शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

जिल्हा बँकेने थकीत कर्ज वसुली थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 18:32 IST

गेल्या दोन वर्षांपासून असलेली भीषण दुष्काळी परिस्थिती, अशातच शेतमालाचे पडलेले भाव यामुळे अगोदरच शेतकरी पिचलेला, वैतागलेला असताना ऐन हंगामात जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकºयांना थकीत कर्ज वसुलीसाठी सहकार खात्यामार्फत कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. बँकेने सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली असून, शेतकरी संघटनेने ही कर्ज वसुलीची प्रक्रि या त्वरित थांबवावी, अशा मागणीचे निवेदन सहायक निबंधक यांना दिले आहे.

ठळक मुद्देयेवला तालुक्यातील शेतकऱ्यांची सहायक निबंधकांकडे मागणी

येवला : गेल्या दोन वर्षांपासून असलेली भीषण दुष्काळी परिस्थिती, अशातच शेतमालाचे पडलेले भाव यामुळे अगोदरच शेतकरी पिचलेला, वैतागलेला असताना ऐन हंगामात जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकºयांना थकीत कर्ज वसुलीसाठी सहकार खात्यामार्फत कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. बँकेने सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली असून, शेतकरी संघटनेने ही कर्ज वसुलीची प्रक्रि या त्वरित थांबवावी, अशा मागणीचे निवेदन सहायक निबंधक यांना दिले आहे.सध्या खरीप हंगामावर पावसाच्या अवकृपेमुळे संकटाचे सावट असताना जिल्हा बँकेने तालुक्यातील शेतकºयांना थकीत पीककर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. सहायक निबंधकांमार्फत या नोटीस शेतकºयांना चालू महिन्यात प्राप्त झालेल्या आहेत. एकीकडे जिल्हा बँकेने शेतकºयांना नोटाबंदीनंतर पीककर्जाचे वाटप केले नाही, तर दुसरीकडे शेतकरी कौटुंबिक समस्यांना तोंड देत दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींनाही सामोरे जात आहे. जिल्हा बँकेने सहकारी साखर कारखाना, संचालकांच्या विविध सहकारी संस्थांना मनमानी कर्जाचे वाटप करून आज ही कर्जे थकीत असताना त्या कर्जाची वसुली सोडून शेतकºयांच्या मागे बँक हात धुवून थकीत कर्ज वसुलीसाठी लागली आहे. सदरच्या वाटलेल्या कर्जामुळेच जिल्हा बँक आज डबघाईस आलेली आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. महाराष्ट्रात अनेक शेतकºयांनी थकीत कर्जापोटी आत्महत्या केलेल्या असताना जिल्हा बँकेने शेतकºयांना नोटिसा पाठविण्यापूर्वी विचार करावयास हवा होता, असेही शेतकरी संघटनेने सहायक निबंधकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सध्या खरीप हंगामात अनेक ठिकाणी शेतकºयांना पावसाअभावी दुबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत, शेतकरी संकटात असताना कर्जदार सभासदांना सक्तीची कर्ज वसुली राबवून त्यास जप्तीची, लिलावाची भीती दाखवून त्रास दिला जात आहे.शेतकºयांनी घेतलेल्या पीककर्जाचा यापूर्वीही वेळेवर भरणा केलेला आहे; मात्र सलगच्या दुष्काळामुळे तसेच शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी पीककर्ज भरू शकलेला नाही हे बँकेने लक्षात घेऊन सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतु पाटील झांबरे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख संध्या पगारे, सुभाष सोनवणे, अनिस पटेल, अरु ण जाधव, शिवाजी वाघ, सुरेश जेजुरकर, सुरेश कदम, बापूसाहेब पगारे आदींनी केली आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक