शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांची दिवाळी यंदा साखरेविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:07 IST

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत लाभार्थ्यांना सणासुदीला स्वस्त दरात साखर उपलब्ध करून देणाºया सरकारने यंदा कठोर होत, फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रतिकार्ड फक्त एक किलो साखर देण्याचा निर्णय घेऊन अन्य लाखो लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. या कार्डधारकांना नियमित एक किलोच साखर मिळेल, त्यात सणासुदीच्या अतिरिक्त साखरेचा मात्र समावेश नाही.

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत लाभार्थ्यांना सणासुदीला स्वस्त दरात साखर उपलब्ध करून देणाºया सरकारने यंदा कठोर होत, फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रतिकार्ड फक्त एक किलो साखर देण्याचा निर्णय घेऊन अन्य लाखो लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. या कार्डधारकांना नियमित एक किलोच साखर मिळेल, त्यात सणासुदीच्या अतिरिक्त साखरेचा मात्र समावेश नाही.गोरगरिब व विशेषत: वार्षिक एक लाखापेक्षा कमी उत्पन्न गटातील नागरिकांना खुल्या बाजारातील महाग अन्नधान्य तसेच साखर घेणे परवडत नसल्याने शासनाची सार्वजनिक वितरण प्रणाली गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात राबविली जात आहे.केंद्र व राज्य सरकार मिळून अशा घटकांसाठी स्वस्त दरात रेशनवर अन्नधान्य उपलब्ध करून देत असल्याने आजही रेशनचे धान्य विकत घेऊन खाणाºयांची संख्या लाखोंंच्या घरात आहे. नाशिक जिल्ह्यात साडेसात लाख रेशन कार्डधारक असून, त्यातील निम्म्याहून अधिक कुटुंबांना दरमहा रेशनवर स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जात आहे.परंतु मे महिन्यापासून खुल्या बाजारात साखरेचे दर चाळीस रुपयांवर पोहोचल्यापासून राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानातून दिली जाणारी साखर बंद करून टाकली आहे. फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रतिकार्ड साखर देण्याचा निर्णय घेतला आहे.पूर्वी रेशन कार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दरमहा पाचशे ग्रॅम साखर महिन्याकाठी दिली जात होती. आता एका कार्डधारकास एक किलोच साखर देण्यास सुरुवात झाली असून, पूर्वी सणासुदीला व विशेषत: दसरा, दिवाळी सणानिमित्त गोरगरिबांना गोडधोड करून खाता यावे म्हणून प्रतिमानसी दीडशे ग्रॅम साखर अतिरिक्त उपलब्ध करून दिली जात होती. यंदा मात्र त्यालाही राज्य सरकारने कात्री लावली आहे. त्यामुळे दिवाळी गोड करायची असेल तर त्यासाठी खुल्या बाजारातील ४० रुपये दराने साखर खरेदी करावी लागणार आहे.फक्त अंत्योदय पात्रशासनाने फक्त अंत्योदय योजनेत पात्र ठरलेल्या कुटुंबीयांनाच साखर देण्याचा निर्णय घेतला असून, नाशिक जिल्ह्यातील एकूण साडेसात लाख शिधापत्रिकाधारकांपैकी पावणे दोन लाख कुटुंबे अंत्योदय योजनेत समाविष्ट आहेत. सरासरी चार ते दहा हजार लाभार्थी प्रत्येक तालुक्यात आहेत. त्यामुळे शिधापत्रिका असूनही लाखो कुटुंबे साखरेपासून वंचित राहणार आहेत.