शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जिल्हा बँकेने थकीत कर्ज वसुली थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 18:32 IST

गेल्या दोन वर्षांपासून असलेली भीषण दुष्काळी परिस्थिती, अशातच शेतमालाचे पडलेले भाव यामुळे अगोदरच शेतकरी पिचलेला, वैतागलेला असताना ऐन हंगामात जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकºयांना थकीत कर्ज वसुलीसाठी सहकार खात्यामार्फत कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. बँकेने सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली असून, शेतकरी संघटनेने ही कर्ज वसुलीची प्रक्रि या त्वरित थांबवावी, अशा मागणीचे निवेदन सहायक निबंधक यांना दिले आहे.

ठळक मुद्देयेवला तालुक्यातील शेतकऱ्यांची सहायक निबंधकांकडे मागणी

येवला : गेल्या दोन वर्षांपासून असलेली भीषण दुष्काळी परिस्थिती, अशातच शेतमालाचे पडलेले भाव यामुळे अगोदरच शेतकरी पिचलेला, वैतागलेला असताना ऐन हंगामात जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकºयांना थकीत कर्ज वसुलीसाठी सहकार खात्यामार्फत कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. बँकेने सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली असून, शेतकरी संघटनेने ही कर्ज वसुलीची प्रक्रि या त्वरित थांबवावी, अशा मागणीचे निवेदन सहायक निबंधक यांना दिले आहे.सध्या खरीप हंगामावर पावसाच्या अवकृपेमुळे संकटाचे सावट असताना जिल्हा बँकेने तालुक्यातील शेतकºयांना थकीत पीककर्ज वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. सहायक निबंधकांमार्फत या नोटीस शेतकºयांना चालू महिन्यात प्राप्त झालेल्या आहेत. एकीकडे जिल्हा बँकेने शेतकºयांना नोटाबंदीनंतर पीककर्जाचे वाटप केले नाही, तर दुसरीकडे शेतकरी कौटुंबिक समस्यांना तोंड देत दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींनाही सामोरे जात आहे. जिल्हा बँकेने सहकारी साखर कारखाना, संचालकांच्या विविध सहकारी संस्थांना मनमानी कर्जाचे वाटप करून आज ही कर्जे थकीत असताना त्या कर्जाची वसुली सोडून शेतकºयांच्या मागे बँक हात धुवून थकीत कर्ज वसुलीसाठी लागली आहे. सदरच्या वाटलेल्या कर्जामुळेच जिल्हा बँक आज डबघाईस आलेली आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. महाराष्ट्रात अनेक शेतकºयांनी थकीत कर्जापोटी आत्महत्या केलेल्या असताना जिल्हा बँकेने शेतकºयांना नोटिसा पाठविण्यापूर्वी विचार करावयास हवा होता, असेही शेतकरी संघटनेने सहायक निबंधकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सध्या खरीप हंगामात अनेक ठिकाणी शेतकºयांना पावसाअभावी दुबार पेरण्या कराव्या लागल्या आहेत, शेतकरी संकटात असताना कर्जदार सभासदांना सक्तीची कर्ज वसुली राबवून त्यास जप्तीची, लिलावाची भीती दाखवून त्रास दिला जात आहे.शेतकºयांनी घेतलेल्या पीककर्जाचा यापूर्वीही वेळेवर भरणा केलेला आहे; मात्र सलगच्या दुष्काळामुळे तसेच शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी पीककर्ज भरू शकलेला नाही हे बँकेने लक्षात घेऊन सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतु पाटील झांबरे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख संध्या पगारे, सुभाष सोनवणे, अनिस पटेल, अरु ण जाधव, शिवाजी वाघ, सुरेश जेजुरकर, सुरेश कदम, बापूसाहेब पगारे आदींनी केली आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक