शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

निराधार विद्यार्थ्यांना सक्षम करणार ‘दिव्य नवचेतना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:11 IST

नाशिक : जीवघेण्या कोविड संकटात माता-पिता अथवा दोहोंपैकी एकास गमावलेल्या बालकांना मदतीचा हात देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शहरातील ...

नाशिक : जीवघेण्या कोविड संकटात माता-पिता अथवा दोहोंपैकी एकास गमावलेल्या बालकांना मदतीचा हात देत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शहरातील सामाजिक संस्थांनी एकत्र येत त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यापासून ते त्यांना स्वावलंबी करण्याचा विडा उचलत त्यांच्यात नवचेतना जगवण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हाभरातील ८० मुलांचे पालकत्व स्वीकारत ‘दिव्य चेतना सोशल फाउंडेशन’तर्फे नाशिकमध्ये रविवारी (दि.२७) ‘नवचेतना संकल्प’ उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात १५ मुलांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी खा. हेमंत गोडसे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी आदी उपस्थित होते.

कोरोना संकटात अनेक बालकांनी माता-पिता तर काहींनी दोघांपैकी एकाचा आधार गमावला आहे. ही बाब लक्षात घेत दिव्य चेतना सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून या बालकांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलतानाच त्यांना कौशल्यनिपुण करण्याचा उद्देश आहे. या उपक्रमात भारतीय जैन फाउंडेशन, गुंज फाउंडेशन, तनिष्का, राऊंड टेबल-१०७ आणि लेडीज सर्कल-११९ या सामाजिक संस्थांचेही योगदान असणार आहे. पालक गमावलेल्या मुलांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना आर्थिक साहाय्य दिले जाणार असून यात प्रामुख्याने शाळेची फी, स्टेशनरी, युनिफॉर्म यांचा समावेश आहे. या उपक्रमातून निराधार विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, कांता राठी, प्राचार्य प्रशांत पाटील, राजेश कोठावदे, घनश्याम येवला, जया पटेल, विजय बाविस्कर, अरविंद महापात्रा, हेमंत राठी, गौरव ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.