शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

जिल्ह्याची खरीप हंगाम नजर पैसेवारी जाहीर

By admin | Updated: September 15, 2015 23:07 IST

रब्बीलाही फटका : १३६८ गावे ५० पैशांच्या आत

 नाशिक : जिल्ह्णाची खरीप हंगामाची नजर पैसेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली असून, खरिपाच्या एकूण १६७७ गावांपैकी १३६८ गावांच्या पिकाची पैसेवारी ५० पैशांच्या आतील असल्याने जिल्ह्णातील पीक उत्पादनाला कमालीचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शासन आता काय दिलासा देते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. यंदा जून महिन्याच्या अखेरीस दमदार हजेरी लावल्यामुळे खरिपाची पेरणी करण्यास उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांनी त्याचा पुरेपूर लाभ घेत पेरणी केली; परंतु पावसाने सलग तीन महिने दडी मारल्यामुळे ज्या पिकांची पेरणी झाली ते पाण्याअभावी नष्ट झाले, तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले. जिल्ह्णात खरीप हंगामावर अधिक जोर व शेतकऱ्यांचीही आशा लागून असते; परंतु पावसाने पाठ फिरविल्यामुळे संपूर्ण हंगामच नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. शासनानेदेखील दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करून खरीप हंगामाच्या नजर पैसेवारीचा आढावा घेतला असता त्यात ही बाब स्पष्ट झाली. जिल्ह्णातील एकूण १९६० गावांपैकी १६७७ गावे खरिपाची असून, रब्बीची फक्त २८३ गावे आहेत. सद्यस्थितीत खरिपाची नजर पैसेवारी पाहता १३६८ गावांमधील पिके ५० पैशाच्या आतील असून, ३०९ गावांमध्ये ५० पैशांच्या वर पैसेवारी आहे. पाऊस न पडल्याचा सर्वाधिक फटका चांदवड, बागलाण, देवळा, येवला, सिन्नर, दिंडोरी, पेठ, मालेगाव, नांदगाव व सुरगाणा या तालुक्यांना बसला असून, येथील खरिपाच्या सर्वच्या सर्व पिकांची पैसेवारी ५० पैशांच्या आतील आहे. नाशिक , इगतपुरी व त्र्यंबकेवर या तीन तालुक्यांत मात्र पिकांची नजर पैसेवारी ५० पैशांच्या वर आहे.