शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

निराधार विद्यार्थ्यांना सक्षम करणार ‘दिव्य नवचेतना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:11 IST

नाशिक : जीवघेण्या कोविड संकटात माता-पिता अथवा दोहोंपैकी एकास गमावलेल्या बालकांना मदतीचा हात देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शहरातील ...

नाशिक : जीवघेण्या कोविड संकटात माता-पिता अथवा दोहोंपैकी एकास गमावलेल्या बालकांना मदतीचा हात देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शहरातील सामाजिक संस्थांनी एकत्र येत त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यापासून ते त्यांना स्वावलंबी करण्याचा विडा उचलत त्यांच्यात नवचेतना जगवण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हाभरातील ८० मुलांचे पालकत्व स्वीकारत ‘दिव्य चेतना सोशल फाउंडेशन’तर्फे नाशिकमध्ये रविवारी (दि.२७) ‘नवचेतना संकल्प’ उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात १५ मुलांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी खा. हेमंत गोडसे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी आदी उपस्थित होते.

कोरोना संकटात अनेक बालकांनी माता-पिता तर काहींनी दोघांपैकी एकाचा आधार गमावला आहे. ही बाब लक्षात घेत दिव्य चेतना सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून या बालकांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलतानाच त्यांना कौशल्यनिपुण करण्याचा उद्देश आहे. या उपक्रमात भारतीय जैन फाउंडेशन, गुंज फाउंडेशन, तनिष्का, राऊंड टेबल-१०७ आणि लेडीज सर्कल-११९ या सामाजिक संस्थांचेही योगदान असणार आहे. पालक गमावलेल्या मुलांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना आर्थिक साहाय्य दिले जाणार असून यात प्रामुख्याने शाळेची फी, स्टेशनरी, युनिफॉर्म यांचा समावेश आहे. या उपक्रमातून निराधार विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, कांता राठी, प्राचार्य प्रशांत पाटील, राजेश कोठावदे, घनश्याम येवला, जया पटेल, विजय बाविस्कर, अरविंद महापात्रा, हेमंत राठी, गौरव ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.