शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

जूनमध्ये वाटप : शासनाकडे लाखो क्विंटल डाळ पडून तूरडाळ खपविण्यासाठी रेशनच्या कमिशनमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:38 IST

नाशिक : शंभरी पार केलेल्या तूरडाळीचे महत्त्व लक्षात घेता शेतकऱ्यांनी अमाप पिकामुळे यंदा तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात असली तरी, हमीभावाने राज्य सरकारने खरेदी केलेली, परंतु उठावाअभावी पडून असलेली तूरडाळ रेशनमधून विक्री करण्यासाठी दुकानदारांना प्रोत्साहन देण्यासाठी कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसरकारने तूरदाळ लागवडीसाठी शेतकºयांना प्रोत्साहित केले चार महिन्यांत जेमतेत ३ लाख क्विंटल तुरीची भरडाई

नाशिक : एकेकाळी शंभरी पार केलेल्या तूरडाळीचे वाढते महत्त्व लक्षात घेता शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या अमाप पिकामुळे यंदा तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात असली तरी, हमीभावाने राज्य सरकारने खरेदी केलेली, परंतु उठावाअभावी पडून असलेली तूरडाळ रेशनमधून विक्री करण्यासाठी दुकानदारांना प्रोत्साहन देण्यासाठी कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दुकानदारांनी रेशनमधून तूरडाळ विक्रीसाठी उत्सुकता दर्शविली असून, जून महिन्यासाठी ५५० क्विंटल डाळीची मागणी नोंदविण्यात आली आहे. दोन वर्षापूर्वी वर्षी राज्यात तूरडाळीचे उत्पादन घटल्यामुळे बाजारातील मागणी व पुरवठ्याची घडी विस्कटली होती, परिणामी ऐन सणासुदीत ग्राहकांना खुल्या बाजारातून ९० ते १०० रुपये किलो दराने तूरडाळ खरेदी करावी लागली. त्यामुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकारला जबाबदार धरले होते तर सरकारनेही या संकटावर मात करण्यासाठी तूरडाळ आयात केली होती, त्यातही घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तूरडाळीने कधी नव्हे इतका भाव खाल्ल्याने सरकारने तूरदाळ लागवडीसाठी शेतकºयांना प्रोत्साहित तर केलेच, परंतु तुरीला मिळणारा भाव पाहून गेल्या वर्षी तुरीच्या लागवड क्षेत्रातही वाढ झाली. परिणामी राज्यात बंपर पीक आले. त्यामुळे खुल्या बाजारातील शेतकºयांनी तूर कमी भावाने खरेदी करण्यास सुरुवात केल्याने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हमीभावाने म्हणजेच ५० रुपये ५० पैसे दराने तूर खरेदी केंद्रे सुरू केली. राज्यात सुमारे १६ लाख क्विंटल तूर हंगामात खरेदी करण्यात आली. त्यामानाने त्याचा उठाव होऊ शकला नाही. गेल्या चार महिन्यांत जेमतेत ३ लाख क्विंटल तुरीची भरडाई होऊन ती रेशनमधून विक्री करण्यात आली. डिसेंबर महिन्यात राज्य सरकारने रेशनमधून ५५ रुपये किलोप्रमाणे प्रत्येकी एक किलो तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला. परंतु खुल्या बाजारात पॉलिश केलेली उत्तम प्रतिची तूरदाळ ६० ते ६५ रुपयांपर्यंत मिळत असताना रेशनमधील तूरडाळ घेण्यास ग्राहकांनी नाके मुरडली. त्यामुळे नंतर तिची मागणीच नोंदविली गेली नाही. आता मात्र राज्य सरकारवर तुरीचे संकट कोसळले असून, लाखो क्विंटल तुरीचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाल्याने पुन्हा रेशनमधूनच ग्राहकांना ती सक्तीने विक्री करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी रेशन दुकानदारांना प्रोत्साहन देण्यात आले असून, त्यांच्या कमिशनमध्ये घसघशीत ३ रुपये वाढ करण्यात आली आहे जेणे करून त्यांनी अधिक तूरडाळीची विक्री करावी.