शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

विभागातील पाच ग्रामपंचायतींना ‘माझी वसुंधरा’चे चार कोटींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:11 IST

गेल्यावर्षी २ ऑक्टोबर ते १५ एप्रिल २०२१ या दरम्यान राज्यपातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात आले होते. ...

गेल्यावर्षी २ ऑक्टोबर ते १५ एप्रिल २०२१ या दरम्यान राज्यपातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात आले होते. त्यात पृथ्वी, वायु, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वाचा आधार त्यासाठी घेण्यात आला होता. पर्यावरणाचे रक्षण हाच त्यामागचा हेतू असल्याने महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत पातळीवर हे अभियान राबविण्यात आले असता, त्याचे गुणांकन करून स्पर्धेतील ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. जागतिक पर्यावरणदिनी ५ जून रोजी शासनाने हे पुरस्कार जाहीर केले असता, त्यात नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत ही ग्रामपंचायत राज्यात प्रथम, तर मिरगाव ता. कर्जत (नगर) ही ग्रामपंचायत द्वितीय, चिनावल, ता. रावेर (जळगाव) ही ग्रामपंचायत तृतीय व पहुरपेठ (जळगाव) लोणी बु. (नगर) या दोन्ही ग्रामपंचायतींना उत्तेजनार्थ घोषित करण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या क्रमांकाच्या ग्रामपंचायतींला दीड कोटी, द्वितीयला एक कोटी व उर्वरित ग्रामपंचायतींना प्रत्येकी पन्नास लाख रुपये निधी देण्यात आला आहे.

या निधीच्या खर्चाचेही मार्गदर्शन शासनाने केले असून, त्यात प्रामुख्याने गावाचे हरित अच्छादन वाढविणे, वृक्षारोपण करणे, सार्वजनिक उद्याने, जुन्या हरित क्षेत्राचे संवर्धन व देखभाल करणे, रोपवाटिकांचे निर्मिती, जलसंवर्धनाचे उपक्रम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी, तळे व नाले यांचे पुनर्जीवीकरण करणे, सौरऊर्जा, विद्युत वाहनांना प्रोत्साहन देणे आदी उपक्रमावर सदरची रक्कम खर्च करण्यात यावे असेही नमूद करण्यात आले असून, या रकमेतून घेण्यात आलेली कामे येत्या १२ महिन्यात पूर्ण करण्यात यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.