शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१६०० जात पडताळणी दाखले वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 01:11 IST

नाशिक : तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आल्याने जात पडताळणी कार्यालयात प्रकरणे दाखल करण्यासाठी तसेच पडताळणी प्रमाणपत्र घेऊन जाण्यासाठीची गर्दी वाढली आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाने कामाचा वेग वाढविला असून, जादा वेळ काम करीत कार्यालयाने पंधरा दिवसांत १६०० जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वितरण केले आहे. विशेष म्हणजे दररोज दाखल होणाऱ्या प्रकरणांपैकी काही प्रकरणे काही दिवसांत देण्यात आली असल्याचा दावा पडताळणी समितीने केला आहे.

ठळक मुद्देसमाज कल्याण विभाग : पंधरा दिवसांतील कार्यवाही अर्जदार त्रुटींमुळे ८५० अर्ज शिल्लक

नाशिक : तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आल्याने जात पडताळणी कार्यालयात प्रकरणे दाखल करण्यासाठी तसेच पडताळणी प्रमाणपत्र घेऊन जाण्यासाठीची गर्दी वाढली आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाने कामाचा वेग वाढविला असून, जादा वेळ काम करीत कार्यालयाने पंधरा दिवसांत १६०० जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वितरण केले आहे. विशेष म्हणजे दररोज दाखल होणाऱ्या प्रकरणांपैकी काही प्रकरणे काही दिवसांत देण्यात आली असल्याचा दावा पडताळणी समितीने केला आहे.तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आल्याने जात पडताळणी कार्यालयात प्रकरणे दाखल करण्यासाठी तसेच पडताळणी प्रमाणपत्र घेऊन जाण्यासाठीची गर्दी वाढली आहे. विशेषत: जून महिन्यात मोठ्या प्रमाणात जात पडताळणी प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. गेल्या पंधरा दिवसांत १६०० जात पडताळणी दाखले वितरित करण्यात आले आहेत तर अर्जदारांच्या त्रुटींमुळे ८५० प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली असून, संबंधितांना त्रुटींबाबतची माहिती कळविण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.जात पडताळणीसाठी दररोज दीडशे ते दोनशे अर्ज दाखल होत असतात. गेल्या शुक्रवारी तब्बल अडीचशे अर्ज एकाच दिवशी दाखल झाले होते. सोमवारी १९० विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी अर्ज दाखल केले. शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणीचे दाखले अनिवार्य असल्याने कार्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी अचानक वाढली आहे.प्राप्त अर्जांच्या त्रुटी कमी करण्यासाठी समाजकल्याण जात पडताळणी विभागाने २१ ते २५ रोजी विशेष शिबिरही घेतले होते. या शिबिरास फारसा प्रतिसात लाभला नाही. आजवर २१५८ अर्जांच्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली असून, आता केवळ ८५० अर्जदार त्रुटी शिल्लक आहेत. तर गेल्या महिनाभरात सुमारे १९०३ नवीन अर्ज दाखल झाले आहेत. रोज अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढतच असून, विद्यार्थ्यांची प्रकरणे दाखल करून घेतली जात असून त्यांना लवकरात लवकर पडताळणी प्रमाणपत्रे देण्यासाठीच कामाचा वेग वाढविण्यात आला आहे. पडताळणी प्रमाणपत्रे देण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी असतो. परंतु विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणाºया प्रमाणपत्राची आवश्यकता लक्षात घेऊन या कार्यालयाकडून वेगाने प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जात असल्याचे उपायुक्त वंदना कोचुरे यांनी सांगितले.जात पडताळणी पूर्ण होऊन अजूनही सुमारे अडीच हजार प्रमाणपत्रे कार्यालयातच पडून आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना याबाबत कळविण्यात येऊनही पडताळणी प्रमाणपत्र घेण्यासाठी विद्यार्थी येत नसल्याचे वास्तव आहे. संबंधितांना ३०७५ एसएमएस, २२०० पत्रे पाठविण्यात आलेली आहेत. संबंधितांनी तत्काळ कार्यालयाशी संपर्क साधून आपापली जात पडताळणी प्रमाणपत्रे घेऊन जावीत. ज्या विद्यार्थ्यांना येणे शक्य नाही त्यांनी त्यांच्या कुटुंबातील आई, वडील, भाऊ, बहीण यांच्याकडे ओळखीचे योग्य पुरावे पाठविल्यास त्यांनादेखील सर्वशहानिशा करूनच प्रमाणपत्र दिले जाईल.- वंदना कोचुरे, उपायुक्त, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती