शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

जिल्हा प्रशासनाने दडपशाही थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:34 IST

जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना जिल्हाधिकाºयांनी अडचणीत आणून कांद्याचा हमीभाव कमी करण्यासाठी व्यापाºयांना तंबी दिल्याचा आरोप जनता दरबारात शेतकºयाने केला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवत दडपशाही थांबविण्याची मागणी केली.

नाशिक : जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना जिल्हाधिकाºयांनी अडचणीत आणून कांद्याचा हमीभाव कमी करण्यासाठी व्यापाºयांना तंबी दिल्याचा आरोप जनता दरबारात शेतकºयाने केला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवत दडपशाही थांबविण्याची मागणी केली.  राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी (दि.३०) जनता दरबार घेण्यात आला. यावेळी एका शेतकºयाने कांदा उत्पादकांच्या व्यथा मांडत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना धारेवर धरले. व्यापाºयांना जिल्हाधिकाºयांनी दालनात बोलावून बैठक घेत कांद्याचे दर शेतकºयांना वाढवून द्यावयाचे नाही, अशी तंबी दिल्याचा आरोप यावेळी त्या शेतकºयाने केला. जिल्हधिकाºयांनी दडपशाही थांबवावी आणि जिल्ह्णातील कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान, राधाकृष्णन् यांनी शेतकºयाचा आरोप बिनबुडाचा असून, जिल्हा प्रशासनाने व्यापाºयांच्या बैठकीत केवळ शेतकरी हित लक्षात घेत व्यापाºयांनी कांद्याची साठेबाजी न करता दिवाळीचा कालावधी लक्षात घेऊन योग्य हमीभावाने कांदा खरेदी करून जिल्ह्णाबाहेर काढावा, अशा सूचना करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले. दिवाळीमध्ये कुठल्याही कारणास्तव कांदा बाजार व्यापाºयांनी बंद ठेवू नये, असाही आदेश यावेळी बैठकीत व्यापाºयांना देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकºयांकडून कांद्याचा माल अगोदर खरेदी करून त्याची साठेबाजी करत नंतर दरवाढ करून नये, असे प्रशासनाच्या वतीने बजावण्यात आले होते. त्यामुळे केवळ गैरसमजापोटी दडपशाहीचा आरोप करणे चुकीच असल्याचे त्यांनी यावेळी बाजू मांडताना पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. ...तर परवाने रद्द करूच्दिवाळीच्या हंगामात कांद्याची साठेबाजी करत जिल्हाबाहेर कांदा न पाठविणाºया व नंतर दरवाढ करणाºया व्यापाºयांचे जिल्हास्तरावरील परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हधिकाºयांनी जनता दरबारामध्ये दिली. एकूणच जिल्हा प्रशासनाने शेतकºयांच्या हित लक्षात घेऊन योग्य त्या सूचना देत कार्यवाही केल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. जिल्हा प्रशासनाचे व्यापाºयांच्या बाजूने कोणतेही धोरण नव्हते.धनश्री अहेरांचे पालकमंत्र्यांना साकडेमहाराष्टÑ राज्य महावितरण कंपनीने कृषिपंपांचा खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य धनश्री अहेर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. जिल्ह्णामध्ये महावितरण कंपनीने वीज देयक न भरल्यामुळे अनेक शेतकºयांच्या कृषिपंपांचा विद्युत पुरवठा कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देताच खंडित केला आहे. त्यामुळे ऐन रब्बी हंगामात शेतकºयांच्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.