शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची खरीप हंगाम नजर पैसेवारी जाहीर

By admin | Updated: September 15, 2015 23:07 IST

रब्बीलाही फटका : १३६८ गावे ५० पैशांच्या आत

 नाशिक : जिल्ह्णाची खरीप हंगामाची नजर पैसेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली असून, खरिपाच्या एकूण १६७७ गावांपैकी १३६८ गावांच्या पिकाची पैसेवारी ५० पैशांच्या आतील असल्याने जिल्ह्णातील पीक उत्पादनाला कमालीचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शासन आता काय दिलासा देते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. यंदा जून महिन्याच्या अखेरीस दमदार हजेरी लावल्यामुळे खरिपाची पेरणी करण्यास उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांनी त्याचा पुरेपूर लाभ घेत पेरणी केली; परंतु पावसाने सलग तीन महिने दडी मारल्यामुळे ज्या पिकांची पेरणी झाली ते पाण्याअभावी नष्ट झाले, तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले. जिल्ह्णात खरीप हंगामावर अधिक जोर व शेतकऱ्यांचीही आशा लागून असते; परंतु पावसाने पाठ फिरविल्यामुळे संपूर्ण हंगामच नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. शासनानेदेखील दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करून खरीप हंगामाच्या नजर पैसेवारीचा आढावा घेतला असता त्यात ही बाब स्पष्ट झाली. जिल्ह्णातील एकूण १९६० गावांपैकी १६७७ गावे खरिपाची असून, रब्बीची फक्त २८३ गावे आहेत. सद्यस्थितीत खरिपाची नजर पैसेवारी पाहता १३६८ गावांमधील पिके ५० पैशाच्या आतील असून, ३०९ गावांमध्ये ५० पैशांच्या वर पैसेवारी आहे. पाऊस न पडल्याचा सर्वाधिक फटका चांदवड, बागलाण, देवळा, येवला, सिन्नर, दिंडोरी, पेठ, मालेगाव, नांदगाव व सुरगाणा या तालुक्यांना बसला असून, येथील खरिपाच्या सर्वच्या सर्व पिकांची पैसेवारी ५० पैशांच्या आतील आहे. नाशिक , इगतपुरी व त्र्यंबकेवर या तीन तालुक्यांत मात्र पिकांची नजर पैसेवारी ५० पैशांच्या वर आहे.