शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

खाण्याचा सोडा वापरून घरच्या घरी करा गणेश विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:20 IST

गणेशोत्सव आनंदाचा सण असला तरी हा उत्सव पर्यावरणप्रेमी असला पाहिजे, यावर आता भर दिला जात आहे. नाशिकमध्ये गेल्या अनेक ...

गणेशोत्सव आनंदाचा सण असला तरी हा उत्सव पर्यावरणप्रेमी असला पाहिजे, यावर आता भर दिला जात आहे. नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विसर्जित मूर्ती दान घेतले जात असलेे तरी आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे घरीच विर्सजन देखील केले जात आहे. शाडू मातीच्या मूर्तीं घरीच बादलीत विसर्जित करून ती माती बागेत वापरता येते. मात्र, आता त्या पलीकडे जाऊन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती देखील काही वर्षांपासून घरीच विसर्जित करता येतात. त्यासाठी अमोनिअयम बाय कार्बोनेट महापालिका उपलब्ध करून देते. मात्र, आता खाण्याचा सोडादेखील वापराला जातो.

अर्थात, अशा प्रकारच्या सोड्याचा आणि पर्यायी रासायनांचा वापर करण्यापेक्षा शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचा पर्यावरणप्रेमी आणि मूर्तिकारांकडून दिला जात आहे.

इन्फो...

पीओपीच्या मूर्तींचा वापर कमी

नाशिक शहरात गेल्या काही वर्षांत पीओपीच्या मूर्तींचा वापर कमी होत आहे. राज्य शासनाकडून यामूर्तींवर निर्बंध घातल्यानंतर देखील बाजारात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती येतात. मात्र, त्याला भाविकांचा प्रतिसाद मिळत नाही. आता घरगुती गणेशोत्सवासाठी शाडू मातीच्या मूर्तींचाच वापर केला जातो. पीओपीच्या मूर्तींचे फिनीशिंग चांगले असते. त्या अधिक सुबक दिसत असल्याने या मूर्ती प्रामुख्याने खरेदी केल्या जातात.

इन्फो...

नंतर खत म्हणून करा पाण्याचा वापर

१ खाण्याच्या सोड्यात मूर्ती ठेवल्यानंतर ती ४८ तासांत विरघळू लागतात. काही वेळा मूर्ती पूर्ण विरघळण्यासाठी काही वेळा सात ते आठ दिवसही लागतात. मात्र नंतर त्याचा उपयोग खत म्हणून करता येतो.

२ शाडू मातीची मूर्ती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती विरघळल्यानंतर हे पाणी खत म्हणून घराच्या आवारातील बागेला टाकता येते. त्याचा खत म्हणूनही वापर होतो.

इन्फो...

४८ तासांत विरघळते मूर्ती

खाण्याच्या सोडा वापरण्याचे आवाहन करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते खाण्याचा सोडा वापरून निर्गत करण्यास वेळ लागत नाही. साधारणत: ४८ तास वेळ लागतो, असे सांगितले जाते. मात्र काही तज्ज्ञांच्या मते हा आयडल कालावधी आहे. प्रत्यक्षात सात ते आठ दिवसांनी मूर्ती विरघळली जाते.

इन्फो..

शाडू मातीच्याच मूर्ती वापरा..

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती त्यावरील रासायनिक रंग आणि ते नष्ट करण्यासाठी रासायनिक रंगाचा वापर याचा विचार केला, तर अशा प्रकारे रसायनाला प्रतिकार करण्यासाठी रसायन वापरण्याऐवजी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करायला हवा. तो अधिक पर्यावरणपूरक ठरेल.

- मयूर मोरे, मिट्टी फाउंडेशन