शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

हिरे, बच्छाव विरोधातील दावा जिल्हा उपनिबंधकांनी फेटाळला

By admin | Updated: September 17, 2016 00:05 IST

हिरे, बच्छाव विरोधातील दावा जिल्हा उपनिबंधकांनी फेटाळला

मालेगाव : तालुक्यातील निमगाव मल्टिपरपज् को-आॅप. सोसायटीत संचालक नसल्याचा मुद्दा पुढे करुन बाजार समिती सभापती प्रसाद हिरे यांच्या तर दीपज्योती संस्थेत प्रतिनिधी असल्याचे कारणावरुन संचालक बंडू बच्छाव यांचे कृउबाचे संचालक पद अपात्रतेचा दावा जिल्हा उपनिबंधकांनी फेटाळून लावला आहे. बाजार समितीच्या संचालकपदाला आव्हान देणारा दावा जिल्हा उपनिबंधकांनी फेटाळल्यानंतर प्रसाद हिरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी हिरे म्हणाले की, मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत दैवीकौल आमच्या बाजुने आल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्यांनी केवळ विरोध म्हणून अखंड बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेला तिलांजली देत निमगाव मल्टिपरपज् को. आॅप. सोसायटीवर निवडणूक लादली. त्याच निवडणुकीचे भांडवल करीत आपले बाजार समितीचे संचालकपद घालविण्यासाठी दावा दाखल केला. त्यावर जिल्हा उपनिंबधक, सहकारी संस्था नाशिकचे कऱ्हे यांनी बाजार समितीच्या अधिनियमन कलम १३ (१) (अ) नुसार संचालक बाजार क्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांमार्फत निवडून दिले जातात त्यासाठी बाजार क्षेत्रातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या संचालकपदी असणाऱ्या व्यक्तींची मतदार यादी तयार केली जाते. तथापि, सहकारी संस्थेस त्यांच्या संस्थेच्या वतीने स्वतंत्र प्रतिनिधी पाठविण्याचे कायद्यामध्ये कोणतीही तरतुद नसल्याचे विशिष्ट प्राथमिक सहकारी संस्थांचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आपण निमगाव को. आॅप. मल्टीपरपज् सोसायटीचे संचालक नसलो तरी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी असल्याने कलम १५ (१) अन्वये अपात्र ठरत नसल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)