शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

जिल्हा न्यायालयात असणार ५० टक्के कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:11 IST

राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यात योग्य खबरदारी घेत कामकाज सुरू ठेवण्यावर भर दिला ...

राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यात योग्य खबरदारी घेत कामकाज सुरू ठेवण्यावर भर दिला जात आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स आणि स्वच्छता या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. दरम्यान, न्यायालयांमध्येही गर्दी होत असल्याने तेथेही कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. यामुळे उच्च न्यायालयाने आता न्यायालयीन कामकाजात पुन्हा बदल केले आहेत. त्यानुसार न्यायालयीन कामकाजाची वेळ पहिल्या सत्रात सकाळी साडेअकरा वाजेपासून दीड वाजेपर्यंत तर दुसऱ्या सत्रात दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत अशी करण्यात आल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. दोन्ही सत्रांमध्ये सर्व न्यायाधीश हजर राहणार आहेत; मात्र न्यायालयीन कर्मचारी वर्गाची उपस्थिती ५० टक्के इतकी केली आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे कामकाज राहील त्याच वकील व पक्षकारांना न्यायालयात प्रवेश राहणार आहे. तसेच एखाद्या प्रकरणात पक्षकार किंवा वकील हजर न राहिल्यास त्यांच्याविरोधात न्यायालयाकडून ऑर्डर केली जाणार नसल्याचेही उच्च न्यायालयाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार, वकिलांनाही बंधनकारक करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात पुरावा घेण्याचे काम प्राधान्याने होणार असून दुसऱ्या सत्रात वकिलांचे युक्तिवाद, निकाल व इतर न्यायालयीन कामे पार पडणार आहेत. हे नियम जिल्हा व तालुका न्यायालयांनादेखील लागू राहणार आहेत. तसेच कामाशिवाय वकील व पक्षकारांनी न्यायालयात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.