शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

जिल्हा बॅँक : वसुलीसाठी कठोर पावले उचलणार संचालकांनी केली कामकाजाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 1:54 AM

नाशिक : उच्च न्यायालयाने दिलासा दिलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षांसह संचालकांनी गुरुवारच्या मुहूर्तावर बॅँकेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात केली.

ठळक मुद्देकारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धावन्यायालयाच्या आदेशाची प्रत सादर

नाशिक : उच्च न्यायालयाने दिलासा दिलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षांसह संचालकांनी गुरुवारच्या मुहूर्तावर बॅँकेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात केली. बॅँकेचे अध्यक्ष म्हणून सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या सात दिवसांतच बरखास्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याने अध्यक्षपदाच्या खुर्चीला अपशकुनी ठरवून अध्यक्ष केदा अहेर यांनी यावेळी जुनी खुर्ची दालनाबाहेर काढून नवीन खुर्चीवर बसत नव्या ‘इनिंग’ला प्रारंभ केला. रिझर्व्ह बॅँकेच्या सूचनेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेवर २९ डिसेंबर रोजी बरखास्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. संचालकांनी या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. त्याची सुनावणी सोमवारी होऊन न्यायालयाने सहकार खात्याच्या बॅँक बरखास्तीच्या कारवाईला स्थगिती देत संचालकांना बॅँकेचे नियमित कामकाजात सहभागी होण्याची मुभा दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या संचालकांना बुधवारी सायंकाळी आदेशाची प्रत मिळाल्यावर गुरुवारी दुपारी दोन वाजता अध्यक्ष केदा अहेर, उपाध्यक्ष सुहास कांदे यांच्यासह संचालकांनी जिल्हा बॅँकेत प्रवेश केला. यावेळी बॅँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांच्याकडे न्यायालयाच्या आदेशाची प्रत सादर करून केदा अहेर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी आमदार सीमा हिरे, डॉ. शोभा बच्छाव, शिरीष कोतवाल, परवेज कोकणी, दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, संदीप गुळवे, किशोर दराडे, धनंजय पवार हे संचालक उपस्थित होते. संचालकांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच बॅँकेचे शाखाधिकारी, खातेप्रमुखांची बैठकही घेण्यात आली व त्यात बॅँकेच्या वसुलीसाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले.वसुलीसाठी कठोर प्रयत्नयावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना अध्यक्ष केदा अहेर यांनी बॅँकेच्या कामकाजात सर्व घटकांना बरोबर घेऊन कामकाज करण्यात येईल, असे सांगितले. शेतकºयांची बॅँक असल्याने कोणतेही चुकीचे कामकाज होणार नाही व कोणाला करूही दिले जाणार नाही, बॅँकेविषयीचा विश्वास कायम ठेवण्यासाठी सर्व संचालक एकत्रितपणे प्रयत्न करतील त्याचबरोबर कोणत्याही संचालकांकडे बॅँकेची थकबाकी नाही, मात्र ज्यांच्याकडे थकीत कर्ज आहे ते वसुलीसाठी प्रसंगी कठोर पावले उचलली जातील व बॅँकेला अडचणीतून बाहेर काढण्यात येईल, अशी ग्वाही दिली.