शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

जिल्हा निवडणूक शाखेचे थेट प्रदेशाध्यक्षांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:14 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या नवीन ईव्हीएम यंत्राची तज्ज्ञांमार्फत सुरू असलेली चाचणी स्थानिक राजकीय पक्षांच्या अध्यक्षांसमक्ष करण्यासाठी निवडणूक आयोगाने आग्रह धरूनही त्याला स्थानिक पदाधिका-यांकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून जिल्हा निवडणूक शाखेने आता थेट मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाच गळ घालून त्यांनी आपले प्रतिनिधी पाठवावे, अशी विनंती केली आहे.

नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या नवीन ईव्हीएम यंत्राची तज्ज्ञांमार्फत सुरू असलेली चाचणी स्थानिक राजकीय पक्षांच्या अध्यक्षांसमक्ष करण्यासाठी निवडणूक आयोगाने आग्रह धरूनही त्याला स्थानिक पदाधिका-यांकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून जिल्हा निवडणूक शाखेने आता थेट मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाच गळ घालून त्यांनी आपले प्रतिनिधी पाठवावे, अशी विनंती केली आहे. राजकीय पक्षांची ईव्हीएमबाबत असलेली उदासीनता तूर्त प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे.  सन २०१४ नंतर देशात झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये एकाच पक्षाला मिळणाºया बहुमतामुळे निवडणूक आयोगाकडून निवडणुकीत वापरण्यात येणाºया ईव्हीएमवर सर्वच विरोधी पक्षांनी संशय घेतल्यामुळे पर्यायाने आरोपींच्या पिंजºयात असलेल्या निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नवीन ईव्हीएम व त्याला व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्याचा निर्णय घेतला आहे. जेणे करून मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान केले, ते त्यालाच केल्याची खात्री पटणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने सर्व जिल्ह्यांना नवीन बॅलेट व कंट्रोल युनिट पुरविले आहेत. आयोगाने दिलेल्या बॅलेट व कंट्रोल युनिटची चाचपणी घेण्यासाठी आयोगाने तज्ज्ञांना प्रत्येक जिल्ह्यात पाठविले आहे. नाशिक जिल्ह्यासाठी आयोगाने ९४२२ बॅलेट युनिट व ५४७० कंट्रोल युनिट पाठविले असून, या यंत्राच्या प्रथमस्तरीय तपासणीला ११ सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान, सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे जिल्हा, शहराध्यक्षांनी हजर राहावे, असे आयोगाच्या सूचना असल्यामुळे जिल्हा निवडणूक शाखेने १० सप्टेंबर रोजी सर्वच राजकीय पक्षांना पत्र पाठवून ईव्हीएम ठेवलेले गुदाम सर्वांसमक्ष उघडण्याबरोबरच यंत्र चाचणीदरम्यान उपस्थित राहण्यासाठी विनंती करणारे पत्र दिले होते. तथापि, या तपासणीकडे शिवसेना वगळता सर्वच राजकीय पक्षांनी पाठ फिरविली. त्यानंतरही स्मरणपत्र पाठविण्यात आल्यावर त्यालाही दाद मिळाली नसल्याने आता जिल्हा निवडणूक शाखेने भाजपा, कॉँग्रेस, राष्टÑवादी, माकप, भाकप, बसपा, तृणमूल कॉँग्रेस, शिवसेना व मनसे या पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाच पत्र पाठवून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.चाचणी सुरू राहणारलोकशाही सृदृढ करण्यासाठी राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची असून, अशा परिस्थितीत मतदान यंत्र चाचणी आपल्या समक्ष होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी आपले प्रतिनिधी पाठविण्याची विनंती केली आहे. जिल्ह्यात अजून दीड महिना यंत्राची प्रथमस्तरीय चाचणी सुरू राहणार असल्याने त्याला पक्ष कितपत प्रतिसाद देतात त्याकडे लक्ष आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक