शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

जिल्हा बँकेने थकीत कर्ज वसुली थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 18:32 IST

गेल्या दोन वर्षांपासून असलेली भीषण दुष्काळी परिस्थिती, अशातच शेतमालाचे पडलेले भाव यामुळे अगोदरच शेतकरी पिचलेला, वैतागलेला असताना ऐन हंगामात जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकºयांना थकीत कर्ज वसुलीसाठी सहकार खात्यामार्फत कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. बँकेने सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली असून, शेतकरी संघटनेने ही कर्ज वसुलीची प्रक्रि या त्वरित थांबवावी, अशा मागणीचे निवेदन सहायक निबंधक यांना दिले आहे.

ठळक मुद्देयेवला तालुक्यातील शेतकऱ्यांची सहायक निबंधकांकडे मागणी

येवला : गेल्या दोन वर्षांपासून असलेली भीषण दुष्काळी परिस्थिती, अशातच शेतमालाचे पडलेले भाव यामुळे अगोदरच शेतकरी पिचलेला, वैतागलेला असताना ऐन हंगामात जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकºयांना थकीत कर्ज वसुलीसाठी सहकार खात्यामार्फत कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. बँकेने सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली असून, शेतकरी संघटनेने ही कर्ज वसुलीची प्रक्रि या त्वरित थांबवावी, अशा मागणीचे निवेदन सहायक निबंधक यांना दिले आहे.सध्या खरीप हंगामावर पावसाच्या अवकृपेमुळे संकटाचे सावट असताना जिल्हा बँकेने तालुक्यातील शेतकºयांना थकीत पीककर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. सहायक निबंधकांमार्फत या नोटीस शेतकºयांना चालू महिन्यात प्राप्त झालेल्या आहेत. एकीकडे जिल्हा बँकेने शेतकºयांना नोटाबंदीनंतर पीककर्जाचे वाटप केले नाही, तर दुसरीकडे शेतकरी कौटुंबिक समस्यांना तोंड देत दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींनाही सामोरे जात आहे. जिल्हा बँकेने सहकारी साखर कारखाना, संचालकांच्या विविध सहकारी संस्थांना मनमानी कर्जाचे वाटप करून आज ही कर्जे थकीत असताना त्या कर्जाची वसुली सोडून शेतकºयांच्या मागे बँक हात धुवून थकीत कर्ज वसुलीसाठी लागली आहे. सदरच्या वाटलेल्या कर्जामुळेच जिल्हा बँक आज डबघाईस आलेली आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. महाराष्ट्रात अनेक शेतकºयांनी थकीत कर्जापोटी आत्महत्या केलेल्या असताना जिल्हा बँकेने शेतकºयांना नोटिसा पाठविण्यापूर्वी विचार करावयास हवा होता, असेही शेतकरी संघटनेने सहायक निबंधकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सध्या खरीप हंगामात अनेक ठिकाणी शेतकºयांना पावसाअभावी दुबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत, शेतकरी संकटात असताना कर्जदार सभासदांना सक्तीची कर्ज वसुली राबवून त्यास जप्तीची, लिलावाची भीती दाखवून त्रास दिला जात आहे.शेतकºयांनी घेतलेल्या पीककर्जाचा यापूर्वीही वेळेवर भरणा केलेला आहे; मात्र सलगच्या दुष्काळामुळे तसेच शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी पीककर्ज भरू शकलेला नाही हे बँकेने लक्षात घेऊन सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतु पाटील झांबरे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख संध्या पगारे, सुभाष सोनवणे, अनिस पटेल, अरु ण जाधव, शिवाजी वाघ, सुरेश जेजुरकर, सुरेश कदम, बापूसाहेब पगारे आदींनी केली आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक