शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

गरिबांची दिवाळी यंदा साखरेविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:07 IST

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत लाभार्थ्यांना सणासुदीला स्वस्त दरात साखर उपलब्ध करून देणाºया सरकारने यंदा कठोर होत, फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रतिकार्ड फक्त एक किलो साखर देण्याचा निर्णय घेऊन अन्य लाखो लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. या कार्डधारकांना नियमित एक किलोच साखर मिळेल, त्यात सणासुदीच्या अतिरिक्त साखरेचा मात्र समावेश नाही.

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत लाभार्थ्यांना सणासुदीला स्वस्त दरात साखर उपलब्ध करून देणाºया सरकारने यंदा कठोर होत, फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रतिकार्ड फक्त एक किलो साखर देण्याचा निर्णय घेऊन अन्य लाखो लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. या कार्डधारकांना नियमित एक किलोच साखर मिळेल, त्यात सणासुदीच्या अतिरिक्त साखरेचा मात्र समावेश नाही.गोरगरिब व विशेषत: वार्षिक एक लाखापेक्षा कमी उत्पन्न गटातील नागरिकांना खुल्या बाजारातील महाग अन्नधान्य तसेच साखर घेणे परवडत नसल्याने शासनाची सार्वजनिक वितरण प्रणाली गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात राबविली जात आहे.केंद्र व राज्य सरकार मिळून अशा घटकांसाठी स्वस्त दरात रेशनवर अन्नधान्य उपलब्ध करून देत असल्याने आजही रेशनचे धान्य विकत घेऊन खाणाºयांची संख्या लाखोंंच्या घरात आहे. नाशिक जिल्ह्यात साडेसात लाख रेशन कार्डधारक असून, त्यातील निम्म्याहून अधिक कुटुंबांना दरमहा रेशनवर स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जात आहे.परंतु मे महिन्यापासून खुल्या बाजारात साखरेचे दर चाळीस रुपयांवर पोहोचल्यापासून राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानातून दिली जाणारी साखर बंद करून टाकली आहे. फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रतिकार्ड साखर देण्याचा निर्णय घेतला आहे.पूर्वी रेशन कार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दरमहा पाचशे ग्रॅम साखर महिन्याकाठी दिली जात होती. आता एका कार्डधारकास एक किलोच साखर देण्यास सुरुवात झाली असून, पूर्वी सणासुदीला व विशेषत: दसरा, दिवाळी सणानिमित्त गोरगरिबांना गोडधोड करून खाता यावे म्हणून प्रतिमानसी दीडशे ग्रॅम साखर अतिरिक्त उपलब्ध करून दिली जात होती. यंदा मात्र त्यालाही राज्य सरकारने कात्री लावली आहे. त्यामुळे दिवाळी गोड करायची असेल तर त्यासाठी खुल्या बाजारातील ४० रुपये दराने साखर खरेदी करावी लागणार आहे.फक्त अंत्योदय पात्रशासनाने फक्त अंत्योदय योजनेत पात्र ठरलेल्या कुटुंबीयांनाच साखर देण्याचा निर्णय घेतला असून, नाशिक जिल्ह्यातील एकूण साडेसात लाख शिधापत्रिकाधारकांपैकी पावणे दोन लाख कुटुंबे अंत्योदय योजनेत समाविष्ट आहेत. सरासरी चार ते दहा हजार लाभार्थी प्रत्येक तालुक्यात आहेत. त्यामुळे शिधापत्रिका असूनही लाखो कुटुंबे साखरेपासून वंचित राहणार आहेत.