शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

दिवाळीच्या सुटीत घरफोडीची धास्ती

By admin | Updated: October 27, 2016 00:34 IST

आपणच व्हा पहारेकरी : बाहेरगावी जाणाऱ्या कुटुंबांवर चोरट्यांची नजर, पोलिसांची उपाययोजना

नाशिक : नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात स्थायिक झालेले वा वास्तव्य करणारे बहुतांशी नागरिक दिवाळीचा सण हा आपल्या मूळ गावी साजरा करतात़ मात्र, गावी जाताना घराच्या सुरक्षिततेबाबत काळजी न घेतल्याने मोठ्या संख्येने घरफोडी व चोरीच्या घटना घडतात़ या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी उपाययोजना केल्या असून, बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनीही संबंधित पोलीस ठाण्यास माहिती देण्याचे आवाहन केले आहे़ पोलीस गस्त व घराच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांमुळे गावाहून परतल्यानंतर नागरिकांचा दिवाळीचा आनंदही टिकून राहणार आहे़दिवाळीनिमित्त अनेक नागरिक गावी जातात़ या कालावधीत चोरटे या संधीचा फायदा घेत त्यांच्या बंद घराच्या दरवाजांचे कुलूप तोडून, खिडक्या तोडून चोरटे मौल्यवान व सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच गृहोपयोगी वस्तू घरफोडी करून चोरून नेतात़ शहरातून गावी जाणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे़ गावी जाण्यापूर्वी शेजारी राहणारे तसेच संबंधित पोलीस ठाण्यास माहिती देणे, सोसायट्यांमधील नागरिकांनी संवादावर भर देणे, सुरक्षारक्षक ठेवणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे़ पोलीस आयुक्तालयात काही दिवसांपूर्वीच घरफोडी व चोरीसंदर्भात बैठक घेण्यात आली होती़ या बैठकीनंतर पोलीस आयुक्तांनी बिट मार्शलच्या दिवसा व रात्रीच्या गस्तीत वाढ केली आहे़ या बिट मार्शलकडे वायरलेस सेट आणि रिव्हॉल्वर असते. विशेष पथके नेमून रात्रीचे पेट्रोलिंगही वाढविण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी संशयास्पद आढळणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली जाते़ तसेच नाकेबंदी, फि क्स पॉइंटद्वारे वाहनांची तपासणी केली जाते़ बाहेरगावी जाताना आपल्या घराच्या सुरक्षिततेसंदर्भात नियमित आढावा घेणेही तितकेच गरजेचे आहे़पोलिसांकडून कारागृहातून जामिनावर सुटलेले घरफोडी व जबरी चोरी करणारे अट्टल गुन्हेगार, तडीपार यांच्यावर वॉच ठेवून त्यांची नियमित तपासणी सुरू करण्यात आली आहे़ शहरातील नागरिकांनीही बाहेरगावी गेलेल्या आपल्या शेजाऱ्याची घरावर लक्ष ठेवावे, तसेच परिसरात काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)या सुरक्षितता आवश्यक...दरवाजाला लॅच बसविले किंवा कुलूप लावले म्हणजे घर सुरक्षित झाले, असा लोकांचा गोड समज आहे. परंतु , ही लॅच आणि कुलपे तकलादू असतात. दरवाजाच्या फ्रेममध्ये लॅच किती आत जाते, याची कधीही तपासणी केली जात नाही़ त्यामुळे दरवाजावर जोरात लाथ मारली तरी लॅच उखडते़ कुलूप उघडण्यासाठी चावी आवश्यक असली तरी कुलपाची कडी दरवाजावर अवघ्या एक ते दीड इंचाच्या स्क्रूने बसविलेली असते. कटावनीचा एक जोरदार हिसका दिला की कडी कुलपासकट उचकटते. याबरोबरच सेफ्टी डोअरचे बोल्टही कुचकामी असतात. त्यामुळे दरवाजा वा कुलूप उचकटून घरात शिरणे चोरांना सहज शक्य होते. घराच्या दरवाजावर ठरावीक तारखेपर्यंत दूध आणि पेपर टाकू नका, अशी चिठ्ठी लिहून ठेवली जाते़ त्यामुळे या घरात काही दिवस कुणीही नाही, हे चोरांना सहजगत्या कळते. तिजोरीच्या चाव्या कपाटाच्या ड्रॉवरमध्ये, गादीखाली, हँगरला अडकविलेल्या किंवा शर्टच्या खिशात ठेवलेल्या असतात. या जागाही चोरांना पक्क्या माहीत असल्याने त्यांचे काम सोपे होते.