शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

निराधार विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप

By admin | Updated: September 26, 2016 23:54 IST

घोषणा : कसमादेतील मुलांना दहावीपर्यंतचे शिक्षण, निवास मोफत

देवळा : राज्यातील १०० अनाथ व निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य व मदतनिधी वाटप कार्यक्र म देवळा येथे संपन्न झाला. कसमादे परिसर विकास मंडळाच्या वतीने यापुढील काळात अनाथ व निराधार मुलांना दहावीपर्यंतच्या शिक्षण व निवासाची सोय मोफत करून देण्याची घोषणा यावेळी आमदार डॉ. राहुल अहेर यांनी केली. येथील कर्मवीर रामरावजी अहेर महाविद्यालयाच्या प्रांगणात पुणे येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने राज्यातील १०० अनाथ व निराधार मुलांना शैक्षणिक साहित्य व मदतनिधी वाटप कार्यक्रम ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार बच्चू कडू, शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी, सिनेअभिनेते भूषण कडू, जि.प.चे कृषी सभापती केदा अहेर,मंदार फणसे, संजय आवटे, अजित चव्हाण, विजय तनपुरे, प्राचार्य हितेंद्र अहेर आदिंच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल अहेर होते. आमदार बच्चू कडू व भूषण कडू यांना शिवनिश्चल हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी केदा अहेर यांनी मदतनिधी कार्यक्रमासाठी देवळा येथील सहकारी संस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल कौतुक केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार डॉ. राहुल अहेर यांनी आगामी काळात शिवनिश्चल ट्रस्टच्या वतीने आलेल्या अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना कसमादे परिसर विकास मंडळाच्या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण व निवासाची मोफत व्यवस्था करण्याचे संस्थेच्या वतीने जाहीर केले व ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम गोसावी यांनी केले. भगवान अहेर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विजय पगार, जयप्रकाश कोठावदे, डॉ. प्रशांत निकम, मुन्ना आहिरराव, डॉ. देवेंद्र चव्हाण, भाऊसाहेब पगार, भारत कोठावदे, अशोक अहेर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)शिवनिश्चल ट्रस्टच्या कार्याचा गौरव राज्यातील अमरावती, पुणे, नाशिक आदि जिल्ह्यांसह गोवा येथील अनाथ व निराधार मुलामुलींना शहरातील मान्यवरांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले. राज्यमंत्री दादा भुसे यांनी मनोगतात शिवनिश्चल ट्रस्टच्या कार्याचा गौरव केला. राज्यात सुरू असलेल्या मराठा क्र ांती मोर्चांची दखल घेऊन मंत्र्यांपासून ते तलाठी, ग्रामसेवकांपर्यंत सर्वांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेण्याची व त्यांच्याशी नीट वागण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीकडे गावातील अनाथ व निराधारांची अपंग व्यक्तींप्रमाणे नोंद झाली पाहिजे, असे मत आमदार बच्चू कडू यांनी यावेळी मांडले.