शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेचा प्रताप : शेतकरी संतप्त; शासनाच्या मुख्य उद्देशाला केराची टोपली प्रोत्साहन कर्जमाफीची रक्कम कर्जात वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:17 IST

सायखेडा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेमध्ये जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी २५ हजार रुपये शासकीय मदत जाहीर केली होती.

सायखेडा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेमध्ये जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी २५ हजार रुपये शासकीय मदत जाहीर केली होती. नियमित कर्जफेड करणाºया शेतकºयांनी रीतसर अर्ज दाखल करून या रकमेचा शासनाकडून लाभ घेतला असला तरी जिल्हा बँकेने शासनाकडून आलेली रक्कम शेतकºयांच्या कर्ज खात्यात परस्पर वर्ग केल्याने शेतकºयांमध्ये नाराजी पसरली आहे.सरकारने शेतकरी कर्जमाफी करताना अनेक नवनवीन फंडे वापरले आहे. कर्जमाफी चुकीच्या पद्धतीने न करता खºया कर्जबाजारी असलेल्या शेतकºयाला मिळाली पाहिजे, अशा पद्धतीने सरकारकडून पारदर्शक कर्जमाफी करण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्यक्ष मात्र या योजनेचा लाभ शेतकºयांना जाचक अटींमुळे घेता आला नाही. अनेक शेतकरी कर्ज नियमित फेडत असतात. त्यांच्यात कर्ज फेडण्याची मानसिकता कायम राहील यासाठी प्रोत्साहन म्हणून २५ हजार रुपये इतके अनुदान देण्यात आले. सदर योजनेच्या लाभार्थींच्या याद्या संबंधित जिल्हा बँक, सहकारी सोसायटी यांना प्राप्त झाल्या आहेत. योजनेचा लाभ मिळालेले शेतकरी यांचे पैसे जिल्हा बँकेला प्राप्त झाले आहे; मात्र जिल्हा बँक सदर पैसे लाभार्थी शेतकºयांना न देता त्यांच्या कर्ज खात्यात परस्पर जमा करत आहे. या योजनेतील लाभार्थी शेतकरी अद्याप थकीत नाही शिवाय शासनाने प्रोत्साहन म्हणून रक्कम दिली आहे, त्यामुळे सदर रक्कम शेतकºयांना दिलासा मिळणार असल्याने रोख स्वरूपात द्यावी कोणत्याही कर्ज खात्यात वर्ग करू नये, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.शेतकºयांना हवा दिलासाजिल्हा बँक परस्पर रक्कम वर्ग करत असेल तर कर्जमाफीचा कोणताही फायदा शेतकºयांना प्रत्यक्ष होणार नाही. शासनाच्या पैशाचा लाभ हा जिल्हा बँकेला होणार आहे. बँक थकीत कर्ज नसताना परस्पर कर्ज भरून घेत आहे, त्यामुळे तातडीने कर्ज प्रत्यक्ष शेतकºयांना दिलासा म्हणून देण्यात यावे अन्यथा कर्जमाफी फसवी आणि बँकेच्या हिताची असल्याची चर्चा सुरू आहे.