शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

रेशन दुकानांचे धान्य मुंबईतून वितरण काळ्याबाजाराला आळा : जितके कार्ड तितकेच धान्य

By admin | Updated: June 21, 2014 00:58 IST

नाशिक : ‘जितके रेशन कार्ड तितकेच धान्य’ अशा हेतूने सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत सुधारणा करण्याचा निर्णय अन्न व पुरवठा विभागाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून करण्यात येणार आहे

नाशिक : ‘जितके रेशन कार्ड तितकेच धान्य’ अशा हेतूने सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत सुधारणा करण्याचा निर्णय अन्न व पुरवठा विभागाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून करण्यात येणार आहे. रेशन दुकानदार व पुरवठा खात्यातील सरकारी बाबूंच्या ‘हातमिळवणी’ला या नवीन प्रणालीमुळे आळा बसण्याबरोबरच, रेशनच्या धान्याचा काळाबाजार रोखण्यास मदत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन प्रणालीनुसार आता दरमहा अन्नसुरक्षा कायद्याने पात्र ठरलेल्या शिधापत्रिकाधारकांची संख्या आॅनलाइनने मुंबईला कळविण्यात येईल व तेथूनच प्रत्येक दुकाननिहाय असलेल्या रेशन कार्डची संख्या व त्याला अदा केल्या जाणाऱ्या धान्याचे अ‍ॅलोकेशन (वितरण) केले जाणार आहे. त्यामुळे दुकानदाराला त्याच्याकडे असलेल्या कार्डच्या संख्येतच धान्य दिले जाणार असून, त्याने त्याचे त्याच महिन्यात वितरण करावे; परंतु जर काही कारणास्तव त्याच्याकडे धान्य शिल्लक असले तर या शिल्लक धान्याबाबतही शासनाला कळवून त्यातूनच दुसऱ्या महिन्यासाठी तरतूद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यापूर्वी जिल्हा पातळीवरच धान्याचा कोटा मंजूर करून तो तालुका पातळीवर पाठविला जात होता. त्यामुळे दुकानदार व संबंधित अधिकारी-कर्मचारी हातमिळवणी करून मर्जीतील दुकानदाराला धान्य वाढवून देत. त्यातून काळ्याबाजाराला मोठा वाव निर्माण होत होता. काही ठरावीक दुकानदारांवरच ही मेहेरबानी होत असल्याच्याही तक्रारी केल्या जात होत्या. आता मात्र नवीन प्रणालीमुळे या साऱ्या गोष्टींना अटकाव तर बसेलच; शिवाय पुरवठा खात्यावरील कामाचा ताणही कमी होणार आहे. दरमहा त्या-त्या तालुक्याला रेशन दुकान व त्याला जोडलेल्या शिधापत्रिकांची माहिती ‘आॅनलाइन’ भरून पाठवावी लागणार आहे.