शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

एप्रिलपासून खरीप पिक कर्जाचे वाटप जिल्हा बँकेचा निर्णय : कर्जफेड करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 01:38 IST

नाशिक : जिल्हा बँकेचे कर्जदार असले तरी, नातेवाईकांच्या ठेवीतून ते कर्जखात्यात वर्ग करून घेण्यात यावे, त्याच बरोबर दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या कर्जदारांच्या दोन लाखांची शासनाने हमी घ्यावी आदी मागण्यात शुक्रवारी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. कर्जदारांनी रोख स्वरूपात कर्ज भरणा केल्यास येत्या १ एप्रिलपासून खरीपाचे कर्ज वाटप सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रशासकांनी दिले.

नाशिक : जिल्हा बँकेचे कर्जदार असले तरी, नातेवाईकांच्या ठेवीतून ते कर्जखात्यात वर्ग करून घेण्यात यावे, त्याच बरोबर दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या कर्जदारांच्या दोन लाखांची शासनाने हमी घ्यावी आदी मागण्यात शुक्रवारी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. कर्जदारांनी रोख स्वरूपात कर्ज भरणा केल्यास येत्या १ एप्रिलपासून खरीपाचे कर्ज वाटप सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रशासकांनी दिले. जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर दोनच दिवसांनी बँकेची वार्षिक सभा होत असल्याने त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. ऑनलाईन सभा असल्यामुळे खातेदारांना या सभेसाठी सहभागी होण्यासाठी अगोदरपासूनच नोंदणी अनिवार्य करण्यात आली होती. त्यानुसार दुपारी एक वाजता सभेच्या कामकाजाला सुरूवात झाली. परंतु बहुतांशी सभासदांनी तांत्रिक कारणाने सहभागी होता येत नसल्याच्या तक्रारी केल्या. या सभेस प्रशासक चंद्रकांत बारी यांनी, बँकेची आर्थिक परिस्थिती विषद करून सुमारे दोन हजार कोटी रूपयांची थकबाकी असून, कर्जदारांनी नियमित कर्जफेड केल्यास बँकेचे वैभव प्राप्त होण्यास वेळ लागणार नसल्याचे सांगितले. यावर सभासदांनीही आपले मते मांडली. जे बँकेचे कर्जदार आहेत, परंतु त्यांच्या कुटुंबीयांतील अन्य व्यक्तींच्या बँकेत ठेवी आहेत त्यांच्या संमतीने त्याचे पैसे कर्जात भरून घेण्यात यावे, जेणेकरून बँकेचे पैसे बँकेतच राहतील अशी सुचना केली. त्यावर मात्र प्रशासकांनी असहमती दर्शविली. कर्जदारांनी रोख स्वरूपातच कर्जभरणा करावा असे त्यांनी आवाहन केले. याच बरोबर कर्जदार शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शेती अर्थव्यवस्था डबघाईस आली असून, अवकाळी पावसाने पुन्हा नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून द्यावे तसेच कर्ज भरणासाठी हप्ते बांधून देण्याची मागणी केली. शासनाच्या समझोता योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांच्या दोन लाखाची शासनाने हमी घ्यावी उर्वरित कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना हप्ते बांधून देण्यात यावी असा ठरावही यावेळी करण्यात आला.सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीस प्रशासक मंडळ प्रमुख आरिफ खान यांनी, कर्जदार शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरणा केल्यास गरजवंत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणे शक्य होणार असल्याचे सांगितले. यंदाही खरीप हंगाम तोंडावर असून, शेतकऱ्यांना खरीपाचे कर्जवाटप येत्या १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. त्यात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले. तसेच मोठ्या कर्जदारांनी कर्जफेड करून कटू प्रसंग टाळावा असे आवाहनही केले. यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष केदा आहेर, गणपत पाटील, परवेज कोकणी, शिवाजी चुंभळे आदी सहभागी झाले होते.