शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्य संघातर्फे विभागीय कविसंमेलन मालेगाव : काव्य स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कारासह प्रमाणपत्रांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:20 IST

मालेगाव : कविता मुक्याचे शब्द, आंधळ्याची दृष्टी व माणुसकीची सृष्टी दाखवते. कळांची असह्य वेदना कवितेतून विरोधाचा हुंकार फोडते, असे प्रतिपादन सदाशिव सूर्यवंशी यांनी केले.

ठळक मुद्देपाण्याचा थेंब पडून सुगंध दरवळतोसमाज मनाची उत्तम मांडणी

मालेगाव : कविता मुक्याचे शब्द, आंधळ्याची दृष्टी व माणुसकीची सृष्टी दाखवते. कळांची असह्य वेदना कवितेतून विरोधाचा हुंकार फोडते, असे प्रतिपादन सदाशिव सूर्यवंशी यांनी केले.मालेगाव मराठी साहित्य संघातर्फे आयोजित जिल्हास्तरीय कविसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सूर्यवंशी पुढे म्हणाले, तापलेल्या मातीच्या ढेकळावर पाण्याचा थेंब पडून सुगंध दरवळतो तसा सुगंध मालेगाव मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून दरवळत राहिला आहे. सादर केलेल्या कवितांतून नात्यांची सुंदर गुंफण, मायेचा ओलावा, समाज मनाची उत्तम मांडणी पाहायला मिळाली.मालेगाव मराठी साहित्य संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मराठा दरबारमध्ये आयोजित कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कविसंमेलनात प्रारंभी साहित्य संघाच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंचावर साहित्य संघाचे अध्यक्ष रमेश उचित, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले उपस्थित होते. प्रास्ताविक उचित यांनी केले. त्यांनी ५० वर्षांचा मागोवा घेतला. राजेंद्र भोसले यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी बालकवितेसाठी समृद्धी खैरनारला ‘आई प्रेमाचा सागर’ या कवितेसाठी प्रथम पुरस्कार मिळाला. तृप्ती श्रावणला ‘आई’ या कवितेसाठी द्वितीय, श्रुती भोईरला ‘छंदवेडी’साठी तृतीय पुरस्कार मिळाला. ज्येष्ठ गटात ‘बाई’ या कवितेसाठी सत्यजित पाटील यांना पहिला पुरस्कार मिळाला. मधुरा जोशीला ‘कविता : एक प्रवास’ यासाठी दुसरा व प्रा. अरविंद भामरे यांना ‘एकदा तरी संपावर ने’ यासाठी तिसरा पुरस्कार मिळाला. समाधान शिंपी यास ‘संघर्षातून समृद्धी’कडे यासाठी व राजेंद्र सोमवंशी यांना ‘माय सावित्री’ या कवितेसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. परीक्षण डॉ. विनोद गोरवाडकर, सुरेंद्र टिपरे व संतोष कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सोनार यांनी केले. जगदीश वैष्णव यांनी आभार मानले. संघाचे कार्याध्यक्ष सतीश कलंत्री, नाना महाजन, डॉ. एस. के. पाटील, विलास सोनार, शिवाजी साळुंखे, टी. अहिरे, प्रा. भारती कापडणीस, भास्कर तिवारी, संजय पांडे, वैदेही भगीरथ, नितीन शेवाळे, अभयराज कांकरिया, विजय पोफळे, डॉ. सुरेश शास्त्री, अशोक फराट, प्रा. बी. एम. डोळे, सुरेश गरुड, श्यामकांत पाटील यांच्यासह साहित्यिक यावेळी उपस्थित होते.