर्जित करून ती माती बागेत वापरता येते. मात्र, आता त्या पलीकडे जाऊन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती देखील काही वर्षांपासून घरीच विसर्जित करता येतात. त्यासाठी अमोनिअयम बाय कार्बोनेट महापालिका उपलब्ध करून देते. मात्र, आता खाण्याचा सोडादेखील वापराला जातो.

अर्थात, अशा प्रकारच्या सोड्याचा आणि पर्यायी रासायनांचा वापर करण्यापेक्षा शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचा पर्यावरणप्रेमी आणि मूर्तिकारांकडून दिला जात आहे.

इन्फो...

पीओपीच्या मूर्तींचा वापर कमी

नाशिक शहरात गेल्या काही वर्षांत पीओपीच्या मूर्तींचा वापर कमी होत आहे. राज्य शासनाकडून यामूर्तींवर निर्बंध घातल्यानंतर देखील बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती येतात. मात्र, त्याला भाविकांचा प्रतिसाद मिळत नाही. आता घरगुती गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्तींचाच वापर केला जातो. पीओपीच्या मूर्तींचे फिनीशिंग चांगले असते. त्या अधिक सुबक दिसत असल्याने या मूर्ती प्रामुख्याने खरेदी केल्या जातात.

इन्फो...

नंतर खत म्हणून करा पाण्याचा वापर

१ खाण्याच्या सोड्यात मूर्ती ठेवल्यानंतर ती ४८ तासांत विरघळू लागतात. काही वेळा मूर्ती पूर्ण विरघळण्यासाठी काही वेळा सात ते आठ दिवसही लागतात. मात्र नंतर त्याचा उपयोग खत म्हणून करता येतो.

२ शाडू मातीची मूर्ती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती विरघळल्यानंतर हे पाणी खत म्हणून घराच्या आवारातील बागेला टाकता येते. त्याचा खत म्हणूनही वापर होतो.

इन्फो...

४८ तासांत विरघळते मूर्ती

खाण्याच्या सोडा वापरण्याचे आवाहन करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते खाण्याचा सोडा वापरून निर्गत करण्यास वेळ लागत नाही. साधारणत: ४८ तास वेळ लागतो, असे सांगितले जाते. मात्र काही तज्ज्ञांच्या मते हा आयडल कालावधी आहे. प्रत्यक्षात सात ते आठ दिवसांनी मूर्ती विरघळली जाते.

इन्फो..

शाडू मातीच्याच मूर्ती वापरा..

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती त्यावरील रासायनिक रंग आणि ते नष्ट करण्यासाठी रासायनिक रंगाचा वापर याचा विचार केला, तर अशा प्रकारे रसायनाला प्रतिकार करण्यासाठी रसायन वापरण्याऐवजी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करायला हवा. तो अधिक पर्यावरणपूरक ठरेल.

- मयूर मोरे, मिट्टी फाउंडेशन