शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

२७ टक्के बालकांमध्ये जंतदोषशाळा बंदमुळे वाटप पूर्ण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:18 IST

नाशिक : पोटात जंत झाले की केवळ भूक मंदावणे तसेच वजन कमी होण्यासारख्या समस्यांबरोबरच फुप्फुसाचे आजारही होऊ शकतात. त्यामुळेच ...

नाशिक : पोटात जंत झाले की केवळ भूक मंदावणे तसेच वजन कमी होण्यासारख्या समस्यांबरोबरच फुप्फुसाचे आजारही होऊ शकतात. त्यामुळेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलांना जंताच्या गोळ्या देऊन जंत होऊ नयेत, याबाबत दक्षता घेतली जाते; मात्र गत वर्षभरापासून शाळाच बंद असल्याने जंत गोळ्यांचे वाटप पूर्णपणे ठप्प झाले आहे.

पूर्वी लहान मुलांच्या पोटात जंत होऊ नयेत, यासाठी घरगुती औषधे दिली जात. आता प्रभावी औषधे निघाली असली तरीही पुरेशी माहिती नसल्याने ती मुलांना दिली जात नाहीत. मोठ्या आकाराचे जंत पोटाच्या आतड्यांमध्ये राहून तिथे एका विशिष्ट प्रकारचा गोळा तयार करतात. पोटात दुखणे, मळमळणे यांसारखा त्रास त्यामुळे होऊ शकतो. काही प्रकारचे जंत उलट्या बाजूने शरीरात फुप्फुसांत जातात. तिथे राहिल्याने श्वसनमार्गाचे विविध प्रकारचे त्रास वाढवतात, लहान मुलांना सहा महिन्यांतून एकदा जंतांचे औषध द्यायला हवे, यावर बालरोगतज्ज्ञांचा कटाक्ष असतो.

इन्फो

शाळा, अंगणवाडी केंद्रांवर होणार वितरण

अल्बेंडोझॉल ही लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी सुरक्षित जंतनाशकाची गोळी मानली जाते. जंतनाशक औषधामुळे होणारे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे आहेत. केवळ काही जणांनाच सौम्य प्रमाणात चक्कर येणे, मळमळणे, उलटी होणे किंवा डोके दुखी, पोटदुखी व थकवा यांचा समावेश आहे. हे दुष्परिणाम जंत संसर्गामुळे व त्यावर होणाऱ्या औषधाच्या परिणामामुळे होतात. ते तात्पुरते असून, शाळा व अंगणवाडी केंद्रावर सहजगत्या हाताळण्यासारखे आहेत. त्यामुळेच सप्टेंबरअखेरपासून या गोळ्या अंगणवाडी केंद्रांवर वितरित केल्या जाणार आहेत.

इन्फो

काय आहे जंतदोष

वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे कृमी दोषांचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जंक फूडचा मारा, खालावलेली रोगप्रतिकारशक्ती, पालेभाज्या, फळांवर मारलेली काट यामुळे लहान मुलांमध्येही जंत होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वच्छतेच्या सवयींचा अभाव त्याला प्रामुख्याने कारणीभूत ठरतो.

इन्फो

सज्ञान होईपर्यंत गोळ्या

कृमीदोष हे कुपोषण व रक्ताशयाचे कारण असल्यामुळे कृमीदोष आढळणारी मुले ही नेहमी अशक्त व थकलेली असतात. तसेच यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढही खुंटण्याची शक्यता असते. त्यामुळेच या गोळ्या बालकांना पौगंडावस्थेपर्यंत तर काही उदाहरणांमध्ये मुले सज्ञान होईपर्यंत देणे अत्यावश्यक असते.

इन्फो

आरोग्य अधिकाऱ्यांकडूनच प्राप्त होतात गोळ्या

प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच या जंतगोळ्या संबंधित यंत्रणांना दिल्या जातात. त्यानंतर त्या गोळ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या माध्यमातून त्या गावातील, पाड्यावरील शाळेत किंवा अंगणवाडीतील बालकांना दिल्या जातात.