शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मराठी साहित्य संघातर्फे विभागीय कविसंमेलन मालेगाव : काव्य स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कारासह प्रमाणपत्रांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:20 IST

मालेगाव : कविता मुक्याचे शब्द, आंधळ्याची दृष्टी व माणुसकीची सृष्टी दाखवते. कळांची असह्य वेदना कवितेतून विरोधाचा हुंकार फोडते, असे प्रतिपादन सदाशिव सूर्यवंशी यांनी केले.

ठळक मुद्देपाण्याचा थेंब पडून सुगंध दरवळतोसमाज मनाची उत्तम मांडणी

मालेगाव : कविता मुक्याचे शब्द, आंधळ्याची दृष्टी व माणुसकीची सृष्टी दाखवते. कळांची असह्य वेदना कवितेतून विरोधाचा हुंकार फोडते, असे प्रतिपादन सदाशिव सूर्यवंशी यांनी केले.मालेगाव मराठी साहित्य संघातर्फे आयोजित जिल्हास्तरीय कविसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सूर्यवंशी पुढे म्हणाले, तापलेल्या मातीच्या ढेकळावर पाण्याचा थेंब पडून सुगंध दरवळतो तसा सुगंध मालेगाव मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून दरवळत राहिला आहे. सादर केलेल्या कवितांतून नात्यांची सुंदर गुंफण, मायेचा ओलावा, समाज मनाची उत्तम मांडणी पाहायला मिळाली.मालेगाव मराठी साहित्य संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मराठा दरबारमध्ये आयोजित कविसंमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कविसंमेलनात प्रारंभी साहित्य संघाच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंचावर साहित्य संघाचे अध्यक्ष रमेश उचित, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले उपस्थित होते. प्रास्ताविक उचित यांनी केले. त्यांनी ५० वर्षांचा मागोवा घेतला. राजेंद्र भोसले यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी बालकवितेसाठी समृद्धी खैरनारला ‘आई प्रेमाचा सागर’ या कवितेसाठी प्रथम पुरस्कार मिळाला. तृप्ती श्रावणला ‘आई’ या कवितेसाठी द्वितीय, श्रुती भोईरला ‘छंदवेडी’साठी तृतीय पुरस्कार मिळाला. ज्येष्ठ गटात ‘बाई’ या कवितेसाठी सत्यजित पाटील यांना पहिला पुरस्कार मिळाला. मधुरा जोशीला ‘कविता : एक प्रवास’ यासाठी दुसरा व प्रा. अरविंद भामरे यांना ‘एकदा तरी संपावर ने’ यासाठी तिसरा पुरस्कार मिळाला. समाधान शिंपी यास ‘संघर्षातून समृद्धी’कडे यासाठी व राजेंद्र सोमवंशी यांना ‘माय सावित्री’ या कवितेसाठी उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. परीक्षण डॉ. विनोद गोरवाडकर, सुरेंद्र टिपरे व संतोष कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सोनार यांनी केले. जगदीश वैष्णव यांनी आभार मानले. संघाचे कार्याध्यक्ष सतीश कलंत्री, नाना महाजन, डॉ. एस. के. पाटील, विलास सोनार, शिवाजी साळुंखे, टी. अहिरे, प्रा. भारती कापडणीस, भास्कर तिवारी, संजय पांडे, वैदेही भगीरथ, नितीन शेवाळे, अभयराज कांकरिया, विजय पोफळे, डॉ. सुरेश शास्त्री, अशोक फराट, प्रा. बी. एम. डोळे, सुरेश गरुड, श्यामकांत पाटील यांच्यासह साहित्यिक यावेळी उपस्थित होते.