शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

जिल्हा रुग्णालयातील इन्क्युबेटर वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:35 IST

जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू युनिटमध्ये उपचार सुरू असलेल्या नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्यूची गंभीर दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी (दि़ ९) अचानक जिल्हा रुग्णालयास भेट देत एनआयसीयू युनिटची तपासणी केली़ नवजात अर्भकांचे वाढते मृत्यू लक्षात घेता केंद्र शासनाचे निकष बाजूला सारत सद्यस्थितीत आणखी पाच ते सात व महिनाभरात आणखी पाच ते सात अशा सुमारे चौदा इन्क्युबेटरची संख्या वाढविण्यात येणार असून, पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर पुरविण्याची ग्वाही दीपक सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली़

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू युनिटमध्ये उपचार सुरू असलेल्या नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्यूची गंभीर दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी (दि़ ९) अचानक जिल्हा रुग्णालयास भेट देत एनआयसीयू युनिटची तपासणी केली़ नवजात अर्भकांचे वाढते मृत्यू लक्षात घेता केंद्र शासनाचे निकष बाजूला सारत सद्यस्थितीत आणखी पाच ते सात व महिनाभरात आणखी पाच ते सात अशा सुमारे चौदा इन्क्युबेटरची संख्या वाढविण्यात येणार असून, पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर पुरविण्याची ग्वाही दीपक सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली़जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू (स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट) मध्ये गत पाच महिन्यांत १८७, तर आॅगस्टमध्ये ५५ तर सप्टेंबरमध्ये १५ अर्भकांचा मृत्यू झालाआहे़ या विभागात उपचारासाठी दाखल करण्यात येणाºया नवजात अर्भकांच्या संख्येमुळे विभागातील १८ इन्क्युबेटरमध्ये प्रत्येकी चार अर्भक ठेवली जात असल्याचे वास्तव प्रसिद्धी माध्यमांनी समोर आणले होते़ याबाबत शुक्रवारी (दि़८) मंत्रालयात बैठक झाल्यानंतर शनिवारी डॉ़ सावंत यांनी जिल्हा रुग्णालयास आरोग्य सचिवांसह अचानक भेट देऊन एनआयसीयू युनिटची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली़ यावेळी, डॉ़ सावंत यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाºया नवजात अर्भकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, २०११ मध्ये २८ हजार, २०१२ मध्ये ३५ हजार तर सद्यस्थितीत प्रतिवर्षी ५० हजार इतकी झाली आहे़ धुळे, नंदुरबार, जव्हार, वाडा, मोखाडा या ठिकाणांसह तीनशे किलोमीटरहून बालके या ठिकाणी उपचारासाठी दाखल केली जातात़ जिल्ह्णातील ५६ टक्के तर बाहेरील जिल्ह्णातील ४४ टक्के नवजात बालके जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असून, बाहेरील मुलांमध्ये इन्फेक्शनचे प्रमाण अधिक असते़ त्यात ५०० ग्रॅम व एक किलोच्या आत वजन असलेल्या अर्भकांची संख्या अधिक असल्याने त्यांना वाचविणे हे डॉक्टरांसमोर आव्हान असते़ बालमृत्यूबाबत आपण अधिक संवेदनशील असून, पालघर जिल्ह्णाचा बालमृत्यूदर ९४ हून १३ पर्यंत कमी करण्यात यश आले आहे़ याच धर्तीवर नाशिक जिल्हा रुग्णालयासाठी केंद्र शासनाचे निकष बदलून इन्क्युबेटरची संख्या १४ ने वाढविली जाईल तसेच पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर पुरविण्याची ग्वाही आरोग्यमंत्री सावंत यांनी दिली़ यावेळी आमदार जयंवत जाधव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, संदर्भ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एन. गुठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, विजय करंजकर आदी उपस्थित होते.  नवजात अर्भकांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र इमारत बांधली जाणार असून, त्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधीही शासनाने मंजूर केलेला आहे़ मात्र, या इमारतीसाठी असलेला वृक्षांचा अडथळा येत्या आठ दिवसांत दूर करून तोडगा काढला जाणार आहे़ याबाबत मुख्यमंत्री व आरोग्य सचिव महापालिका आयुक्तांशी बोलले असून, हा अडथळा दूर होऊन लवकरच कामास सुरुवात होईल, असे आरोग्यमंत्री सावंत यांनी सांगितले़ परजिल्ह्णातून उपचारासाठी दाखल केल्या जाणाºया अर्भकांमध्ये इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात असून ते कमी करण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे़ या अर्भकांना इन्क्युबेटरमध्ये ठेवले जात असून, केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे द्वितीय श्रेणीतील रुग्णालयांमध्ये केवळ १४ इन्क्युबेटरला मान्यता असते़ मात्र जिल्हा रुग्णालयातील अर्भकसंख्या पाहता येत्या केंद्राचे निकष तोडून सद्यस्थितीत असलेल्या एनआयसीयू युनिटच्या शेजारच्या वॉर्डमध्ये आणखी पाच ते सात व महिनाभरात आणखी पाच ते सात असे चौदा इन्क्युबेटर लावले जाणार आहेत़ केंद्राच्या निकषाप्रमाणे तृतीय श्रेणीतील अर्थात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटरची सुविधा दिली जाते़ नाशिक जिल्हा रुग्णालय द्वितीय श्रेणीत असले तरी भविष्यात राज्य शासन पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर पुरवेल़ तसेच जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या उपचारासाठीच्या स्वतंत्र इमारतीचे कामकाज लवकरच सुरू करण्याची ग्वाही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली़ अर्भक मृत्यूस कमी वजन व शेवटच्या श्रेणीत दाखल झाल्याचे सांगत जिल्हा रुग्णालय व कर्मचाºयांची पाठराखण करून या ठिकाणी उपचारापासून कोणालाही वंचित ठेवले जात नसल्याची कडी केली़