शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

जिल्हा प्रशासनाकडून ठेवीदार वाऱ्यावर

By admin | Updated: May 29, 2016 22:46 IST

आढावा बैठक ठप्प : दीड वर्षांपासून लागेना मुहूर्त

 नाशिक : जिल्ह्यातील अडचणीत आलेल्या बॅँक आणि ठेवीदारासंदर्भात जिल्हा पातळीवर असलेल्या सहकार विषयक समितीची बैठक गेल्या दीडवर्षांपासून झालेली नसून त्यामुळे गुंतवणूकदार वाऱ्यावर आहेत.जिल्ह्यातील पिपल्स बॅँकेवर सर्व प्रथम आर्थिक निर्बंध लादण्यात आले आणि अडचणीतील या बॅँकेपाठोपाठ अनेक बॅँका अडचणीत आल्या. या बॅँकावर निर्बंध घालण्यात आले असले तरी प्रत्यक्षात हे निर्बंध बॅँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांवर असून, त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम बँकेतून परत मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल आहेत. श्रीराम बॅँकेवर तर अवसायक नियुक्त होऊनही ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळालेली नाही. कपालेश्वर, क्रेडिट कॅपिटल तसेच अन्य अनेक पतसंस्था मोडीत निघाल्याने त्यांच्या ठेवीदारांचे हाल झाले त्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर ठेवीदारांच्या हितासाठी आणि बॅँका, पतसंस्थांच्या मनमानीपणाला चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासन बैठका घेऊन आढावा घेत असे, परंतु गेल्या दीड वर्षात अशा प्रकारच्या बैठकाच झालेल्या नसल्याचे या समितीचे सदस्य पां. भा. करंजकर यांनी सांगितले. नोव्हेंबर २०१४ मध्ये एक बैठक झाली. त्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत जिल्हाधिकारी व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची बदली झाली तरी एकही बैठक त्यांनी घेतली नाही. त्यामुळे शहरातील शेकडो गुंतवणूकदारांचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. अशाच प्रकारे कुशवाह यांनी भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता समितीच्या बैठकाही अपवादानेच घेतल्या आहेत. (प्रतिनिधी)