शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

जिल्हा बॅँकेचे विलीनीकरण ‘अवघड’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:03 IST

राज्य सरकारने अडचणीत असलेल्या राज्यातील तब्बल १२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांचे विलीनीकरण करण्याबाबत विचार सुरू केला आहे. या बारा जिल्हा बॅँकांमध्ये नाशिक जिल्हा बॅँकेचाही समावेश असल्याने संचालक मंडळ हादरले आहे. मात्र तांत्रिक बाबींचा विचार करता नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे राज्य शिखर बॅँकेत विलीनीकरण होणे तांत्रिकदृष्ट्या अवघड बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नाशिक : राज्य सरकारने अडचणीत असलेल्या राज्यातील तब्बल १२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांचे विलीनीकरण करण्याबाबत विचार सुरू केला आहे. या बारा जिल्हा बॅँकांमध्ये नाशिक जिल्हा बॅँकेचाही समावेश असल्याने संचालक मंडळ हादरले आहे. मात्र तांत्रिक बाबींचा विचार करता नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे राज्य शिखर बॅँकेत विलीनीकरण होणे तांत्रिकदृष्ट्या अवघड बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.  या समितीत नाबार्ड, राज्य शिखर बॅँकेसह राज्याच्या सहकार खात्याचे वरिष्ठ पातळीवरील अधिकारी समाविष्ट आहेत. या समितीला राज्यातील सर्व बारा जिल्हा बॅँकांची प्रत्यक्ष जाऊन तपासणी करून अभ्यास करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.  समितीतर्फे सादर होणाºया अहवालात त्या बॅँकांची आर्थिक स्थिती, बॅँकांच्या विलीनीकरणानंतर राज्य शिखर बॅँकेवर येऊ पाहणारा आर्थिक ताण, काही बॅँकांची आर्थिक परिस्थिती सुदृढ असल्यास त्याबाबतची कारणे, संबंधित जिल्हा बॅँकांवर अवलंबून असणारे साखर कारखाने व कृषी उत्पन्न बाजार समित्यांची परिस्थिती, जिल्हा बॅँकेत कार्यरत असलेले कर्मचारी व अधिकारी यांच्या विलीनीकरणानंतरच्या कामकाजाबाबत व त्यांच्या वेतनाबाबतचा आर्थिक भार यांसह अनेक तांत्रिक व आर्थिक बाबींचा विचार करूनच या समितीला संबंधित १२ जिल्हा बॅँकांविषयी अहवाल सादर करायचा आहे.  नाशिक जिल्हा बॅँकेचा विचार करता २१३ शाखा, कर्मचारी व अधिकारी संख्या, एकूण ठेवी, बॅँकेची एकूण मालमत्ता यांसह अन्य बाबींचा विचार करता नाशिक जिल्हा बॅँकेचे राज्य शिखर बॅँकेत विलीनीकरण करणे तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या अवघड असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका समितीची स्थापनाच्नाशिकसह राज्यातील बारा जिल्हा बॅँका आर्थिक अडचणीत असल्याचे कारण देत त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी राज्य सरकारने या बारा बॅँकांचे राज्य शिखर बॅँकेत विलीनीकरण करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे.  च्या तीन महिन्यांत या समितीला संबंधित जिल्हा बॅँकांच्या आर्थिक परिस्थितीबाबत अभ्यास करून नंतरच अहवाल सादर करायचा आहे.च्आता मात्र सहकार विभागाने याबाबत यू टर्न  घेतला आहे.