शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

जिल्हा रुग्णालयातील इन्क्युबेटर वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:35 IST

जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू युनिटमध्ये उपचार सुरू असलेल्या नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्यूची गंभीर दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी (दि़ ९) अचानक जिल्हा रुग्णालयास भेट देत एनआयसीयू युनिटची तपासणी केली़ नवजात अर्भकांचे वाढते मृत्यू लक्षात घेता केंद्र शासनाचे निकष बाजूला सारत सद्यस्थितीत आणखी पाच ते सात व महिनाभरात आणखी पाच ते सात अशा सुमारे चौदा इन्क्युबेटरची संख्या वाढविण्यात येणार असून, पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर पुरविण्याची ग्वाही दीपक सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली़

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू युनिटमध्ये उपचार सुरू असलेल्या नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्यूची गंभीर दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शनिवारी (दि़ ९) अचानक जिल्हा रुग्णालयास भेट देत एनआयसीयू युनिटची तपासणी केली़ नवजात अर्भकांचे वाढते मृत्यू लक्षात घेता केंद्र शासनाचे निकष बाजूला सारत सद्यस्थितीत आणखी पाच ते सात व महिनाभरात आणखी पाच ते सात अशा सुमारे चौदा इन्क्युबेटरची संख्या वाढविण्यात येणार असून, पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर पुरविण्याची ग्वाही दीपक सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली़जिल्हा रुग्णालयातील एनआयसीयू (स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट) मध्ये गत पाच महिन्यांत १८७, तर आॅगस्टमध्ये ५५ तर सप्टेंबरमध्ये १५ अर्भकांचा मृत्यू झालाआहे़ या विभागात उपचारासाठी दाखल करण्यात येणाºया नवजात अर्भकांच्या संख्येमुळे विभागातील १८ इन्क्युबेटरमध्ये प्रत्येकी चार अर्भक ठेवली जात असल्याचे वास्तव प्रसिद्धी माध्यमांनी समोर आणले होते़ याबाबत शुक्रवारी (दि़८) मंत्रालयात बैठक झाल्यानंतर शनिवारी डॉ़ सावंत यांनी जिल्हा रुग्णालयास आरोग्य सचिवांसह अचानक भेट देऊन एनआयसीयू युनिटची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली़ यावेळी, डॉ़ सावंत यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाºया नवजात अर्भकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, २०११ मध्ये २८ हजार, २०१२ मध्ये ३५ हजार तर सद्यस्थितीत प्रतिवर्षी ५० हजार इतकी झाली आहे़ धुळे, नंदुरबार, जव्हार, वाडा, मोखाडा या ठिकाणांसह तीनशे किलोमीटरहून बालके या ठिकाणी उपचारासाठी दाखल केली जातात़ जिल्ह्णातील ५६ टक्के तर बाहेरील जिल्ह्णातील ४४ टक्के नवजात बालके जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असून, बाहेरील मुलांमध्ये इन्फेक्शनचे प्रमाण अधिक असते़ त्यात ५०० ग्रॅम व एक किलोच्या आत वजन असलेल्या अर्भकांची संख्या अधिक असल्याने त्यांना वाचविणे हे डॉक्टरांसमोर आव्हान असते़ बालमृत्यूबाबत आपण अधिक संवेदनशील असून, पालघर जिल्ह्णाचा बालमृत्यूदर ९४ हून १३ पर्यंत कमी करण्यात यश आले आहे़ याच धर्तीवर नाशिक जिल्हा रुग्णालयासाठी केंद्र शासनाचे निकष बदलून इन्क्युबेटरची संख्या १४ ने वाढविली जाईल तसेच पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर पुरविण्याची ग्वाही आरोग्यमंत्री सावंत यांनी दिली़ यावेळी आमदार जयंवत जाधव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, संदर्भ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एन. गुठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, विजय करंजकर आदी उपस्थित होते.  नवजात अर्भकांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र इमारत बांधली जाणार असून, त्यासाठी २१ कोटी रुपयांचा निधीही शासनाने मंजूर केलेला आहे़ मात्र, या इमारतीसाठी असलेला वृक्षांचा अडथळा येत्या आठ दिवसांत दूर करून तोडगा काढला जाणार आहे़ याबाबत मुख्यमंत्री व आरोग्य सचिव महापालिका आयुक्तांशी बोलले असून, हा अडथळा दूर होऊन लवकरच कामास सुरुवात होईल, असे आरोग्यमंत्री सावंत यांनी सांगितले़ परजिल्ह्णातून उपचारासाठी दाखल केल्या जाणाºया अर्भकांमध्ये इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात असून ते कमी करण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे़ या अर्भकांना इन्क्युबेटरमध्ये ठेवले जात असून, केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे द्वितीय श्रेणीतील रुग्णालयांमध्ये केवळ १४ इन्क्युबेटरला मान्यता असते़ मात्र जिल्हा रुग्णालयातील अर्भकसंख्या पाहता येत्या केंद्राचे निकष तोडून सद्यस्थितीत असलेल्या एनआयसीयू युनिटच्या शेजारच्या वॉर्डमध्ये आणखी पाच ते सात व महिनाभरात आणखी पाच ते सात असे चौदा इन्क्युबेटर लावले जाणार आहेत़ केंद्राच्या निकषाप्रमाणे तृतीय श्रेणीतील अर्थात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटरची सुविधा दिली जाते़ नाशिक जिल्हा रुग्णालय द्वितीय श्रेणीत असले तरी भविष्यात राज्य शासन पीडिअ‍ॅट्रिक व्हेंटिलेटर पुरवेल़ तसेच जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या उपचारासाठीच्या स्वतंत्र इमारतीचे कामकाज लवकरच सुरू करण्याची ग्वाही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली़ अर्भक मृत्यूस कमी वजन व शेवटच्या श्रेणीत दाखल झाल्याचे सांगत जिल्हा रुग्णालय व कर्मचाºयांची पाठराखण करून या ठिकाणी उपचारापासून कोणालाही वंचित ठेवले जात नसल्याची कडी केली़