शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याची जिल्हा बॅँकेला तंबी

By admin | Updated: June 1, 2017 01:31 IST

बॅँकेकडे उपलब्ध असलेल्या निधीचे पीककर्ज व्यतिरिक्त वाटप केल्यास कारवाई करण्याची तंबीही भरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सन २०१६ मध्ये खरीप पीककर्ज घेतलेल्या व परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना दोन दिवसांत चालू खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेला दिले आहेत. बॅँकेकडे उपलब्ध असलेल्या निधीचे पीककर्ज व्यतिरिक्त वाटप केल्यास कारवाई करण्याची तंबीही भरली आहे. चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासाठी जिल्हा बॅँकेवर मोठा भार टाकण्यात आलेला असला तरी, मान्सून तोंडावर येऊन ठेपलेला असताना जिल्हा बॅँकेकडून आजवर जेमतेम ५० कोटी रुपयांचेच पीककर्ज वाटप झाले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास संपूर्ण हंगाम धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी गेल्या आठवड्यात यासंदर्भात आढावा घेऊन जिल्हा बॅँकेचे चेअरमन व कार्यकारी संचालकांना पत्र पाठविले आहे. या पत्रात म्हटले आहे की, सन २०१६ या खरीप हंगामात जिल्ह्णातील दोन लाख ४० हजाराहून अधिक शेतकऱ्यांना बॅँकेने १७१९ कोटी इतक्या रकमेचे पीककर्ज वाटप केलेले आहे. सदर कर्जाची बॅँकेमार्फत मार्च २०१७ पर्यंत मोठ्या प्रमाणावर वसुली करणे आवश्यक असताना बॅँक स्तरावर नगण्य स्वरूपात वसुली झाल्याचे दिसून येते. परिणामत: सन २०१७ च्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपापासाठी पुरेसा निधी नसल्याचे वेळोवेळी बॅँकेमार्फत निदर्शनास आणून देण्यात आलेले आहे. मार्च २०१७ पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा भरणा बॅँकेकडे केलेला आहे, त्यांनादेखील नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. या बाबींमुळे जुन्या पीक कर्जाचा भरणा करूनदेखील नवीन पीककर्ज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. याचा परिणाम म्हणून ज्या शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची इच्छा आहे असे शेतकरीदेखील जिल्हा बॅँकेचे कर्ज भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पीक कर्जाचा भरणा बॅँकेकडे केलेला आहे त्यांना तातडीने नव्याने पीककर्ज उपलब्ध करून देणे अत्यावश्यक झालेले आहे. तथापि, या बाबींकडे बॅँक गांभीर्याने लक्ष देत नसून तांत्रिक बाबी पुढे करून मागील हंगामाच्या पीक कर्जाची वसुली करण्याचे तसेच नवीन पीककर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत असल्याचे पत्रात म्हटले आहे.