शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

जिल्हा बँकेने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:11 IST

दिंडोरी : जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असून, बँकेतर्फे जिल्ह्यात सर्वाधिक कृषी कर्ज वाटप होत असले तरी ...

दिंडोरी : जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असून, बँकेतर्फे जिल्ह्यात सर्वाधिक कृषी कर्ज वाटप होत असले तरी अजूनही अनेक शेतकरी कृषी कर्जापासून वंचित आहेत. विविध सोसायट्यांच्या अनिष्ट तफावत कमी करत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा, असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाला केले आहे.

मुंबई विधानभवन येथे झिरवाळ यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेच्या कर्ज वाटप, वसुली व टीडीएस कपात आदी अडचणींबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे खाजगी सचिव संतोष पाटील यांचे उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी झिरवाळ बोलत होते. बैठकीस आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयंत जाधव, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाबूशेठ बागमार, जिल्हा बँकेचे प्रशासक एम. ए. अरीफ, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, विधानसभा उपाध्यक्ष सचिव मुकेश भोगे, आंबे दिंडोरीचे उपसरपंच सुभाष वाघ, राजेंद्र परदेशी, गोपाळ धूम आदी उपस्थित होते.

यावेळी सचिव पाटील यांनी बँक उर्जितावस्थेत आणण्यासाठी विविध उपाय सुचवत प्रशासक यांना त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या द्याव्यात, असे सांगितले. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा जिल्हा बँकेने एवढ्या अडचणीच्या काळातही अनेक सोसायट्यांमधील अनिष्ट तफावत दूर होत सोसायट्यांचे कर्ज वाटप सुरू झाले असून, बँक वाचविण्याच्या दृष्टीने चांगली वाटचाल सुरू आहे. जसे ब वर्गमधील काही सोसायट्यांची अनिष्ट तफावत दूर झाली तसाच प्रयत्न क वर्गासाठी करावा व जास्तीत जास्त कर्ज वाटप करावे.

-----------------------

अनिष्ट तफावत ५० टक्के कमी करावी

बैठकीत सर्व सोसायट्यांचे क्रमपत्र बनवावे कर्ज वाटपाची तयारी करावी, अनिष्ट तफावत ५० टक्के कमी करावी, कर्ज वसुली करताना जे खातेदार कुटुंबातील व्यक्तीच्या ठेवी, खात्यातील रक्कम संमती घेऊन वर्ग करत असतील तर करून घ्याव्या. त्यासाठी टक्केवारीची अट ठेवू नये, शेतकरी अत्यंत अडचणीतून जात असताना कर्जवसुली मोहिमेत शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, लिलाव थांबवावे, वनटाइम सेटलमेंट योजना प्रभावीपणे राबवावी त्यासाठी इतर बँक ज्याप्रमाणे धोरण राबवते ते राबवावे आदी सूचना करण्यात आल्या. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, माजी आमदार जयंत जाधव, माजी जि.प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शेतकरी बाबूशेठ बागमार यांनी विविध सूचना मांडल्या.