शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जिल्ह्यासाठी १ लाख ९० हजार लसच्या डोसचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:15 IST

नाशिक : कोरोना खूप वेगाने पसरू लागल्याने तसेच १ एप्रिलपासून शासनाकडून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार असल्याने ...

नाशिक : कोरोना खूप वेगाने पसरू लागल्याने तसेच १ एप्रिलपासून शासनाकडून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार असल्याने लसींच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. जिल्ह्यातील काही केंद्रांवर लस संपल्याचे प्रकारदेखील घडले तर काही केंद्रांवर शे-दीडशे लस दिल्यानंतर साठा संपुष्टात आला होता. दरम्यान गुरुवारी जिल्ह्याला १ लाख ९० हजार असा आजपर्यंतचा सर्वाधिक मोठा लससाठा प्राप्त झाल्यानंतर त्याचे जिल्ह्यात सर्व लसीकरण केंद्रांवर वितरण करण्यात आले.

जिल्ह्यात प्रत्येक आठवड्याला लस कमी पडण्याचे प्रकार गत दोन आठवड्यांपासून घडत असताना १ एप्रिलपासून तर लसींचा तुटवडा अधिकच भासण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. ती प्रत्यक्षात १ एप्रिलला सकाळीच खरी ठरली. महानगरातील बहुतांश केंद्रांवर लस उपलब्ध नव्हती. तर ग्रामीणच्या काही केंद्रांवर उपलब्ध तर काही केंद्रांवर संपुष्टात आल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. यापूर्वी जिल्ह्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये सातत्याने लसींचा साठा केवळ दोन-तीन दिवसांपुरताच उपलब्ध राहत होता. त्यात कोरोना वाढू लागल्यावर नागरिकांकडून लसीच्या मागणीतही वाढ झाल्याने गत दोन-तीन आठवड्यांपासून साठ्याबाबत सातत्याने अनिश्चिततेची स्थिती कायम होती. त्यामुळे इच्छा असून आरोग्य विभागाला लसीकरणाला अधिक वेग देणे शक्य होत नव्हते. कोरोनाला वेळीच अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहिमेला अजून वेग देण्याचा निर्णय गत आठवड्यात घेण्यात आला होता. त्यानुसार लसीकरण केंद्रेदेखील वाढविण्यात आली होती. त्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय झाल्याने लस इच्छुकांच्या संख्येत पहिल्या दिवसापासून प्रचंड मोठी वाढ अपेक्षित होती. त्याप्रमाणे अनेक इच्छुकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती.

इन्फो

मार्चअखेर १२ हजार, आता २० हजार

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत दररोज सुमारे १२ हजारांवर नागरिकांचे लसीकरण सुरू होते. त्यात वाढ करण्यासाठी तितक्या मुबलक प्रमाणात लसींचा स्टॉकदेखील उपलब्ध होण्याची नितांत आवश्यकता होती. मात्र, आता पुरेशा प्रमाणात स्टॉक उपलब्ध झाल्याने किमान पुढील आठवड्याहून अधिक कालावधीसाठी २० हजार लसीकरण करणे शक्य होणार आहे.

इन्फो

पण मिळाले होते ४० हजार

नागरिकदेखील कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने लस घेण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध केंद्रांवर गर्दी करीत आहेत. त्यामुळे या मागणीतही दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे दिवसाला किमान २० हजार याप्रमाणे आठवडाभरासाठी किमान दीड लाख लस मिळणे आवश्यक असल्याने नाशिक मनपाकडून दीड लाख लसींची मागणी गत महिन्यातच करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी प्रत्यक्षात मात्र ४० हजारच लस मिळाल्याने वारंवार लसींचा तुटवडा होऊन काही केंद्रांवर लस न मिळण्याचे प्रकार घडू लागले होते.