शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

जि. प. कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती मिळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:59 IST

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत समुपदेशन एकीकडे सुरू झालेले असताना दुसरीकडे या बदल्यांना स्थगिती मिळण्याची दाट शक्यता व्यक्तकेली जात असून, मुळातच जिल्हा परिषदेत सध्या रिक्त पदांची संख्या २५ टक्क्यांच्या पुढे असून, त्यातही जर बदल्यांच्या माध्यमातून आदिवासी व पेसा भागातील अनुशेष भरला जाणार असेल तर बिगर आदिवासी भागात जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत समुपदेशन एकीकडे सुरू झालेले असताना दुसरीकडे या बदल्यांना स्थगिती मिळण्याची दाट शक्यता व्यक्तकेली जात असून, मुळातच जिल्हा परिषदेत सध्या रिक्त पदांची संख्या २५ टक्क्यांच्या पुढे असून, त्यातही जर बदल्यांच्या माध्यमातून आदिवासी व पेसा भागातील अनुशेष भरला जाणार असेल तर बिगर आदिवासी भागात जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संदर्भात प्रशासनाने यापूर्वीच तशी वास्तवता राज्य सरकारला कळविली असल्याने यंदा बदल्यांना स्थगिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जिल्हा परिषदेत २०१४ पासून कर्मचाºयांची भरती शासनाने बंद केली असून, त्या तुलनेत दरवर्षी किमान पाच टक्के कर्मचारी सेवानिवृृत्त होत आहेत. त्यातही जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या रिक्त पदांची संख्या मोठी आहे. शासनाने पेसा लागू असलेल्या तालुक्यांमध्ये कोणत्याही परिस्थितीत एकही शासकीय पद रिक्त असू नये, असे आदेश आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने यापुर्वीच बिगर आदिवासी भागातील रिक्त पदे तसेच ठेवून आदिवासी भागातील सर्व पदे तातडीने भरली आहेत. त्यामुळे बिगर आदिवासी भागात सध्या २५ ते ३० टक्के पदे अगोदरच रिक्त असून, या पदाचा अतिरिक्त भार अन्य कर्मचारी, अधिकाºयांवर टाकण्यात आला आहे. एकीकडे सरकारकडून नवीन पद भरती बंद केली असताना दुसरीकडे दरवर्षी रिक्त होणाºया पदांची संख्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत यंदा पुन्हा जिल्हा परिषदेच्या दहा टक्के कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचे शासनाचे आदेश आहेत.मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांची रिक्त पदे, सद्यस्थिती व बदल्यानंतर निर्माण होणाºया परिस्थितीची वस्तुस्थिती प्रशासनाने शासनाला कळविले आहे. त्यामुळे शासनाकडून या बदल्यांना स्थगिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कामकाज ठप्प होण्याची शक्यताजिल्हा परिषदेने समुपदेशनाच्या माध्यमातून शुक्रवारपासून प्रकिया सुरू केली आहे. या बदल्यांमध्ये प्रामुख्याने आदिवासी भागातील रिक्त पदे भरण्यावरच भर राहणार असून, त्यासाठी बिगर आदिवासी भागातील कर्मचाºयांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. तसे झाल्यास बिगर आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाºया मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवड या तालुक्यांत जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Transferबदलीnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद