शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

१५ आॅगस्टला होणार महावितरणचे विभाजन

By admin | Updated: July 30, 2016 01:26 IST

१५ आॅगस्टला होणार महावितरणचे विभाजन

नाशिक : महावितरणच्या १६ परिमंडळांचे विभाजन करून चार प्रादेशिक विभाग कार्यान्वित करण्याची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाली असून, येत्या १५ आॅगस्ट रोजी राज्यात चार प्रादेशिक कार्यालये अस्तित्वात येणार असल्याची घोषणा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे केली आहे. महावितरणच्या विभाजनाला सर्वच कर्मचारी संघटनांकडून विरोध दर्शविण्यात आल्यानंतही मंत्रिमहोदयांनी थेट तारखेचीच घोषणा केल्यामुळे आता कामगार संघटना काय भूमिका असेल यावर महावितरणचे भवितव्य अवलंबून असणार आहे. मागीलवर्षी डिसेंबरमध्ये उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणचे विभाजन करण्याची घोषणा केल्यानंतर मागासवर्गीय कामगार संघटनांनी त्यास तीव्र विरोध करीत राज्यभर आंदोलने केली होती. त्यावेळी कामगार संघटनांशी झालेल्या चर्चेनंतर प्रादेशिक विभागाबाबत सर्वसंमतीनेच निर्णय घेतला जाईल असे सांगून तूर्तास हा विषय बाजूला ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवाय कामगार संघटनांकडून होणारा विरोध कायम असल्याने प्रादेशिक कार्यालये अस्तित्वात येणार की नाही याविषयीची साशंकता होती. महावितरणचे चार कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यास भरती, पदोन्नती या घटनात्मक अधिकारावर परिणाम होण्याची भीती कामगार संघटनांनी व्यक्त केली होती. विभाजन मागे न घेतल्यास राज्यातील संघटनांचे ६० हजार कर्मचारी संपावर जातील, असा इशाराही देण्यात आला होता. आता मंत्र्यांनीच याप्रकरणी घोषणा केल्यामुळे महावितरणचे विभाजन होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळी त्यांनी केवळ घोषणा केली नाही, तर प्रादेशिक कार्यालयांमध्ये सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून प्रशासनिक सेवेतील किंवा बाहेरील कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. नवीन रचनेनुसार महावितरणचे एक व्यवस्थापकीय संचालक आणि चार सहव्यवस्थापकीय संचालक असणार आहे. राज्यातील वीजवितरण प्रणाली सक्षम करण्यासाठी तसेच महावितरणवरील ताण कमी करण्यासाठी कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी प्रादेशिक कार्यालये अस्तित्वात येणार असल्याचे उर्जामंत्र्यांनी यापूर्वीच सांगितलेले आहे. (प्रतिनिधी)